AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मुंबई महापालिका निवडणुकीपूर्वी रामदास आठवलेंचा मास्टरस्ट्रोक, भाजपसमोर ठेवली मोठी अट

केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांचे नेतृत्वाखालील रिपब्लिकन पक्ष मुंबई महापालिका निवडणुकीसाठी जोरदार तयारी करत आहे. भाजपसोबतच्या युतीचा आढावा घेत, त्यांनी मुंबईत २० जागा जिंकण्याचे ध्येय ठरवले आहे. ठाकरे गटाकडून टीकेचा सामना करताना, आठवले यांनी भाजपच्या वर्चस्वाचा दावा केला.

मुंबई महापालिका निवडणुकीपूर्वी रामदास आठवलेंचा मास्टरस्ट्रोक, भाजपसमोर ठेवली मोठी अट
| Updated on: Sep 11, 2025 | 8:55 AM
Share

सध्या सर्वच राजकीय पक्षांकडून महापालिका निवडणुकांची जोरदार तयारी केली जात आहे. मुंबई महापालिका निवडणुकांचे बिगुल वाजण्याआधीच राजकीय पक्षांकडून मोर्चेबांधणीला सुरुवात झाली आहे. याच पार्श्वभूमीवर, केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांच्या नेतृत्वाखालील रिपब्लिकन पक्ष पूर्णपणे ॲक्शन मोडमध्ये आला आहे. नुकतंच रिपब्लिकन पक्षाच्या कार्यकर्त्यांचा एक भव्य संकल्प मेळावा आयोजित करण्यात आला होता. या मेळाव्याचे मुख्य उद्दिष्ट मुंबई महापालिकेवर महायुतीचा झेंडा फडकवणे असल्याचे रामदास आठवले यांनी स्पष्ट केले.

मुंबईतील कांदिवली पश्चिमेत उत्तर मुंबई जिल्हा रिपब्लिकन पक्षाच्या कार्यकर्त्यांचा एक भव्य संकल्प मेळावा पार पडला. या मेळाव्याला रिपाईच्या महिला आणि पुरुष कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने हजेरी लावली. यावेळी रामदास आठवले यांनी कार्यकर्त्यांना निवडणुकीसाठी सज्ज राहण्याचे आदेश दिले. या मेळाव्यादरम्यान विविध पक्षांतील शेकडो कार्यकर्त्यांनी रिपाई आठवले गटामध्ये प्रवेश केला. ज्यामुळे पक्षाची ताकद वाढल्याचे दिसून आले. या मेळाव्याला सीमा आठवले, माजी खासदार गोपाळ शेट्टी आणि विधान परिषद आमदार प्रवीण दरेकर यांचीही उपस्थिती होती. या रिपाईच्या मेळाव्यात केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी अनेक मुद्द्यांवर स्पष्ट भूमिका मांडली. त्यासोबतच त्यांनी भाजपसोबतच्या युतीची भविष्यातील दिशा स्पष्ट केली.

रिपाईला उपमहापौर पद मिळावे

रामदास आठवले यांनी महायुतीचा मुंबई महापालिकेवरील ताबा निश्चित करण्यासाठी रणनीती स्पष्ट केली. मुंबईत भाजपची मोठी ताकद आहे. महापालिकेवर भाजपचा झेंडा फडकणार, यात शंका नाही. मुंबई महानगरपालिका महायुतीच्या ताब्यात आली पाहिजे हा आमचा उद्देश आहे. मुंबईत भाजपचा महापौर होईल. तसेच यावेळी रिपाईला उपमहापौर पद मिळावे. उत्तर पश्चिम जिल्ह्यातील ४२ पैकी ८ जागा आणि संपूर्ण मुंबईतील एकूण २० जागा रिपाईला मिळाव्यात अशा मागण्या रामदास आठवले यांनी केल्या.

दोन ठाकरे सोडा, तीन ठाकरे जरी एकत्र आले तरी…

उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्या एकत्र येण्यावर आठवले यांनी जोरदार टीका केली. “दोन ठाकरे सोडा, तीन ठाकरे जरी एकत्र आले तरी त्यांना यावेळी यश मिळणार नाही. ते पूर्वी भाजप सोबत असल्यामुळेच शिवसेनेला सत्ता मिळत होती. पण आता महाराष्ट्रातील राजकीय समीकरणे बदलली आहेत. महाराष्ट्रात भाजप नंबर एकवर आहे. मुंबईकरांमध्ये मराठी मतांची ज्या ठिकाणी मेजॉरिटी आहे, तिथेच त्यांना जागा मिळतील. पण आमच्यासोबतही २० टक्के मतदार आहेत. मराठी लोकांचा भाजपला चांगला पाठिंबा आहे, असा दावा रामदास आठवले यांनी केला.

Follow Us
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान असं का म्हणाले?
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात शिंदेंचं...
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस- अवधूत गुप्ते
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस... दहीहंडी कार्यक्रमानिमित्त अवधूत गुप्तेंचं भावनिक वक्तव्य;
प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावत...
Mallika SherawAt Magathane Dahihandi | प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावतची हजेरी
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ;
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ; मुंबईतील ही दहीहंडी चर्चेत
हम दो हमारे दो और इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं...
Gulabrao Patil : 'हम दो हमारे दो और... इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं वक्तव्य तुफान चर्चेत
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला;
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला; प्रेक्षकांचं मन जिंकणाऱ्या संवादाची सर्वत्र चर्चा
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची...
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची समिती...
दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर...
MNS Avinash Jadhav Dahi Handi 2026 : दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई, थेट 1,322 कोटी...