AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

ज्यांनी सावरकरांना शिव्या दिल्या, त्यांनी माफी मागितली का?; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा सवाल

Narendra Modi in Mumbai: भारताचे महान सुपुत्र वीर सावरकरांना त्यांच्याकडून शिव्या दिल्या जातात. अपमानित केले जाते. देशभक्तांच्या भावनांचा चुरडा केले जाते. त्यांच्याकडून वारंवार वीर सावरकरांचा अपमान करूनही माफी मागत नाही. उलट ते कोर्टात जातात, पण त्यांना पश्चात्ताप होत नाही.

ज्यांनी सावरकरांना शिव्या दिल्या, त्यांनी माफी मागितली का?; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा सवाल
नरेंद्र मोदी
| Updated on: Aug 30, 2024 | 3:37 PM
Share

मालवण येथील शिवजी महाराज पुतळा कोसळ्याप्रकरणी महाविकास आघाडीकडून राज्यभरात आंदोलन उभारले जात आहे. या प्रकरणात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार अन् देवेंद्र फडणवीस यांनी माफी मागितली. त्यानंतर आता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीसुद्धा माफी मागितली. त्याचवेळी स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या प्रकरणावरुन काँग्रेसला घेरले. स्वातंत्र्यवीर सावरकर यांचा वारंवार अपमान केला जातो. परंतु त्यांनी कधी माफी मागितली नाही. उलट ते कोर्टात गेले आहे, असा हल्ला राहुल गांधी यांचे नाव न घेता मोदींनी काँग्रेसवर केला. शिवसेना उबाठाला यामाध्यमातून मोदी यांनी आरसा दाखवला. कारण काँग्रेसच्या सावरकर यांच्या भूमिकेवरुन शिवसेना उबाठाने कधी ठोस भूमिका घेतली नाही.

काय म्हणाले नरेंद्र मोदी

भारताचे महान सुपुत्र वीर सावरकरांना त्यांच्याकडून शिव्या दिल्या जातात. अपमानित केले जाते. देशभक्तांच्या भावनांचा चुरडा केले जाते. त्यांच्याकडून वारंवार वीर सावरकरांचा अपमान करूनही माफी मागत नाही. उलट ते कोर्टात जातात, पण त्यांना पश्चात्ताप होत नाही. हे त्यांचे संस्कार आहे. परंतु आमचे संस्कार वेगळे आहे.

मी महाराष्ट्राच्या भूमीवर आल्यावर शिवाजी महाराजांच्या चरणावर डोके टेकवून माफी मागत आहे. जे लोक शिवाजी महाराजांना अराध्य दैवत मानतात त्यांच्या काळजाला ठेच लागली आहे. या आराध्य दैवतेचे पूजा करणाऱ्यांची मी माफी मागतो. आमचे संस्कार वेगळे आहे. आमच्यासाठी अराध्य दैवतेपेक्षा काहीच मोठे नाही, असे नरेंद्र मोदी यांनी सांगितले.

देशातील सर्वात मोठे पोर्ट होणार

या पोर्टवर ७६ हजार कोटींहून अधिक जास्त रक्कम खर्च करणार आहोत. हे देशातील सर्वात मोठं कंटेनर पोर्ट असेल. देशच नाही तर जगातील सर्वात मोठं पोर्ट असणार आहे. आज देशातील सर्व कंटेनर पोर्टातून जेवढे कंटेनर येतील जातील, संपूर्ण देशातील मी सांगतो, त्याच्यापेक्षा जास्त कंटेनरचं काम एकट्या वाढवण बंदरात होणार आहे. तुम्ही अंदाज लावू शकता, हे पोर्ट महाराष्ट्र आणि देशाच्या व्यापाराचा औद्योगिक प्रगतीचं किती मोठं केंद्र होईल, असे नरेंद्र मोदी यांनी म्हटले.

हे ही वाचा…

पालघरमध्ये तिसरे विमानतळ उभारा; देवेंद्र फडणवीस यांची मोदींकडे मोठी मागणी

Follow Us
महिला आरक्षण विधेयकाला पाठिंबा न देऊन विरोधकांनी... पंतप्रधान नेरेंद्र
महिला आरक्षण विधेयकाला पाठिंबा न देऊन विरोधकांनी... पंतप्रधान नेरेंद्र.
मोठी बातमी! नाशिकच्या धर्मांतरण प्रकरणात मोठी अपडेट, निदा खानच्या त्या
मोठी बातमी! नाशिकच्या धर्मांतरण प्रकरणात मोठी अपडेट, निदा खानच्या त्या.
खरातचा मृत्यू अपघातात किंवा आजरपणामुळे होऊ शकतो; रोहित पवारांचे मोठे व
खरातचा मृत्यू अपघातात किंवा आजरपणामुळे होऊ शकतो; रोहित पवारांचे मोठे व.
मुलींना कॅफेत घेऊन बासायचा अन् तिथेच... अमरावती लैंगिक शोषण प्रकरणातील
मुलींना कॅफेत घेऊन बासायचा अन् तिथेच... अमरावती लैंगिक शोषण प्रकरणातील.
TCS महिला लैंगिक शोषणातील महिला सूत्रधाराने गर्भवती असल्याचं दिलं खोटं
TCS महिला लैंगिक शोषणातील महिला सूत्रधाराने गर्भवती असल्याचं दिलं खोटं.
भाजपनं महिला आरक्षणाच्या नावाखाली एक भोंदू विधेयक आणलं; संजय राऊतांचे
भाजपनं महिला आरक्षणाच्या नावाखाली एक भोंदू विधेयक आणलं; संजय राऊतांचे.
खरात प्रकरणी दीपक लोंढेंची कसून चौकशी, 10 तासांच्या चौकशीत नेमकं काय घ
खरात प्रकरणी दीपक लोंढेंची कसून चौकशी, 10 तासांच्या चौकशीत नेमकं काय घ.
भाजपला धक्का, महिला आरक्षण आणि डिलिमिटेशन विधेयक संसदेत नामंजूर
भाजपला धक्का, महिला आरक्षण आणि डिलिमिटेशन विधेयक संसदेत नामंजूर.
मी ॲक्सिस बँकेत... नाशिकमधील धर्मांतरण प्रकरणावर अमृता फडणवीस स्पष्ट म
मी ॲक्सिस बँकेत... नाशिकमधील धर्मांतरण प्रकरणावर अमृता फडणवीस स्पष्ट म.
खरातच्या ट्रस्टचे उपाध्यक्ष जितेंद्र शेळकेंचा अपघाती मृत्यू, फॉरेन्सिक
खरातच्या ट्रस्टचे उपाध्यक्ष जितेंद्र शेळकेंचा अपघाती मृत्यू, फॉरेन्सिक.