AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मुंबईकर आज पाहणार समुद्राचं रौद्ररूप; मुंबईत अतिमुसळधार पावसाचा इशारा

मुंबईकरांसाठी महत्त्वाची बातमी आहे, समुद्राला आलेल्या भरतीमुळे आज संध्याकाळी दहा वाजता समुद्रात 5 ते 6 मिटर उंचीच्या लाटा उसळणार आहेत, कोणीही समुद्राच्या जवळ जाऊ नये, असा इशारा देण्यात आला आहे.

मुंबईकर आज पाहणार समुद्राचं रौद्ररूप; मुंबईत अतिमुसळधार पावसाचा इशारा
Image Credit source: tv9 marathi
| Updated on: May 23, 2025 | 4:57 PM
Share

राज्यात अवकाळी पावसाचा कहर सुरूच आहे,  अवकाळी पावसानं महाराष्ट्राला झोडपून काढलं आहे. राज्यात अनेक ठिकाणी मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस सुरू आहे. या पावसाचा मोठा फटका हा शेतकऱ्यांना बसला आहे, फळबागांचं मोठं नुकसान झालं आहे. ऐन हातातोंडाशी आलेला घास निसर्गानं हिरावून घेतल्यानं बळीराजा हवालदिल झाला आहे. दुसरीकडे चाकरमान्यांचे देखील हाल सुरूच आहेत.

दरम्यान आता मुंबईकरांसाठी महत्त्वाची बातमी आहे. मुंबईसाठी हवामान खात्याकडून हाय अलर्ट जारी करण्यात आला आहे.  समुद्राला येणाऱ्या भरतीमुळे आज रात्री दहा वाजत समुद्र रौद्ररूप धारण करणार आहे,  समुद्रात भरतीमुळे आज चार ते पाच मिटर उंच लाटा उसळणार आहेत.  त्यामुळे या काळात नागरिकांनी समुद्राच्या जास्त जवळ जाण्याचे धाडस करू नये, असं आवाहन महापालिकेच्या वतीनं करण्यात आलं आहे.

मुंबईत पावसाचा इशारा  

मुंबई आणि उपनगरांमध्ये गेल्या काही दिवसांपासून पाऊस सुरूच आहे. या पावसामुळे नागरिकांचे चांगलेच हाल झाले आहेत. दरम्यान आज पुन्हा एकदा मुंबईत हवामान खात्याकडून मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. या सर्व पार्श्वभूमीवर हवामान खात्याकडून सतर्कतेच आवाहन करण्यात आलं आहे.

दरम्यान कोकण आणि गोवा किनार पट्टीवर कमी दाबाचा पट्टा निर्माण झाला आहे. पुढील 36 तासांमध्ये हा कमी दाबाचा पट्टा अधिक तीव्र होण्याची शक्यता आहे. त्यामुळे पुढील 36 तासांमध्ये महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांमध्ये मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर कोकणातील अनेक जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. तसेच मराठवाडा आणि विदर्भात देखील पावसाची शक्यता आहे.

मान्सून वेळेपूर्वीच दाखल होण्याची शक्यता 

दुसरीकडे यंदा मान्सून वेळेपूर्वीच दाखल होण्याची शक्यता आहे. 25 मे पर्यंत केरळात मान्सूनची एन्ट्री होऊ शकते असं हवामान खात्यानं म्हटलं आहे.  2009 मध्ये मान्सून वेळेपूर्वीच दाखल झाला होता, त्यानंतर आता तब्बल 16 वर्षांनी मान्सूनचं वेळेपूर्वी आगमन होण्याची शक्यता आहे. येत्या 25 मे रोजी मान्सून केरळमध्ये दाखल होईल, त्यांनंतर हळहळू मान्सून संपूर्ण देश व्यापेल असा अंदाज वर्तवण्यात आला आहे. यंदा पावसाचं प्रमाण हे सरासरी पेक्षा अधिक असणार आहे. देशात यंदा 107  टक्क्यांच्या आसपास पाऊस पडण्याची शक्यता आहे, असा अंदाज हवामान खात्याकडून वर्तवण्यात आला आहे.

'स्टाईल वापरुन काही होत नाही, कतृत्व...',आदित्य यांना महाजन यांचा टोला
'स्टाईल वापरुन काही होत नाही, कतृत्व...',आदित्य यांना महाजन यांचा टोला.
माजी मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांचा पणतू,पालिका निवडणूकीच्या रिंगणात
माजी मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांचा पणतू,पालिका निवडणूकीच्या रिंगणात.
मुंबईत आम्हाला 14-15 जागा मिळाल्या पाहिजेत, रामदास आठवले यांची मागणी
मुंबईत आम्हाला 14-15 जागा मिळाल्या पाहिजेत, रामदास आठवले यांची मागणी.
अशोक चव्हाण यांना भाजपा हिरवा करायचाय, प्रताप पाटील चिखलीकर यांचा आरोप
अशोक चव्हाण यांना भाजपा हिरवा करायचाय, प्रताप पाटील चिखलीकर यांचा आरोप.
मुंबईचा महापौर उत्तर भारतीय होणार, सुनील शुक्ला यांचा दावा
मुंबईचा महापौर उत्तर भारतीय होणार, सुनील शुक्ला यांचा दावा.
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आली तर काँग्रेस स्वबळावर लढेल - वडेट्टीवार
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आली तर काँग्रेस स्वबळावर लढेल - वडेट्टीवार.
काँग्रेसमध्ये आलो तरी शरद पवार कायम श्रद्धास्थानी - प्रशांत जगताप
काँग्रेसमध्ये आलो तरी शरद पवार कायम श्रद्धास्थानी - प्रशांत जगताप.
जळगाव महापालिकेत प्रतिनिधीत्व द्या, बारा बुलतेदार महासंघाची मागणी
जळगाव महापालिकेत प्रतिनिधीत्व द्या, बारा बुलतेदार महासंघाची मागणी.
याक्षणी आम्ही मुंबई पालिकेत 115 जागा जिंकत आहोत, संजय राऊत यांचा दावा
याक्षणी आम्ही मुंबई पालिकेत 115 जागा जिंकत आहोत, संजय राऊत यांचा दावा.
पुण्यात दोन्ही राष्ट्रवादीची युती होणार की नाही? काकडे काय म्हणाले
पुण्यात दोन्ही राष्ट्रवादीची युती होणार की नाही? काकडे काय म्हणाले.