AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

फेरीवाल्यांची दादागिरी, किरकोळ कारणावरुन आयटी इंजिनिअरला जबर मारहाण

Mumbai and Thane News | मुंबई आणि ठाणे जिल्ह्यात फेरीवाल्यांची दादागिरी नेहमी होत असते. मनसे यासंदर्भात आक्रमक होते. आता पुन्हा डोंबिवलीमध्ये फेरीवाल्यांनी मारहाण केल्याचा प्रकार समोर आला आहे. एका आयटी इंजिनिअर तरुणाने डोंबिवली स्टेशन स्कायवॉकवर फेरीवाल्याचा धक्का लागला. यामुळे त्याला मारहाण झाली.

फेरीवाल्यांची दादागिरी, किरकोळ कारणावरुन आयटी इंजिनिअरला जबर मारहाण
| Updated on: Dec 24, 2023 | 7:46 AM
Share

सुनिल जाधव, डोंबिवली, दि.24 डिसेंबर | मुंबई आणि ठाणे जिल्ह्यांत फेरीवाल्यांची दादागिरी सुरु असते. फुटपाथ व्यापलेल्या या फेरीवाल्यांवर महानगरपालिका कारवाई करत नाही किंवा पोलिसांकडूनही काही होत नाही. यामुळे सर्वसामान्यांना फुटपाथवरुन चालणे अवघड होत असते. तसेच किरकोळ कारणावरुन मारहाणीच्या अनेक घटना घडत असतात. डोंबिवलीत पुन्हा फेरीवाल्यांची दादागिरी समोर आली आहे. एका आयटी इंजिनिअर तरुणाने डोंबिवली स्टेशन स्कायवॉकवर फेरीवाल्याचा धक्का लागला. यामुळे फेरीवाल्याला जाब विचारला. या गोष्टीचा राग मनात धरुन चार ते पाच फेरीवाल्यांनी मिळून त्या तरुणाला बेदम मारहाण केल्याची घटना घडली आहे. या प्रकरणी तरुणाने डोंबिवली रामनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.

लोकांनी सोडवले अन्यथा…

डोंबिवली पूर्वे श्रीखंडेवाडी परिसरात सुधीर पगारे हा तरुण त्याच्या कुटुंबासह राहतो. तो काही कामानिमित्त डोंबिवली स्टेशन मधूबंद टॉकीज परिसरात गेला होता. त्याठिकाणाहून जात असताना एका फेरीवाल्याचा धक्का लागला. सुधीर याने त्याला जाब विचारला. या जाब विचारल्याच्या रागात चार ते पाच फेरीवाल्यांनी सुधीर याला पकडून त्याला मारहाण केली. काही प्रवाशांनी मध्यस्थी करून सुधीर पगारे याला सोडवले. अन्यथा मोठी दुर्घटना घडली असती. या नंतर सुधीर पगार याने पोलीस स्टेशन गाठले. पोलिसांनी गुन्हा दाखल केला.

फेरीवाला मुक्त फुटपाथ घोषणा हवेत विरली

नव्या केडीएमसी आयुक्त यांनी फेरीवाला आणि रस्त्यांसंदर्भात स्टेशन परिसर फेरीवाला मुक्त मिळेल, अशी आश्वासन दिले होते. मात्र या घटनेने या मनपाची पोलखोल केली आहे. सर्वसामान्य व्यक्ती कर भरतो, परंतु त्याच्या शहरातील फूटपाथ त्याला वापरता येत नाही. फूटपाथवरुन चालता येत नाही. कारण फूटपाथवर फेरीवाले बसतात. मला त्याचा फायदा काय. महापालिका काय करते. असा संतप्त सवाल या पीडित तरुणाने पालिकेला करला आहे.

फेरीवाल्यांपुढे पालिका हतबल

रामनगर पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरिक्षक नितीन गीते सांगितले की, या प्रकरणात अदखलपात्र गुन्हा दाखल केला आहे. मारहाण करणाऱ्या फेरीवाल्यांचा शोध सुरु आहे. केडीएमसीच्या नव्या आयुक्त डॉक्टर इंदूराणी जाखड यानी स्टेशन परिसर फेरीवाला मुक्त करण्यासाठी शहराला वा’केबल सिटी करण्यासाठी जे काही करता येईल. ते आम्ही करणार असा दावा केला होता. परंतु त्यांच्या या दाव्याची फोलखोल झाली आहे. फेरीवाल्यांसमोर महापालिका प्रशासन हतबल झाले आहे. राजकीय पक्षांनी देखील आपली तलवार म्यान केली आहे.

Follow Us
'...तर कॅबिनेट मंत्री पद मिळाले असते, पण,'...काय म्हणाले योगेश कदम?
'...तर कॅबिनेट मंत्री पद मिळाले असते, पण,'...काय म्हणाले योगेश कदम?.
जुन्या वादातून शेजाऱ्यांनी 7 वर्षांच्या मुलीला संपवले, पलंगात मृतदेह..
जुन्या वादातून शेजाऱ्यांनी 7 वर्षांच्या मुलीला संपवले, पलंगात मृतदेह...
भोंदूबाबाचे साटेलोटे, मुलीसोबत उपजिल्हाधिकाऱ्याच्या पतीची जमीन खरेदी
भोंदूबाबाचे साटेलोटे, मुलीसोबत उपजिल्हाधिकाऱ्याच्या पतीची जमीन खरेदी.
भोंदूबाबाच्या विरोधात आणखी एका महिलेची तक्रार,निर्लज्जतेचा कळसच गाठला
भोंदूबाबाच्या विरोधात आणखी एका महिलेची तक्रार,निर्लज्जतेचा कळसच गाठला.
भोंदूबाबा खरात याला एसआयटीने अज्ञातस्थळी हलवले, काय नेमके कारण?
भोंदूबाबा खरात याला एसआयटीने अज्ञातस्थळी हलवले, काय नेमके कारण?.
उद्धव ठाकरे यांचे मातोश्रीत खासदारांशी गुफ्तगू , डॅमेज कंट्रोलसाठी ?
उद्धव ठाकरे यांचे मातोश्रीत खासदारांशी गुफ्तगू , डॅमेज कंट्रोलसाठी ?.
चाकणकरांना खरात लिंग पिसाट आहे हे माहिती होते, तृप्ती देसाई यांचा आरोप
चाकणकरांना खरात लिंग पिसाट आहे हे माहिती होते, तृप्ती देसाई यांचा आरोप.
अशोक खरातला धरणाचे पाणी कोणी दिलं ? मुख्यमंत्र्यांनी काय दिला इशारा?
अशोक खरातला धरणाचे पाणी कोणी दिलं ? मुख्यमंत्र्यांनी काय दिला इशारा?.
भोंदूबाबाला जमीन विकल्यानंतर मुलगा आणि पैसेही गेले,शेतकऱ्याने सांगितले
भोंदूबाबाला जमीन विकल्यानंतर मुलगा आणि पैसेही गेले,शेतकऱ्याने सांगितले.
दर अमावस्या आणि पौर्णिमेला खरात गावात यायचा, गावकऱ्यांनी मांडली व्यथा
दर अमावस्या आणि पौर्णिमेला खरात गावात यायचा, गावकऱ्यांनी मांडली व्यथा.