AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मुंब्रा लोकल अपघातील चार जखमींवर 16 डॉक्टरांची टीम करणार शस्त्रक्रिया, पोलिसांकडून अकस्मात मृत्यूची नोंद

Mumbra Train Accident: मुंब्रा लोकल अपघातात चार जणांचा मृत्यू झाला. या अपघातात १३ जण जखमी झाले आहेत. जखमी असलेल्या चार रुग्णांवर कळव्यातील छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात शस्त्रक्रिया होणार आहे.

मुंब्रा लोकल अपघातील चार जखमींवर 16 डॉक्टरांची टीम करणार शस्त्रक्रिया, पोलिसांकडून अकस्मात मृत्यूची नोंद
| Updated on: Jun 10, 2025 | 8:37 AM
Share

Mumbra Train Accident: मुंबईतील मुंब्रा लोकल अपघातात चार जणांचा मृत्यू झाला. या अपघातात १३ जण जखमी झाले आहेत. त्यातील काही जणांची प्रकृती गंभीर आहे. कळवा रुग्णालयात असलेल्या सात जखमींपैकी चार जखमींवर आज शस्त्रक्रिया होणार आहे. यासाठी 16 डॉक्टरांची टीम तैनात करण्यात आल्याची माहिती हॉस्पिटल प्रशासनाकडून मिळत आहे. अपघातातील उर्वरित जखमींना सूज आली आहे. ती सूज उतरल्यानंतर त्यांच्यावर देखील शस्त्रक्रिया करणार असल्याची माहिती रुग्णालयातील डॉक्टरांकडून देण्यात आली आहे.

मुंब्रा लोकल अपघातात 13 जण जखमी झाले आहे. त्यात चार जणांचा मृत्यू झाला आहे. अपघातातील जखमी कळवा छत्रपती शिवाजी महाराज, ठाणे सिविल रुग्णालय आणि ज्युपिटर रुग्णालयात उपचार घेत आहेत. अपघातात जखमी असलेल्या चार रुग्णांवर कळव्यातील छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात शस्त्रक्रिया होणार आहे. मुंब्रातील दुर्घटनेत ठाणे जीआरपीतील जवान विकी मुख्यादल यांचा मृत्यू झाला आहे. त्याचा ७ जून रोजीच वाढदिवस झाला होता. आता १७ जून रोजी मुलाचाही वाढदिवस साजरा करणार होते. परंतु त्यापूर्वीच काळाने त्यांच्यावर घाला घातला.

मुंबई कोस्टल रोडवर जेवढे प्रवासी प्रवास करत नाही, तेवढे प्रवाशी रेल्वेतून करतात. मग रेल्वेचे महत्त्वाचे प्रकल्प सोडून इतर प्रकल्प तुम्ही कसे पूर्ण करतात? असा प्रश्न रेल्वे संघटनेकडून विचारण्यात आला आहे. मुंब्रा रेल्वे अपघात प्रकरणात मध्य रेल्वेने मुंब्रा फास्टट्रॅक वळण रस्त्यावर रेल्वेचा वेग कमी केल्याचे चित्र दिसून येत आहे. कल्याण ते सीएसटीच्या दिशेने धावणाऱ्या मध्य रेल्वे सोमवारी ज्या वेगवान धावत होती, मात्र आता सध्या तरी या वळण रस्त्यावरती कमी वेगात धावताना दिसत आहे.

पोलिसांकडून अकस्मात मृत्यूची नोंद

मुंब्रा रेल्वे अपघात प्रकरणी ठाणे रेल्वे पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. हा अपघात कसा झाला? यासाठी पोलिसाचा तपास सुरु आहे. लवकरच त्या लोकल ट्रेनमधील प्रत्यक्षदर्शी प्रवाशांचा जबाब घेणार असल्याची पोलीस सूत्रांनी सांगितले. तसेच दोन रेल्वे रुळांमधील आंतर मोजण्यात येणार आहे.

मनसेकडून आज मोर्चा

मुंब्रा रेल्वे दुर्घटनेच्या विरोधात मनसेच्या वतीने रेल्वे प्रशासनाच्या विरोधात आज धडक मोर्चा काढण्यात येणार आहे. ठाण्यातील गावदेवी मैदान ते ठाणे रेल्वे स्थानक सकाळी नऊ वाजता मोर्चाला सुरुवात होणार आहे. मनसे नेते अविनाश जाधवसह ठाणेकर रेल्वे प्रवासी देखील या मोर्चामध्ये सहभागी होणार आहे. मनसेने दिवा सीएसटी लोकल सुरु करण्याची मागणी केली आहे.

Follow Us
अशोक खरात प्रकरणातून सुटण्यासाठी बडे नेत चक्क...
अशोक खरात प्रकरणातून सुटण्यासाठी बडे नेत चक्क....
मोठी बातमी! निदा खानला आसरा देणाऱ्या मतीनच्या घरावर बुलडोझर? घरासह...
मोठी बातमी! निदा खानला आसरा देणाऱ्या मतीनच्या घरावर बुलडोझर? घरासह....
चाकणकरांनी माझ्यावर दबाव टाकला... अशोक खरातचा भांडाफोड करणाऱ्याने सगळं
चाकणकरांनी माझ्यावर दबाव टाकला... अशोक खरातचा भांडाफोड करणाऱ्याने सगळं.
अशोक खरात प्रकरणी रुपाली चाकणकर यांची 2 तासांपासून चौकशी सुरु, शिवनिका
अशोक खरात प्रकरणी रुपाली चाकणकर यांची 2 तासांपासून चौकशी सुरु, शिवनिका.
शिंदेंचा ड्रीम प्रोजेक्ट पूर्ण होण्याच्या मार्गावर, 175 कोटी खर्च
शिंदेंचा ड्रीम प्रोजेक्ट पूर्ण होण्याच्या मार्गावर, 175 कोटी खर्च.
मुख्यमंत्री होताच विजय यांचा मास्टरस्ट्रोक; काही तासांतच घेतला सर्वात
मुख्यमंत्री होताच विजय यांचा मास्टरस्ट्रोक; काही तासांतच घेतला सर्वात.
रुपाली चाकणकर महिला आयोगाच्या अध्यक्ष कशा झाल्या? दमानियांनी मांडले मह
रुपाली चाकणकर महिला आयोगाच्या अध्यक्ष कशा झाल्या? दमानियांनी मांडले मह.
मोठी बातमी! SIT चौकशीला सामोर जाण्याआधी चाकणकर थेट दिवंगत नेते रवींद्र
मोठी बातमी! SIT चौकशीला सामोर जाण्याआधी चाकणकर थेट दिवंगत नेते रवींद्र.
सुप्रिया सुळेंच्या अपघाताच्या बातमीनंतर सुनील मानेंनी व्यक्त केली शंका
सुप्रिया सुळेंच्या अपघाताच्या बातमीनंतर सुनील मानेंनी व्यक्त केली शंका.
थलपती विजय यांनी घेतली मुख्यमंत्री पदाची शपथ, विजयशिवाय मंत्रीपद मिळा
थलपती विजय यांनी घेतली मुख्यमंत्री पदाची शपथ, विजयशिवाय मंत्रीपद मिळा.