AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Corona | मुंबई-ठाण्यात थिएटरचालकांचा आडमुठेपणा, शासनाच्या आदेशानंतरही तिकीटविक्री सुरु

सायन भागातील पीव्हीआर, ठाण्यातील सिनेमॅक्स थिएटरमध्ये शासनाच्या आदेशाला केराची टोपली दाखवत तिकीट विक्री सुरु ठेवण्यात आली Mumbai Theater open after Corona Advisory

Corona | मुंबई-ठाण्यात थिएटरचालकांचा आडमुठेपणा, शासनाच्या आदेशानंतरही तिकीटविक्री सुरु
| Updated on: Mar 14, 2020 | 3:42 PM
Share

मुंबई : मुंबई, नवी मुंबई, ठाणे, पुणे, पिंपरी चिंचवड आणि नागपुरातील नाट्यगृह आणि सिनेमागृहं पुढील काही दिवस बंद ठेवण्याचे आदेश राज्य सरकारने दिल्यानंतरही काही थिएटरचालकांचा आडमुठेपणा सुरु आहे. कोरोनाच्या प्रसाराच्या पार्श्वभूमीवर सूचना जारी करण्यात आल्यानंतरही मुंबईतील काही थिएटरमध्ये तिकीट विक्री सर्रासपणे सुरु होती. (Mumbai Theater open after Corona Advisory)

सायन भागातील पीव्हीआर, ठाण्यातील सिनेमॅक्स थिएटरमध्ये शासनाच्या आदेशाला केराची टोपली दाखवत तिकीट विक्री सुरु ठेवण्यात आली. मराठी चित्रपट निर्मात्यांनी शासनाचा आदेश प्रामाणिकपणे मानून तिकीट विक्री थांबवली. मात्र ‘अंग्रेजी मीडियम’, ‘बागी 3’ यासारख्या हिंदी सिनेमांची तिकीट विक्री सकाळच्या वेळेस सुरुच होती. ‘टीव्ही9 मराठी’च्या प्रतिनिधींनी विचारणा केल्यानंतर आधी उडवाउडवीची उत्तरं देण्यात आली. त्यानंतर काही वेळाने तिकीट विक्री थांबवण्यात आली.

कोरोनाग्रस्त रुग्ण आढळलेल्या मुंबई, ठाणे, पुणे, नागपुरातील सिनेमागृहे, नाट्यगृहे, जिम आणि स्विमिंग पूल मध्यरात्रीपासून बंद ठेवण्याचा निर्णय मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी काल जाहीर केला. खबरदारीचा उपाय म्हणून पिंपरी चिंचवड आणि पुण्यातील शाळाही बंद ठेवण्यात आल्या आहेत. फक्त दहावी आणि बारावीच्या परीक्षा सुरु राहणार असून पर्यायाने शिक्षक आणि शालेय कर्मचाऱ्यांनाही शाळेत हजेरी लावणं अनिवार्य आहे.

दरम्यान, पुणे आणि पिंपरी चिंचवड परिसरातील मल्टिप्लेक्स बंद ठेवण्यात आले आहेत. पुण्यातील एकूण 39 मल्टिप्लेक्स बंद राहणार आहेत. या व्यवसायातून दर आठवड्याला होणारी आठ कोटी रुपयांची उलाढाल ठप्प होणार आहे. दर आठवड्याला एका थिएटरची उलाढाल 20 ते 25 लाखांच्या आसपास आहे. त्याचाही फटका चित्रपटगृहाच्या मालकांना बसणार आहे. या निर्णयामुळे आगामी सूर्यवंशी आणि 83 या दोन मोठ्या चित्रपटांचे प्रदर्शन पुढे ढकलण्यात आले आहे. (Mumbai Theater open after Corona Advisory)

महाराष्ट्रात कोरोनाग्रस्त रुग्णांची संख्या 19 वर पोहचली आहे. अहमदनगरमध्ये कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळल्यामुळे आकडा वाढला.

कोरोनाचे कुठे किती रुग्ण 

  • पुणे – 10
  • नागपूर – 3
  • मुंबई – 4
  • ठाणे – 1
  • अहमदनगर – 1

महाराष्ट्रात कुठे आणि कधी कोरोनाचे रुग्ण आढळले? 

      1. पुण्यातील दाम्पत्य (2) – 9 मार्च
      2. पुण्यातील दाम्पत्याची मुलगी (1) – 10 मार्च
      3. पुण्यातील कुटुंबाचा नातेवाईक (1)– 10 मार्च
      4. पुण्यातील कुटुंबाला नेणारा टॅक्सी चालक (1)– 10 मार्च
      5. मुंबईतील सहप्रवासी (2) – 11 मार्च
      6. नागपूर (1) – 12 मार्च
      7. पुणे (1) – 12 मार्च
      8. पुणे (3) – 12 मार्च
      9. ठाणे (1) – 12 मार्च
      10. मुंबई (1) – 12 मार्च
      11. नागपूर (2) – 13 मार्च
      12. पुणे (1) – 13 मार्च
      13. अहमदनगर (1) – 13 मार्च
      14. मुंबईत (1) – 13 मार्च

Mumbai Theater open after Corona Advisory

Follow Us
रिक्षा-टॅक्सी चालकांचा सरकारविरोधात आक्रमक पवित्रा
रिक्षा-टॅक्सी चालकांचा सरकारविरोधात आक्रमक पवित्रा.
सकाळी 9 वाजेपर्यंत तामिळनाडू आणि पश्चिम बंगालमध्ये किती टक्के मतदान?
सकाळी 9 वाजेपर्यंत तामिळनाडू आणि पश्चिम बंगालमध्ये किती टक्के मतदान?.
स्वतःवरच गुन्हा दाखल करणार? राऊतांचा भाजप सरकारला सवाल
स्वतःवरच गुन्हा दाखल करणार? राऊतांचा भाजप सरकारला सवाल.
पवार कुटुंबातील हे दोन तरुण नेते एकमेकांविरोधात लढणार?
पवार कुटुंबातील हे दोन तरुण नेते एकमेकांविरोधात लढणार?.
अजित पवार विमान अपघात प्रकरणात नवा ट्विस्ट; जय पवारांचे ते विधान काय?
अजित पवार विमान अपघात प्रकरणात नवा ट्विस्ट; जय पवारांचे ते विधान काय?.
खरगेंच्या त्या वक्तव्यावरून राजकारण तापलं; फडणवीसांचा निषेध
खरगेंच्या त्या वक्तव्यावरून राजकारण तापलं; फडणवीसांचा निषेध.
वाल्मिक कराड गँगची कारागृहातही दहशत! थेट कैद्यालाच मारलं अन्...
वाल्मिक कराड गँगची कारागृहातही दहशत! थेट कैद्यालाच मारलं अन्....
कोकणात भयंकर घडलं, भर समुद्रात नौका बुडाली, कोट्यवधीचं नुकसान; अपघात..
कोकणात भयंकर घडलं, भर समुद्रात नौका बुडाली, कोट्यवधीचं नुकसान; अपघात...
उष्णतेचा कहर! उष्माघाताने शेतकऱ्याचा दुर्दैवी मृत्यू,
उष्णतेचा कहर! उष्माघाताने शेतकऱ्याचा दुर्दैवी मृत्यू,.
आता सगळ्याच IT कंपन्या रडारवर, नाशिकच्या प्रकरणानंतर सरकारचं मोठं पाऊल
आता सगळ्याच IT कंपन्या रडारवर, नाशिकच्या प्रकरणानंतर सरकारचं मोठं पाऊल.