AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

इतिहासात पहिल्यांदाच ‘राजभवन’मधून भाजप कार्यालय सुरू; नाना पटोलेंची खोचक टीका

राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना लिहिलेल्या पत्रावरून सुरू असलेली टीका टिप्पणी अजूनही सुरूच आहे. आता काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी राज्यपालांवर निशाणा साधला आहे. (nana patole)

इतिहासात पहिल्यांदाच 'राजभवन'मधून भाजप कार्यालय सुरू; नाना पटोलेंची खोचक टीका
Nana Patole
| Edited By: | Updated on: Jul 01, 2021 | 2:35 PM
Share

मुंबई: राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना लिहिलेल्या पत्रावरून सुरू असलेली टीका टिप्पणी अजूनही सुरूच आहे. आता काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी राज्यपालांवर निशाणा साधला आहे. महाराष्ट्राच्या इतिहासात पहिल्यांदाच राजभवनमधून भाजपचे कार्यालय सुरू असल्याची खोचक टीका नाना पटोले यांनी केली आहे. (nana patole taunt governor Bhagat Singh Koshyari over letter to cm uddhav thackeray)

नाना पटोले यांनी ‘टीव्ही 9 मराठी’शी संवाद साधताना ही टीका केली. देवेंद्र फडणवीस यांनी राज्यपालांना पत्र दिले. त्याची दखल घेवून राज्यपालांनी मुख्यमंत्र्यांना पत्र दिले. महाराष्ट्राच्या इतिहासात पहिल्यांदाच राजभवनमधून भाजपचे कार्यालय चालत आहे, अशी टीका पटोले यांनी केली.

निर्णय हायकमांड घेणार

यावेळी पटोले यांनी विधानसभा अध्यक्षापदाबाबतही भाष्य केलं. काँग्रेसचे महाराष्ट्राचे प्रभारी एच. के. पाटील मुंबईत आहेत. ते राज्यातील काँग्रेसच्या आमदारांसोबत चर्चा करतील. त्यानंतर अध्यक्षपदाचं नाव हायकमांडकडे पाठवलं जाईल. त्यावर हायकमांड निर्णय घेईल, असं त्यांनी स्पष्ट केलं.

तपास यंत्रणा बोथट होताहेत

अॅड. परमार यांनी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारमधील मंत्र्यावर आरोप केले होते. त्यावेळी ईडी किंवा सीबीआय आडवी येत नव्हती. फडणवीस त्यावेळी प्रत्येकाला निर्दोष असल्याचं सर्टिफिकेट देत होते, असं सांगतानाच सध्या मोदींचे सरकार केंद्रीय तपास यंत्रणांचा दुरुपयोग करून त्यांना बोथट करण्याचे पाप करत आहे, असा आरोपही त्यांनी केला.

वाझेप्रकरणात घटना तशाच कशा घडल्या?

यावेळी त्यांनी सचिन वाझे प्रकरणावरही मोठं भाष्य केलं. वाझे प्रकरणात जी स्क्रीप्ट फडणवीस यांनी वाचून दाखवली त्याच घटना कशा घडल्या? हे बीजेपीचे षडयंत्र होते का असे चित्र निर्माण झाले आहे. यावरून आम्ही भाजपाला आरोपीच्या पिंजर्‍यात उभे करू, विरोधकांना त्याबाबतचा जाब विचारू, असं ते म्हणाले.

कृषी कायदा सार्वजनिक करा

शेतकरी कायदा विधीमंडळात आणण्यापूर्वी पब्लिक डोमेनमध्ये टाकावा जेणेकरुन शेतकऱ्यांना हवा तसा कायदा करता येईल अशी आमची मागणी राहील, असंही त्यांनी सांगितलं. (nana patole taunt governor Bhagat Singh Koshyari over letter to cm uddhav thackeray)

संबंधित बातम्या:

VIDEO: राज्यपालांना आम्हाला स्मरण करून द्यायची गरज काय?; ‘त्या’ पत्रावरून संजय राऊतांचा सवाल

ओबीसी आरक्षण राज्याच्या नव्हे, सुप्रीम कोर्टाच्या आदेशाने रद्द; नवाब मलिकांचा राज्यपालांना टोला

केंद्राला काय करायचं ते करू द्या, शेतकऱ्यांच्या हिताला धक्का लागू देणार नाही: मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

(nana patole taunt governor Bhagat Singh Koshyari over letter to cm uddhav thackeray)

बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो.
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं.
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!.
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.