AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Mumbai Rains Maharashtra Weather : पुढचे 4 दिवस राज्यात मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा इशारा, कुठे कुठे ‘बरसात’?

राज्यात पावसाने पुन्हा एकदा कमबॅक केलंय. गेले दोन ते तीन दिवस राज्याच्या विविध भागांत पावसाच्या सरी कोसळत आहेत. पावसाचा हाच मूड पुढच्या तीन ते चार दिवस असेल, असा अंदाज आयएमडीने वर्तवला आहे.

Mumbai Rains Maharashtra Weather :  पुढचे 4 दिवस राज्यात मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा इशारा, कुठे कुठे 'बरसात'?
Rain Update
| Edited By: | Updated on: Sep 06, 2021 | 10:06 AM
Share

मुंबई :  राज्यात पावसाने पुन्हा एकदा कमबॅक केलंय. गेले दोन ते तीन दिवस राज्याच्या विविध भागांत पावसाच्या सरी कोसळत आहेत. पावसाचा हाच मूड पुढच्या तीन ते चार दिवस असेल, असा अंदाज आयएमडीने वर्तवला आहे. 9 सप्टेेंबरपर्यंत राज्यात मुसळधार ते अतीमुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे.

राज्यात 5 ते 9 सप्टेंबर दरम्यान गडगडाटासह मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा इशारा काल पुन्हा IMD ने दिला आहे. खास करून मराठवाडा, मध्य महाराष्ट्र, कोकणात पावसाचा प्रभाव सर्वदूर असेल. 7 आणि 8 सप्टेंबरला कोकण, मध्य महाराष्ट्र तीव्रता जास्त असेल. सोबत मुंबई, ठाणे, पालघर, रायगड, नाशिक, पुणे सातारा, रत्नागिरी ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे.

पुढचे चार दिवस राज्यात जोरदार पाऊस हजेरी लावण्याची शक्यता आहे. राज्यात मान्सून वापसीचे संकेत मानले जात आहेत. रविवार राज्यात पश्चिम महाराष्ट्र आणि कोकण पट्ट्यात हळूहळू पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे. आज रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्याला ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. या दोन जिल्ह्यांत उद्या अनेक ठिकाणी मुसळधार तर काही ठिकाणी तीव्र मुसळधार पावसाची शक्यता आहे.

पुढचे तीन दिवस पावसाची परिस्थिती कशी असणार?

भारतीय हवामानशास्त्र विभागाच्या माहितीनुसार, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, लातूर, परभणी, नांदेड, हिंगोली या जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट तर 7 सप्टेंबर रोजी मुंबई, ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, कोल्हापूर, सातारा, पुणे, नाशिक, औरंगाबाद, जालना या जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे.

8 सप्टेंबर रोजी पालघर, रायगड, रत्नागिरी, सातारा, पुणे या जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट देण्यात आलेला आहे. या काळात किनारपट्टीवरच्या मच्छीमारांना सावधानगिरीचा इशारा देण्यात आला आहे.

पुढील 3 दिवस देखील मराठवाड्यात जोरदार पावसाची शक्यता आहे. प्रामुख्याने उत्तर मराठवाड्यात 7 सप्टेंबर ते 9 सप्टेंबरपर्यंत काही ठिकाणी मुसळधार ते अतिमुसळधारेचा इशारा हवामान विभागाकडून वर्तवण्यात आला आहे. तर बीडमध्ये देखील मुसळधार पावसाचा अंदाज वर्तविण्यात आलाय.

राज्यात येत्या 4 दिवसांत मुसळधार पावसाचा इशारा

राज्यात येत्या 4 दिवसांत काही ठिकाणी विजांच्या गडगडाटासहित पावसाची शक्यता आहे, तर काही ठिकाणी मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. कोकणात 6 आणि 7 सप्टेंबरला काही ठिकाणी मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता आहे.

(Mumbai Rain Maharashtra Weather update Todays Rain Some District orange and yellow Alert)

हे ही वाचा :

Mumbai Rains Maharashtra Weather : कोकणातील 2 जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट, राज्यात कुठे कुठे पाऊस होणार?

बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो.
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं.
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!.
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.