AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मालाडमध्ये मेट्रो कामांसाठी घरांवर कारवाई, अनेक कुटुंब भर पावसात बेघर, प्रवीण दरेकरांचा सरकारवर हल्लाबोल

सरकारने मेट्रोच्या कामासाठी मालाड येथील कुरार परिसरातील घरांवर जुलमी पद्धतीने कारवाई केल्याचा आरोप करत प्रविण दरेकर यांनी या कारवाईचा निषेध केलाय.

मालाडमध्ये मेट्रो कामांसाठी घरांवर कारवाई, अनेक कुटुंब भर पावसात बेघर, प्रवीण दरेकरांचा सरकारवर हल्लाबोल
| Edited By: | Updated on: Jul 17, 2021 | 7:32 PM
Share

मुंबई : “सरकारने मेट्रोच्या कामासाठी मालाड येथील कुरार परिसरातील घरांवर जुलमी पद्धतीने कारवाई केली आहे. सामान्य जनतेवर अशा पद्धतीने केलेल्या मनमानीपणाच्या कारवाईचा आम्ही निषेध करीत आहोत. येथील रहिवाशांचे योग्य ठिकाणी पुनर्वसन करून त्यांना पर्यायी घरे सरकारने उपलब्ध करून द्यावीत,” अशी मागणी विधान परिषदेचे विरोधी पक्ष नेते प्रवीण दरेकर यांनी केली. प्रशासनाने मालाड पूर्व येथील दफ्तरी रोड कुरार हायवे, हवा हिरा महल येथील मेट्रोच्या कामासाठी मालाड येथील कुरार परिसरातील घरांवर सकाळी कारवाई केली. त्यानंतर विरोधी पक्ष नेते दरेकर यांनी तातडीने घटनस्थळी भेट दिली. यावेळी ते बोलत होते (Pravin Darekar criticize MVA government over Malad metro work).

ऐन पावसाळ्यात सुरू करण्यात आलेल्या या कारवाईला विरोध करणारे भाजपचे आमदार अतुल भातखळकर यांना पोलिसांना ताब्यात घेतलं. त्यानंतर पोलिसांना आमदार भातखळकर यांना आरे पोलीस ठाण्यात नेले. दरेकर यांनी आरे पोलीस ठाण्यात जाऊन आमदार भातखळकर यांची भेट घेतली. यासंदर्भात बोलताना दरेकर म्हणाले, “जे प्रकल्प देवेंद्र फडणवीस यांच्या कालावधीत मूर्त स्वरूप घेतलेले होते व अंतिम टप्प्यात आले त्यांचे लवकरात लवकर आपल्या हातून उदघाटन व्हावे असे महाविकास आघाडी सरकारला वाटते. त्या प्रकल्पांचे उदघाटन करण्यासाठी साम, दाम, दंड वापरून अशा प्रकारची कारवाई होत आहे. ते अत्यंत चुकीचे आहे.”

“समन्वयाचा अभाव असल्यामुळे लोकांना भर पावसात बेघर व्हावे लागले”

“मेट्रोच्या विकासासाठी किंवा कोणत्याही प्रकल्पाच्या विकासासाठी भारतीय जनता पार्टीचा पाठिंबा असतो. परंतु पावसाळा असल्यामुळे मानवतावादी दृष्टिकोन ठेवला पाहिजे. कारण पाडकाम केले तर रहिवाशांना पर्यायी व्यवस्था करून द्यायला पाहिजे. परंतु या ठिकाणी जुलमी पद्धतीने कारवाई केली गेली आणि अशी पाडकाम कारवाई करणे योग्य नाही. लोकशाहीमध्ये जनतेला न्याय मागण्याचा अधिकार आहे. रहिवाशांना पर्यायी जागा उपलब्ध करून देणे हे महत्वाचे होते. परंतु समन्वयाचा अभाव असल्यामुळे लोकांना भर पावसात बेघर व्हावे लागले. प्रकल्पबाधितांना न्याय मिळवून देण्यासाठी आम्ही त्यांच्या पाठिशी आहोत,” असेही दरेकर यांनी स्पष्ट केले.

हेही वाचा :

पवार-मोदी भेटीत नुसती हवापाण्याची चर्चा होणार नाही, राजकीय चर्चा तर होणारच; दरेकरांनी दिली हवा

राज ठाकरेंनी पक्ष म्हणून सर्वसमावेशक, व्यापक भूमिका घ्यावी; प्रवीण दरेकरांचा सल्ला

राजकीय सूडापोटीच्या कारवाईचा आरोप करणाऱ्यांना ईडीची कारवाई ही चपराक : प्रविण दरेकर

व्हिडीओ पाहा :

Pravin Darekar criticize MVA government over Malad metro work

महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?.
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं..
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं...
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक.