AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मुंबईत रेल्वे स्थानकांवर आणखी 49 पादचारी पूल, प्रवाशांचे अपघाती मृत्यू कमी होण्यास मदत होणार

भारतीय रेल्वेने आतापर्यंत रेल्वे स्थानकाच्या दोन्ही टोकांना अनेक पडचरी पुल बांधले आहेत. त्यानंतर गेल्या 5 ते 6 वर्षांत मुंबई उपनगरीय रेल्वे क्षेत्रात अपघाती मृत्यू कमी झाले आहेत. आता, मुंबईला आणखी 49 पडचरी पुल मिळणार आहे, ज्यामुळे प्रवाशांना अधिक मदत होईल.

मुंबईत रेल्वे स्थानकांवर आणखी 49 पादचारी पूल, प्रवाशांचे अपघाती मृत्यू कमी होण्यास मदत होणार
Foot over bridge
| Edited By: | Updated on: Nov 30, 2021 | 7:41 PM
Share

मुंबईः वेळ वाचवण्यासाठी आणि वेळेवर ट्रेन पकडण्यासाठी लोक रेल्वे रूळ ओलांडतात हे मुंबईत सामान्य आहे. परंतु, हे अत्यंत धोकादायक आहे आणि यामुळेच मुंबई उपनगरीय रेल्वे क्षेत्र अपघाती मृत्यूंमध्ये भारतात सर्वाधिक आहे. भारतीय रेल्वेने आतापर्यंत रेल्वे स्थानकाच्या दोन्ही टोकांना अनेक पादचारी पुल बांधले आहेत. त्यानंतर गेल्या 5 ते 6 वर्षांत मुंबई उपनगरीय रेल्वे क्षेत्रात अपघाती मृत्यू कमी झाले आहेत. आता, मुंबईला आणखी 49 पादचारी पुल मिळणार आहे, ज्यामुळे प्रवाशांना अधिक मदत होईल. हा प्रकल्प मुंबई रेल्वे विकास महामंडळाने (MRVC) हाती घेतला आहे.

49 पादचारी पुलांपैकी 28 मध्य रेल्वेवर असतील (हार्बर लाईनसह) आणि आणि 21 पश्चिम रेल्वेवर असतील. MRVC द्वारे बांधण्यात येणार्‍या एकूण नवीन पुलांपैकी 33 पुलांचे बांधकाम पूर्ण झाले असून उर्वरित पुलांचे काम सुरू आहे.

पदचरी पुलाचा विस्तार करण्याचे आदेश

3 वर्षांपूर्वी एल्फिस्टन रोड रेल्वे स्थानकावर झालेल्या चेंगराचेंगरीच्या घटनेनंतर, सरकारने रेल्वेला सर्वाधिक गर्दी असलेल्या स्थानकांवर पादचारी पुलाची रुंदी वाढवण्याचे आदेश दिले. तर काही स्थानकांवर जेथे विस्तार करणे शक्य नव्हते तेथे नवीन पूल बांधले जात आहेत. एल्फिस्टन स्थानकाच्या जीवघेण्या घटनेनंतर, रेल्वेनेही नवीन पादचारी पुलांवर लिफ्टचीही सुविधा सुरू केली आहे, जेणेकरून पायऱ्यांवरील गर्दी कमी होईल. आत्तापर्यंत माटुंगा रोड स्टेशन, कुर्ला/टिळक नगर आणि मुलुंड स्टेशनवर लिफ्ट बांधण्यात आल्या आहेत. तर काही स्थानकांवर एस्केलेटरही बांधण्यात आले आहेत.

अधिक पदचरी पुलमुळे रेल्वे ट्रॅकवरील मृत्यू कमी होतील

मुंबई उपनगरीय रेल्वे परिसरात दररोज सुमारे 80 लाख लोक प्रवास करतात. जे ट्रेन्स आणि रेल्वे प्लॅटफॉर्मच्या क्षमतेच्या पलीकडे आहे. या गर्दीत, लोकं वेळ वाचवण्यासाठी बेकायदेशीरपणे रेल्वे रूळ ओलांडतात, आणि आपला जीव धोक्यात घालतात. 2010 ते 2019 या कालावधीत मुंबई उपनगरीय रेल्वे परिसरात सरासरी 3,800 लोकांचा अपघाती मृत्यू झाला आहे. 2013 ते 2018 या कालावधीत मुंबईच्या मध्य आणि पश्चिम रेल्वे क्षेत्रात 2,515 लोकांचा फक्त रेल्वे रूळ ओलांडताना मृत्यू झाला आहे. मात्र, अधिक रेल्वे पुलांमुळे गेल्या काही वर्षांपासून हा मृत्यूंचा आकडा कमी होत आहे. अधिक पादचारी पुलांमुळे प्रवाशांची सोय होईल.

2012 च्या निरीक्षणानुसार, ज्या स्थानकांमध्ये रेल्वे ट्रॅक क्रॉसिंगमुळे जास्त मृत्यू झाले ते म्हणजे- कुर्ला, कांजूरमार्ग, ठाणे, ठाकुर्ली, कल्याण, दादर, कांदिवली, बोरिवली, भाईंदर, वसई रोड आणि नालासोपारा.

इतर बातम्या

PM Modi: जेव्हा नरेंद्र मोदींनी माजी पंतप्रधानांचा हात हातात घालून खुर्ची दाखवली

CBSE Class 10 Answer Key 2021 : सीबीएसई दहावीच्या सामाजिक शास्त्र विषयाची उत्तरतालिका कुठं पाहणार? डाऊनलोड कशी करणार?

VIDEO: अनिल देशमुख-सचिन वाझे भेटले, 10 मिनिटे बोलले; वसुली प्रकरणाला टर्न मिळणार?

बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो.
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं.
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!.
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.