AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

ईडीविरोधात कोर्टात याचिका, ईडीनं चौकशी केलेल्यांचं पुढं काय?

शिंदे-भाजप सरकार येण्याआधी भावना गवळी, प्रताप सरनाईक, यामिनी जाधव, यशवंत जाधव, अर्जुन खोतकर, आनंदराव अडसूळ या नेत्यांमागे गैरव्यवहाराच्या आरोपात चौकशी लागली.

ईडीविरोधात कोर्टात याचिका, ईडीनं चौकशी केलेल्यांचं पुढं काय?
Govinda Hatwar
Govinda Hatwar | Updated on: Dec 09, 2022 | 11:58 PM
Share

मुंबई : सत्ताबदलाआधी ईडीनं ज्या ज्या नेत्यांची चौकशी केली त्या नेत्यांवरील आरोपांचं पुढं काय झालं. त्यांच्यावरील आरोपांचा तपास कुठंवर पुढं सरकला. त्यासाठी आता ईडी अधिकाऱ्यांच्या विरोधातच याचिका दाखल करण्यात आली आहे. ईडीनं चौकशी केलेल्या आरोपांसंदर्भात चौकशी करून अहवाल देण्याची मागणी करण्यात आली आहे. अनेकांविरोधात चौकशी करण्यात आलेल्या आरोपांसंदर्भात याचिका दाखल करण्यात आली आहे. सत्ताबदलाआधी ईडीनं ज्या नेत्यांची चौकशी केली त्या चौकशीचं सत्ताबदलानंतर काय झालं, असा प्रश्न या याचिकेत आहे.

ईडीच्या अधिकाऱ्यांनी सत्ता बदलानंतर आरोपांचं काय केलं. असा रिपोर्ट सादर करण्याची मागणी या याचिकेत करण्यात आली आहे. ईडीनं काही जुन्या शिवसैनिकांवर कारवाई केली. त्यांना समन्स पाठविले गेले. त्यानंतर शिवसेना फुटली. वेगळा गट स्थापन झाला.

त्यानंतर त्यांनी एकनाथ शिंदे गट जाईन केला. भाजपबरोबर त्यांनी हातमिळवणी केली. त्यानंतर ईडीची कारवाई थांबली. ईडीच्या प्रामाणिकपणावर हा एक प्रश्नचिन्ह निर्माण झाला असल्याचं याचिकाकर्ते म्हणाले.

शिंदे-भाजप सरकार येण्याआधी भावना गवळी, प्रताप सरनाईक, यामिनी जाधव, यशवंत जाधव, अर्जुन खोतकर, आनंदराव अडसूळ या नेत्यांमागे गैरव्यवहाराच्या आरोपात चौकशी लागली. सध्या हे सर्व नेते शिंदे गटात आहेत. आता सरकारचा भाग आहेत.

त्यावेळी किरीट सोमय्या आणि भाजपनं आरोप केले होते. प्रताप सरनाईक यांनी घोटाळा केला आहे. खोतकर यांनी लूट माजविली आहे, असं किरीट सोमय्या म्हणाले होते.

यशवंत जाधव यांच्या चौकशीला गती देण्यात आली होती. किरीट सोमय्या यांनी त्यावेळी पाठपुरावा केला होता. आता काय झालं, असं विरोधक विचारत आहेत. भावना गवळी यांनी १०० कोटी रुपये कुठून काढले कुठं नेले, असा सवालही किरीट सोमय्या त्यावेळी विचारत होते. आता या सर्व चौकशांचं काय झालं, असं याचिकेत म्हटलंय.

Follow Us
बापरे! NEET पेपरफुटीत हे काय घडलं? मॅडमने भलतंच केलं, ॲडमिशन करून...
बापरे! NEET पेपरफुटीत हे काय घडलं? मॅडमने भलतंच केलं, ॲडमिशन करून....
सरकार संवादात अपयशी मराठा आंदोलनावर पवारांनी उपस्थित केले गंभीर प्रश्न
सरकार संवादात अपयशी मराठा आंदोलनावर पवारांनी उपस्थित केले गंभीर प्रश्न.
तटकरे-पटेलांबाबत राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाची पत्रकार परिषद, स्पष्ट...
तटकरे-पटेलांबाबत राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाची पत्रकार परिषद, स्पष्ट....
NEET घोटाळ्यात राज्यातील आणखी एक बायोलॉजी प्राध्यापक अटकेत
NEET घोटाळ्यात राज्यातील आणखी एक बायोलॉजी प्राध्यापक अटकेत.
NCPच्या दिल्ली कार्यालयात तटकरे-पटेल यांच्या नावाच्या पाट्या, मात्र...
NCPच्या दिल्ली कार्यालयात तटकरे-पटेल यांच्या नावाच्या पाट्या, मात्र....
जे कोणाचेच नाहीत, ते कुणाचे राहणार?पवारांचा बड्या नेत्यांवर थेट निशाणा
जे कोणाचेच नाहीत, ते कुणाचे राहणार?पवारांचा बड्या नेत्यांवर थेट निशाणा.
भोंदू खरातला लागली लॉट्री, तुरुंगात असातानाच मिळणार 3 कोटी, नेमकं...
भोंदू खरातला लागली लॉट्री, तुरुंगात असातानाच मिळणार 3 कोटी, नेमकं....
मोठी बातमी! मराठा आरक्षणासाठी पुन्हा आमरण उपोषण...
मोठी बातमी! मराठा आरक्षणासाठी पुन्हा आमरण उपोषण....
मुख्यमंत्रीच सर्वेसर्वा तर मग जबाबदार कोण? जरांगेंचा फडणवीसांवर.......
मुख्यमंत्रीच सर्वेसर्वा तर मग जबाबदार कोण? जरांगेंचा फडणवीसांवर........
होय मी झुरळ आहे आणि मी झुरळच राहणार; अंजली दमानिया असं का म्हणाल्या?
होय मी झुरळ आहे आणि मी झुरळच राहणार; अंजली दमानिया असं का म्हणाल्या?.