AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

कोरोनावरील लस घ्या अन्यथा पिझ्झा बर्गरही मिळणार नाही, राजेश टोपेंचं किशोरवयीन मुलांना आवाहन

राज्यात 15 ते 18 वयोगटातील 60 लाख मुलांचं लसीकरण करायचं असून हे दररोज तीन लाख प्रमाणं 20 दिवसात होऊन जाईल, असं राजेश टोपे म्हणाले. मुलांनी कोरोना लस घेतली नाहीतर पिझ्झा बर्गर देखील मिळणार नाही, असं राजेश टोपे म्हणाले.

कोरोनावरील लस घ्या अन्यथा पिझ्झा बर्गरही मिळणार नाही, राजेश टोपेंचं किशोरवयीन मुलांना आवाहन
आरोग्यमंत्री राजेश टोपे
| Edited By: Yuvraj Jadhav | Updated on: Jan 07, 2022 | 1:18 PM
Share

मुंबई: राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे (Rajesh Tope) यांनी वाढत्या कोरोना (Corona) रुग्णसंख्येच्या पार्श्वभूमीवर विविध मुद्यांसंदर्भात टीव्ही 9 मराठीशी संपर्क साधला. राज्यात पूर्ण लॉकडाऊन (Lockdown) लागणार का? 15 ते 18 वयोगटातील मुलांचं लसीकरण, मिनी लॉकडाऊन, नाईट कर्फ्यू, रात्रीच्या अनावश्यक सेवा बंद करणं, बाजारापेठेतील गर्दी, लग्न समारंभात होणारी गर्दी यासंदर्भात भाष्य केलं. राज्यात 15 ते 18 वयोगटातील 60 लाख मुलांचं लसीकरण करायचं असून हे दररोज तीन लाख प्रमाणं 20 दिवसात होऊन जाईल, असं राजेश टोपे म्हणाले. मुलांनी कोरोना लस घेतली नाहीतर पिझ्झा बर्गर देखील मिळणार नाही, असं राजेश टोपे म्हणाले.

15 ते 18 वयोगटातील लसीकरण जलदगतीनं

15 ते 18 वयोगटातील मुलांचं लसीकरण वेगानं करत आहोत. राज्यातील 60 लाख मुलांचं लसीकरण करायचं आहे. दररोज 3 लाख मुलांचं लसीकरण याप्रमाणं प्रयत्न करत आहोत.  15 ते  20 दिवसांमध्ये हे लसीकरण होऊन जाईल. किशोरवयीन मुलांना स्वत: सुरक्षित राहायचं असेल तर कुठं जायचं असेल तर लसीकरण करुन घ्या. बर्गर आणि पिझ्झा घ्यायचा असला तरी लस बंधनकारक  त्यामुळं लसीकरण करुन घ्या, असं आवाहन राजेश टोपे यांनी किशोरवयीन मुलांना केलं.

राज्यात पूर्ण लॉकडाऊन लागणार का?

राजेश टोपे :  आम्ही स्पष्टपणे ठरवलेलं आहे की 700 मेट्रिक टन ऑक्सिजन लागेल किंवा 40 टक्के बेड वापरले जातील त्यावेळी लॉकडाऊन लागेल. मात्र, सध्या तशी परिस्थिती नाही. राज्यातील रुग्णालयातील 10 ते 15 टक्के बेड व्यापलेले आहेत. राज्यातील मृत्यूदर वाढलेला नाही. त्यामुळं घाबरण्याची गरज नाही, पण काळजी घेतली पाहिजे. ज्येष्ठ नागरिक, कोमॉर्बिड लोकांनी काळजी घेणं गरजेचं आहे. कोरोना प्रसार रोखण्यासाठी निर्बंध लावलेले आहेत. त्यामुळं आपण नियम पाळले नाहीत तर अवघड आहे. रात्री फिरण्याची गरज नाही. मुंबई सारख्या शहरात रात्री 11 ते 5 या वेळेत काही निर्बंध लावता येते का हे पाहावं लागेल, असं राजेश टोपे म्हणाले.

लॉकडाऊन, मिनी लॉकडाऊन, नाईट कर्फ्यू वर मुख्यमंत्री कधी निर्णय घेणार?

आरोग्य विभाग, टास्क फोर्स इतर यंत्रणा मुख्यमंत्र्यांना मुख्य सचिवांमार्फत अहवाल देत असतात. मुंबईत  25 हजारांपर्यंत रुग्ण आढळून येत असतील तर मुंबईतील अनावश्यक सेवा, उशिरापर्यंतचं हॉटेलिंग हे सगळं थांबलं पाहिजे. रात्री फिरण्यावर निर्बंध लावता येईल. मुख्यमंत्री याबाबत निर्णय घेतील. अनावश्यक सेवा  बंद करता येतात का यासंदर्भात निर्णय घ्यावा लागेल, असं राजेश टोपे म्हणाले.

लोकल सेवेवर निर्बंध येणार?

