Raj Thackeray Donation: राम मंदिरात चोरी झाली, बोलायचं नाही? वा रे वा… यात धर्माचा अपमान कुठे? राज ठाकरे संतापले

Raj Thackeray on Ram Mandir Donation Scam: राम मंदिरात चोरी होत असेल तर त्यावर काहीच बोलायचं नाही का? राज ठाकरे यांनी सरकारला खणखणीत सवाल विचारला आहे. मनसेच्या रेल्वे कामगार सेनेच्या वर्धापन दिनाच्या कार्यक्रमात त्यांनी सरकारला धारेवरच धरले नाही तर सणसणीत टोले हाणले.

Raj Thackeray Donation: राम मंदिरात चोरी झाली, बोलायचं नाही? वा रे वा... यात धर्माचा अपमान कुठे? राज ठाकरे संतापले
राज ठाकरे, राम मंदिर
Image Credit source: टीव्ही ९ मराठी
| Updated on: Jul 09, 2026 | 1:21 PM

Raj Thackeray on Ram Mandir Donation Scam: राम मंदिरातील देणगीत मोठा अपहार झाला. त्यावरून राम भक्तांच्या भावना दुखावल्या गेल्या आहेत. यावरून प्रश्न विचारल्यावर भाजप आणि संघाच्या गोटातून सातत्याने हल्लाबोल करण्यात येत असल्याचा आरोप करत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी सरकारचे चांगलेच माप काढले. राम मंदिरात चोरी होत असेल तर त्यावर काहीच बोलायचं नाही का? असा खणखणीत सवाल राज ठाकरे यांनी सरकारला विचारला आहे. मनसेच्या रेल्वे कामगार सेनेच्या वर्धापन दिनाच्या कार्यक्रमात त्यांनी सरकारला धारेवरच धरले नाही तर सणसणीत टोले हाणले आहे.

चोरीबद्दल बोललं तर म्हणे धर्माचा अपमान

राज ठाकरे यांनी सरकारच्या दुटप्पी धोरणावर सणाणून टीका केली. मिसिंग लिंकसह त्यांनी प्रभू श्रीरामाच्या मंदिरातील दानपेटीतील अपहरणावरून सरकारला धारेवर धरले. “आता केंद्राची कामे आहे. त्याचा देशाचा काय संबंध. मिसिंग लिंकबद्दल बोललं तर महाराष्ट्राचा अपमान कुठे आला. लोकांनी प्रश्न विचारायचे नाही ना. इतके दिवस मोबाईलवरून विरोधकांना शिव्या घालायचे ते अंगलट आलंय. दामदुपटीने यांच्या अंगलट आलं. आता त्रास होतोय. तुम्हीच सुरू केल्या या गोष्टी. १०-१२ वर्षात तुम्हीच सुरू केलं. वाईट साईट बोलणं, घाण बोलणं तुमच्या टीमने केलं. तुमच्या अंगावर आल्यावर कसा आला महाराष्ट्राचा अपमान. राम मंदिराच्या चोरीबद्दल बोललं तर म्हणे धर्माचा अपमान. यात धर्म कुठे आला. त्या मंदिराबद्दल आमचीही आस्था आहे. १४०० कोटी चोरले जातात, पडदा किती असावा यांच्यासमोर. म्हणे वक्फ बोर्डात चोऱ्या झाल्या तुम्ही नाही बोलला. आम्हाला काय देणंघेणं. राम मंदिरात दानपेटीत टाकलं. त्याची चोरी होत असेल तर त्याच्याबद्दल बोलायचं नाही? काल होसबळे म्हणाले, धर्मविरोधी लोक पसरवत आहे. आम्ही धर्मविरोधी? हा देश धर्मविरोधी आहे? मंदिरातून चोरी होते हे सांगणारं कोण होतं. बोलणारं कोण होतं. भाजपचा खासदारच बोलला चोरी झाली. आम्ही बोललो? देश बोलला? १५ ट्रस्टींपैकी १२ केंद्र सरकार नेमते. १२ पैकी केंद्राने नेमलेली माणसं संघ, भाजप आणि विहिंपशी संबंधित आहे. बाकी कोणी नाही.” अशी खणखणीत टोलेबाजी राज ठाकरे यांनी भाषणातून केली.

कितीची चोरी झाली हेच माहिती नाही

केंद्र सरकारने नेमलेले आयएएस अधिकारी आहे. आता १४०० कोटीचा आकडा आलाय. कितीची चोरी झाली माहिती नाहीये, असा टोलाही राज ठाकरे यांनी लगावला. समजा पकडा दुसऱ्या कुणाचं सरकार असतं आणि राम मंदिरात चोरी झाली असती तर भाजप,संघ विश्व हिंदू परिषदेने काय केलं असतं. मोर्चे काढले असते. त्यात राजकारण नसतं का. विरोधकांनी केलं तर म्हणे राजकारण, असा चिमटाही ठाकरे यांनी सरकारला काढला.

Follow Us