AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

भाजीपाल्याचे दर घसरले, ग्राहकांना दिलासा, शेतकऱ्यांना मात्र फटका बसण्याची शक्यता

अतिवृष्टीमुळे भाजीपाल्याचं मोठं नुकसान झालं होतं. त्यामुळे मार्केटमध्ये भाज्यांची आवक घटली होती. आता ही आवक वाढल्याचं पाहायला मिळत आहे. त्यामुळे मागील आठवड्यात 30 ते 40 रुपये प्रति किलो दराने विकला जाणारा कोबी, कारली, टोमॅटो, दुधी भोपळा, शिमला मिर्ची, लवंगी मिर्ची, काकडी आज 5 ते 10 रुपये किलोने विकला जात आहे.

भाजीपाल्याचे दर घसरले, ग्राहकांना दिलासा, शेतकऱ्यांना मात्र फटका बसण्याची शक्यता
भाजीपाल्याचे दर कमी झाल्याने ग्राहकांना दिलासा मिळणार आहे.
sagar joshi
sagar joshi | Updated on: Nov 21, 2020 | 11:24 AM
Share

नवी मुंबई: गेल्या काही दिवसांपासून वधारलेले भाज्यांचे भाव खाली आले आहेत. नवी मुंबई एपीएमसी घाऊक बाजारात गेल्या काही दिवसांत भाज्यांच्या दरात मोठी वाढ झाली होती. भाजीपाला मार्केटमध्ये आज एकूण 520 गाड्यांची आवक झाली आहे. त्यामुळे भाज्यांच्या दरात मोठी घसरण झाल्याचं पाहायला मिळत आहे. परतीच्या पावसानं झालेल्या नुकसानामुळे गेल्या काही दिवसांपासून नवी मुंबई एपीएमसी मार्केटमध्ये भाज्यांचे भाव कडाडले होते. (Prices of vegetables declined due to increased inflow of vegetables in Navi Mumbai APMC market)

अतिवृष्टीमुळे भाजीपाल्याचं मोठं नुकसान झालं होतं. त्यामुळे मार्केटमध्ये भाज्यांची आवक घटली होती. आता ही आवक वाढल्याचं पाहायला मिळत आहे. त्यामुळे मागील आठवड्यात 30 ते 40 रुपये प्रति किलो दराने विकला जाणारा कोबी, कारली, टोमॅटो, दुधी भोपळा, शिमला मिर्ची, लवंगी मिर्ची, काकडी आज 5 ते 10 रुपये किलोने विकला जात आहे. तर भेंडी 10 रु. किलो आणि कोथिंबरी 8 रुपये जुडी अशा भावात विकली जातेय. दरम्यान घाऊक बाजारात कमी किमतीत मिळणारा भाजीपाला किरकोळ बाजारात मात्र दुप्पट भावात विकला जात आहे.

नवी मुंबई एपीएमसी मार्केटमध्ये आज जवळपास 520 गाड्यांची आवक झाली आहे. तर छटपुजेमुळे मार्केटमध्ये ग्राहकही नाही. त्यामुळे बाजारात 60 टक्के भाजीपाला शिल्लक आहे. अशावेळी व्यापारी आणि शेतकऱ्यांना फटका बसण्याची शक्यता आहे.

आजचे बाजारभाव (प्रति किलो)

फ्लॉवर – 8 ते 10 रुपये कोबी – 8 ते 12 रुपये काकडी – 6 ते 10 रुपये मिरची – 10 ते 12 रुपये टोमॅटो – 15 ते 20 रुपये वांगी – 8 ते 10 रुपये कोथिंबीर – 5 रुपये जुडी मेथी – 5 ते 10 रुपये पालक – 5 रुपये वाटाणा – 40 रुपये

सुरक्षारक्षकाला मारहाण

कृषी उत्पन्न बाजार समिती (APMC) प्रशासनाकडून मार्केटमध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी विविध प्रकारच्या उपाययोजना करण्यात येत आहेत. तर दुसऱ्या बाजूला फळ मार्केटमधील एच आणि एम विंगमध्ये व्यापार करणाऱ्या व्यापाऱ्यांकडून सर्व प्रकारच्या नियमांचे उल्लंघन केलं जात असल्याचं पाहायला मिळालं होतं. इथले व्यापारी आणि मजूर नियमांचे पालन करत नाहीत, तसेच तिथे असलेल्या सुरक्षारक्षकांशी हुज्जत घालतात.  काही दिवसांपूर्वी  मास्क न वापरणाऱ्यांवर कारवाई करणाऱ्या सुरक्षारक्षाकाला काही मजुरांनी मारहाण केली होती. याप्रकरणी एपीएमसी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आला आहे.