लोकल सेवा बंद करण्यात येणार नाही. अनावश्यक सेवा रात्री उशिरापर्यंत सुरु असतात त्यांची वेळ कमी करता येते का हे पाहावं लागणार आहे. मॉल्स, रेस्टॉरंट याबाबत काही निर्णय घेण्यात आला नाही. मात्र, रात्रीच्या अनावश्यक सेवांबाबत निर्णय घेतला जाईल.

मोठ्या मंडईमध्ये  नियमांचं पालन होत नाही त्यावर काय करणार?

मंडईमध्ये मास्क न वापरण्यांवर कारवाई करण्यात येईल. निर्बंध पेपरवर केले आहेत पण ते प्रत्यक्षात उतरवण्याची जबाबदारी अधिकाऱ्यांची आहे. त्यांना सूचना दिलेल्या आहेत, असं राजेश टोपे म्हणाले.

लग्न आणि अंत्यसंस्काराच्या ठिकाणीची गर्दी कशी कमी करणार?

लग्न आणि अंत्यसंस्कार थाबवता येणार नाही. लग्न हे दोन्ही बाजूच्या  25-25 लोकांच्या उपस्थितीत पार पाडावीत. आपल्याला राजकीय कार्यक्रम, सामाजिक कार्यक्रम किंवा धार्मिक कार्यक्रमातील गर्दी टाळावी लागेल. त्यासाठी शासनानं दिलेल्या आदेशांचं पालन करावं लागेल, असं राजेश टोपे म्हणाले.

इतर बातम्या:

टीईटी, म्हाडापरीक्षा घोटाळ्यातील आरोपी तुकाराम सुपेसह इतर चौघे व पोलीस उपायुक्त भाग्यश्री नवटक्के यांना कोरोनाची लागण

Corona, Omicron Cases Maharashtra LIVE : पूर्ण लॉकडाऊन लागणार का? राजेश टोपे म्हणाले त्यावेळी ऑटोमेटिक लॉकडाऊन लागेल

Rajesh Tope appeal students between 15 to 18 for corona vaccination and citizens should follow corona rules

Follow Us
मनोज जरांगेंना तीन दिवसांनंतर रुग्णालयातून डिस्चार्ज
मनोज जरांगेंना डिस्चार्ज: मराठा आरक्षणासाठी अंतरवली सराटीत २९ ऑगस्ट उपोषणाची तयारी
नाशिक TCS प्रकरणातील संशयित आरोपी मतीन पटेलला जामीन
नाशिक TCS प्रकरणातील मतीन पटेलला जामीन मंजूर
58 लाख नोंदींच्या प्रमाणपत्रांची मागणी;मराठा आरक्षणावरून वातावरण तापलं
मनोज जरांगे पाटील यांचा सरकारला थेट इशारा: ५८ लाख नोंदींची प्रमाणपत्रे हवीत, वेळ आल्यास सरकार पाडू
भाजप-राष्ट्रवादीत राजकीय संघर्ष
बदलापूर वृक्ष प्राधिकरण नियुक्तीवरून भाजप-राष्ट्रवादीत राजकीय संघर्ष
देवेंद्र फडणवीसांची धर्मेंद्र प्रधान यांच्याशी भेट; म्हणाले,‘माझे बंधू
फडणवीस-प्रधान भेट: माझे बंधू म्हणत देवेंद्र फडणवीसांनी व्यक्त केला आनंद
बदलापुरात सीलबंद पाण्याच्या नावाखाली दूषित पाण्याची विक्री?
बदलापूरमध्ये सीलबंद पाण्याच्या नावाखाली अशुद्ध पाण्याची विक्री
मीरा-भाईंदरमध्ये मेट्रोचा स्लॅब कोसळला; कंत्राटदारांवर 12 कोटींचा दंड
मीरा-भाईंदरमध्ये मेट्रो स्लॅब कोसळला, आदित्य ठाकरेंची कठोर कारवाईची मागणी
शिवसेना शिंदे गटाला मोठा फटका? सुप्रीम कोर्टाच्या 'त्या'...
शिवसेना शिंदे गटाला मोठा फटका? सुप्रीम कोर्टाच्या 'त्या' निर्णयाने... फुटीर 6 खासदारांबाबत नवी अपडेट समोर
नवनाथ वाघमारेंचं वादग्रस्त वक्तव्य, नेत्यांकडून तीव्र प्रतिक्रिया
नवनाथ वाघमारे यांच्या वक्तव्याचा निषेध, मराठा नेत्यांकडून तीव्र प्रतिक्रिया
एकीकडे NDA सोबतच्या चर्चा फेटाळल्या, दुसरीकडे शरद पवार थेट भाजपच्या...
एकीकडे NDA सोबतच्या चर्चा फेटाळल्या, दुसरीकडे शरद पवार थेट भाजपच्या बड्या नेत्यासह एकाच मंचवर, त्या व्हिडीओची तुफान चर्चा