AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

नवी मुंबई विमानतळाला वसंतराव नाईक यांचं नाव द्या, पोहरादेवीचे महंत सुनील महाराजांचं विधान भवन परिसरात आंदोलन

नवी मुंबई विमानतळाच्या नामकरणचा वाद तापलेला असताना विमानताला वसंतराव नाईक यांचं नाव द्यावं या मागणीसाठी पोहरादेवीचे महंत सुनील महाराज विधान भवन परिसरात दाखल झाले आहेत. | Navi Mumbai Airport

नवी मुंबई विमानतळाला वसंतराव नाईक यांचं नाव द्या, पोहरादेवीचे महंत सुनील महाराजांचं विधान भवन परिसरात आंदोलन
नवी मुंबई विमानतळाला वसंतराव नाईक यांचं नाव द्या या मागणीसाठी पोहरादेवीचे महाराज महंत सुनिल महाराज विधान भवन परिसरात दाखल
| Edited By: | Updated on: Jun 23, 2021 | 11:59 AM
Share

मुंबई : नवी मुंबई विमानतळाच्या नामकरणचा वाद तापलेला असताना विमानताला वसंतराव नाईक यांचं नाव द्यावं या मागणीसाठी पोहरादेवीचे महंत सुनील महाराज विधान भवन परिसरात दाखल झाले आहेत. सिडकोची संकल्पना ही माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांची होती. त्यामुळे त्यांचे नाव विमानतळाला द्यावे अशी मागणी पोहरादेवीचे महंत सुनील महाराज यांनी केलीय. (Navi Mumbai Airport name Vasantrao Naik demand Pohardevi Mahant Sunil Maharaj agitation in Vidhan Bhavan area mumbai)

नामकरण वादात बंजारा समाजाची उडी

नवी मुंबई विमानतळाच्या नामकरणाचा वाद शिगेला पोहोचला आहे. नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला दि. बा. पाटील (D. B. Patil) यांचे नाव देण्याची मागणी होत आहे. तर दुसरीकडे महाविकास आघाडीकडून या विमानतळाला दिवंगत शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे नाव देण्यावर ठाम आहे. आता नामकरण वादात बंजारा समाजाने उडी घेतली आहे.

महंत सुनिल महाराज यांच्या नेतृत्वात मुंबईत लक्षवेधी आंदोलन

बंजारा समाजाचे महंत सुनिल महाराज यांच्या नेतृत्वात मुंबईत लक्षवेधी आंदोलन करण्यात येतंय. मुंबईच्या विधानभवन परिसरात असलेल्या वसंतराव नाईक यांच्या पुतळ्याजवळ आंदोलन सुरु होतं. यावेळी विमानतळाला वसंतराव नाईक यांचं नाव दिलंच पाहिजे, अशा घोषणांनी परिसर दणादून गेला होता. मात्र आंदोलनाची परवानगी नसल्याने पोलिसांनी त्यांची अडवणूक केली.

सिडकोची संकल्पना वसंतराव नाईक यांची, त्यामुळे विमानतळाला त्यांचं नाव द्यावं

नवी मुंबई आणि सिडकोची संकल्पना ही माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांची होती. त्यामुळे त्यांचे नाव विमानतळाला द्यावे ही आमची मागणी असल्याचं पोहरादेवीचे महंत सुनील महाराज म्हणाले. आमची मागणी सरकारने मान्य करावी, अशी विनंती त्यांनी राज्य शासनाला केली.

आमदार प्रशांत ठाकूर यांनी घेतली राज ठाकरेंची भेट

नवी मुंबईतील आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या नामांतरच्या मुद्द्यावर भाजप आमदार प्रशांत ठाकूर यांनी नुकतंच राज ठाकरेंची भेट घेतली. यावेळी प्रशांत ठाकूर यांनी नवी विमानतळाला दि बा पाटील यांचे नाव द्यावे, अशी मागणी केली. “नवी विमानतळाला दि. बा. पाटील यांचे नाव द्यावे अशी आमची जुनी मागणी आहे. या मागणीला घेऊन 24 जूनला आम्ही सिडकोला घेराव घालणार आहोत. या आंदोलनाची आणि आमच्या मागणीची राज ठाकरे यांना माहिती दिली, असं प्रशांत ठाकूर यांनी स्पष्ट केलं. त्यानंतर राज ठाकरे यांनी मनसेची भूमिका स्पष्ट करताना विमानतळाला छत्रपती शिवाजी महाराज यांचं नाव देण्यात यावं, अशी भूमिका मांडली.

(Navi Mumbai Airport name Vasantrao Naik demand Pohardevi Mahant Sunil Maharaj agitation in Vidhan Bhavan area mumbai)

हे ही वाचा :

बाळासाहेब की दि. बा. पाटील, नवी मुंबई विमानतळाच्या नावाबाबत राज ठाकरेंनी वस्तूस्थिती मांडली

नवी मुंबई विमानतळाला दि. बा. पाटलांचं नाव देण्याची आग्रही मागणी, रायगड ते नवी मुंबई मानवी साखळी

नवी मुंबई विमानतळासाठी महाविकासआघाडी बाळासाहेब ठाकरे यांच्या नावावर ठाम; तर 18 गावांचा दि. बा. पाटील यांच्या नावावर शिक्कामोर्तब

रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत
रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत.
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त.
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!.
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान.
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर.
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य.
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका.
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल.
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?.
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती.