AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Mumbai Rain : मुंबईकरांंना पावसाळ्यात एका कॉलवर मिळणार मदत; MMRDA कडून नियंत्रण कक्षाची स्थापना

आता पावसाळ्यात मुंबईकरांना एका कॉलवर मदत मिळणार आहे. MMRDA खडून पावसाळ्यानिमित्त नियंत्रण कक्षाची (Control Room) स्थापना करण्यात आली आहे.

Mumbai Rain : मुंबईकरांंना पावसाळ्यात एका कॉलवर मिळणार मदत; MMRDA कडून नियंत्रण कक्षाची स्थापना
मुंबई पाऊस (फाईल फोटो)Image Credit source: TV9
| Edited By: | Updated on: May 31, 2022 | 7:55 PM
Share

मुंबई : पावसाळ्याच्या तोंडावर मुंबईकरांसाठी अत्यंत महत्वाची बातमी आहे. पावसाळ्यात (Rainy season) मुंबईकर जीव मुठीत धरुन असतो. मुंबईत (Mumbai) पावसाचा अंदाज बांधता येत नसल्यामुळे अनेकदा मुंबईकरांची त्रेधातिरपीट उडते. समुद्राला आलेली भरती आणि त्याचवेळी मुंबईत कोसळणारा धो-धो पाऊस, सखल भागात साचलेलं पाणी यामुळे सर्वसामान्य मुंबईकरांना मोठ्या त्रासाला सामोरं जावं लागतं. अनेक भागात तर घरातही पाणी शिरतं. अशावेळी आता पावसाळ्यात मुंबईकरांना एका कॉलवर मदत मिळणार आहे. MMRDA खडून पावसाळ्यानिमित्त नियंत्रण कक्षाची (Control Room) स्थापना करण्यात आली आहे. हा कक्ष 24 तास सुरु असेल.

पावसाळ्यात तुम्ही अडचणीत सापडला असाल तर आता एका कॉलवर तुम्हाला मदत मिळणार आहे. मुंबई आणि उपनगरातील रहिवाशांसाठी MMRDA कडून महत्वाचा निर्णय घेण्यात आलाय. पावसाळ्यात नागरिकांच्या मदतीसाठी नियंत्रण कक्षाची स्थापना करण्यात आली आहे. नियंत्रण कक्षाचे नंबरही MMRDA कडून देण्यात आले आहेत.

नियंत्रण कक्ष नंबर –

>> 022- 26591241 >> 022- 26594176 >> 8557402090

>> टोल फ्री – 1800228801

धरणांवरील अधिकारी, कर्मचाऱ्यांना महत्वाचे निर्देश

दुसरीकडे पावसाळयात धरणांमधून होणारा पाण्याचा विसर्ग हा नेहमीच महत्वाचा मुद्दा असतो. पूर नियंत्रण जलसंपदा विभागाचे अधिकारी नियोजनाने व्यवस्थितरित्या पार पाडू शकतात. त्यादृष्टीने संबंधित अभियंत्यांनी या काळात कोणत्याही परिस्थितीत धरणाच्या जागेवरच राहावे आणि मुख्य अभियंता यांच्या परवानगीशिवाय मुख्यालय अजिबात सोडू नये, असे निर्देश आजच्या मान्सूनपूर्व आढावा बैठकीत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिले.

धरण क्षेत्रातील नागरिकांना आगाऊ सूचना मिळणार

पूर नियंत्रणाच्या दृष्टीने धरणातून किती पाणी कसे सोडण्यात येत आहे ते सर्वसामान्यांना रियल टाईम कळावे म्हणून जलसंपदा विभागाने यंत्रणा विकसित केली आहे. त्याद्वारे धरण क्षेत्रातील, परिसरातील नागरिकांना आगाऊ सूचनाही मिळणार आहेत. विशेष म्हणजे कुणीही व्यक्ती ही माहिती जलसंपदा विभागाच्या वेबसाईटवरून 15 जूनपासून लाईव्ह पाहू शकणार आहे. तंत्रज्ञानाचा अवलंब करून ही यंत्रणा उभारल्याबद्धल मुख्यमंत्र्यांनी समाधान व्यक्त केले. तसंच गेल्या वर्षी चिपळूण पुरानंतर आपण आढावा घेऊन यासंदर्भात दिलेल्या सूचनेप्रमाणे ही यंत्रणा सुरू होत आहे याचा निश्चित उपयोग होईल, असंही मुख्यमंत्री यावेळी म्हणाले.

Follow Us
मोदी सरकार आहे तोपर्यंत कोणी भारताची एक इंचही भूमी बळकावू शकत नाही
मोदी सरकार आहे तोपर्यंत कोणी भारताची एक इंचही भूमी बळकावू शकत नाही.
समन्स म्हणजे अंतिम निर्णय नाही, तपासानंतर पुढील कारवाई ठरते- बावनकुळे
समन्स म्हणजे अंतिम निर्णय नाही, तपासानंतर पुढील कारवाई ठरते- बावनकुळे.
डोंबिवलीत ठाकरे गटाला धक्का; प्रकाश तेलगोटे यांचा भाजपमध्ये पक्षप्रवेश
डोंबिवलीत ठाकरे गटाला धक्का; प्रकाश तेलगोटे यांचा भाजपमध्ये पक्षप्रवेश.
इंदापुरात राष्ट्रवादीच्या बॅनवरून सुनेत्रा पवार यांचाच फोटो गायब...
इंदापुरात राष्ट्रवादीच्या बॅनवरून सुनेत्रा पवार यांचाच फोटो गायब....
राज्यात गॅस तुटवडा; रिक्षाचालकांच्या शिरसाट यांच्या घराबाहेर रांगा
राज्यात गॅस तुटवडा; रिक्षाचालकांच्या शिरसाट यांच्या घराबाहेर रांगा.
अशोक खरात प्रकरणात रुपाली चाकणकर SIT कडून चौकशीसाठी समन्स
अशोक खरात प्रकरणात रुपाली चाकणकर SIT कडून चौकशीसाठी समन्स.
भोंदू खरात प्रकरणाची विशेष कोर्टात सुनावणी; SIT अधिकाऱ्यांकडून....
भोंदू खरात प्रकरणाची विशेष कोर्टात सुनावणी; SIT अधिकाऱ्यांकडून.....
भोंदूबाबा खरात प्रकरणात 11 गुन्हे दाखल, कोर्टात SIT कडून पुन्हा दोन...
भोंदूबाबा खरात प्रकरणात 11 गुन्हे दाखल, कोर्टात SIT कडून पुन्हा दोन....
अशोक खरातला केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यापर्यंत कोण घेऊन गेले?
अशोक खरातला केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यापर्यंत कोण घेऊन गेले?.
खरातच्या संपर्कात अनेक बडे नेते, राऊतांच्या आरोपांनंतर राजकारण तापले
खरातच्या संपर्कात अनेक बडे नेते, राऊतांच्या आरोपांनंतर राजकारण तापले.