संबंधित बातम्या:

मुंबई एपीएमसी मार्केटमध्ये भाज्यांच्या दरात घसरण; किरकोळ बाजारात मात्र महागाई कायम

आवक वाढली, मुंबई एपीएमसी मार्केटमध्ये भाजीपाल्याच्या दरात घसरण सुरुच

Prices of vegetables declined due to increased inflow of vegetables in Navi Mumbai APMC market

Follow Us
अण्णा हजारे विद्यार्थ्यांसाठी मैदानात, उद्या आंदोलन करणार
Anna Hazare | अण्णा हजारे विद्यार्थ्यांसाठी मैदानात, उद्या आंदोलन करणार
हे आंदोलन तर बेजबाबदारपणा, एकनाथ शिंदेंची राहुल गांधींवर टीका; म्हणाले
हे आंदोलन तर बेजबाबदारपणा, एकनाथ शिंदेंची राहुल गांधींवर टीका; म्हणाले आंदोलनाची जागा...
देशाची बदनामी होऊ नये याचा विचार करा, CM फडणवीसांचे आंदोलकांना आवाहन
देशाची बदनामी होऊ नये याचा विचार करा, CM फडणवीसांचे आंदोलकांना आवाहन
आम्हाला कोणतेही व्हिडिओ पाहायचे नाहीत; जंतर-मंतर लाठीचार्ज प्रकरणावर..
आम्हाला कोणतेही व्हिडिओ पाहायचे नाहीत; जंतर-मंतर लाठीचार्ज प्रकरणावर सुप्रीम कोर्टाचा सुनावणीला तात्काळ नकार
हे सरकार हटवा, आम्ही वर्दीत आहोत; राहुल गांधींना फरफटत नेताना पोलीस...
हे सरकार हटवा, आम्ही वर्दीत आहोत; राहुल गांधींना फरफटत नेताना पोलिसांने कानात काय सांगितलं?
152 पेपरफुटी, 5 कोटी विद्यार्थ्यांचं भविष्य उद्ध्वस्त!
Rahul Gandhi | 152 पेपरफुटी, 5 कोटी विद्यार्थ्यांचं भविष्य उद्ध्वस्त! राहुल गांधींचा मोदी सरकारवर घणाघात
तोंडातून रक्त येत होतं अन्,.. स्वतः राहुल गांधींंनीच सांगितलं, अटके
तोंडातून रक्त येत होतं अन्... स्वतः राहुल गांधींंनीच सांगितलं, अटकेवेळी नेमकं काय घडलं?
धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्याच्या मागणीवर आशिष जैस्वालांचा पलटवार
Aashish Jaiswal | धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्याच्या मागणीवर आशिष जैस्वालांचा पलटवार; म्हणाले थेट संबंध नाही...
ओमराजेंसह सर्व फुटीर खासदारांना... ठाकरे गटाने कोर्टात धाव घेताच मोठी
Arvind Sawant | ओमराजेंसह सर्व फुटीर खासदारांना... ठाकरे गटाने कोर्टात धाव घेताच मोठी अपडेट समोर
राहुल गांधींना अमित साटमचं थेट चॅलेंज! पासपोर्ट दाखवा, परदेश...
Ameet Satam | राहुल गांधींना अमित साटमचं थेट चॅलेंज! पासपोर्ट दाखवा, परदेश दौऱ्यांचा हिशेब द्या
मोठी बातमी! ठाकरे बंधू रस्त्यावर उतरणार, विद्यार्थ्यांच्या भविष्यासाठी 26 तारखेला संयुक्त मोर्चा.

मोठी बातमी! ठाकरे बंधू रस्त्यावर उतरणार, विद्यार्थ्यांच्या भविष्यासाठी 26 तारखेला संयुक्त मोर्चा

मोदींनी धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा न घेण्यामागचं ओडिशा कनेक्शन? वाचा इन्साईड स्टोरी.

मोदींनी धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा न घेण्यामागचं ओडिशा कनेक्शन? वाचा इन्साईड स्टोरी

66 दिवसांपूर्वी क्रिकेटपटूच्या मृत्यूची अफवा, आता थेट संघाचं कर्णधारपद मिळालं.

66 दिवसांपूर्वी क्रिकेटपटूच्या मृत्यूची अफवा, आता थेट संघाचं कर्णधारपद मिळालं

…तर मंत्र्यांना स्पष्ट संदेश जाईल, अण्णा हजारेंचं पंतप्रधान मोदींना पत्र, धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी.

…तर मंत्र्यांना स्पष्ट संदेश जाईल, अण्णा हजारेंचं पंतप्रधान मोदींना पत्र, धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी

Akhil Chitre : पाकिस्तानच्या बॉर्डरवर आलोय का? अखिल चित्रे पोलीस अधिकाऱ्यात जुंपली; आंदोलकांना ताब्यात घेतल्यानं वातावरण तापलं!.

Akhil Chitre : पाकिस्तानच्या बॉर्डरवर आलोय का? अखिल चित्रे पोलीस अधिकाऱ्यात जुंपली; आंदोलकांना ताब्यात घेतल्यानं वातावरण तापलं!

मोदींच्या माफींची राहुल गांधींची नवी मागणी… मागण्यांमध्येच घोळ.

मोदींच्या माफींची राहुल गांधींची नवी मागणी… मागण्यांमध्येच घोळ