AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Mohan Bhagwat: जातींचा अंत शक्य आहे का? मोहन भागवत यांचं मोठं विधान काय? कोणत्या गोष्टीवर ठेवलं बोट?

RSS Chief Mohan Bhagwat on Caste System: हिंदू धर्मात अठरापगड जाती आहेत. पोटजाती आहेत. जातीभेद आणि जाती उतरंडीचे चटके आहेत. यावर संघाचे विचार काय आहेत, याचे कुतुहल नेहमीच असते. जातीअंताच्या लढाईत संघाची भूमिका काय असा प्रश्न कायम विचारल्या जातो. त्यावर आता मोहन भागवतांनी मोठं भाष्य केलं आहे.

Mohan Bhagwat: जातींचा अंत शक्य आहे का? मोहन भागवत यांचं मोठं विधान काय? कोणत्या गोष्टीवर ठेवलं बोट?
सरसंघचालक मोहन भागवत, जाती अंत लढाईImage Credit source: गुगल
| Updated on: Feb 08, 2026 | 1:36 PM
Share

RSS Chief Mohan Bhagwat on Caste System: हिंदू धर्मात जातीची उतरंड आणि जातीभेद, पोटजाती, जाती व्यवस्था असे अनेक वाद आहेत. त्याविषयी टीका आणि नाराजी पाहायला मिळते. जाती व्यवस्था हा हिंदू धर्मातील प्रमुख घटक आहे. जातीअंताच्या लढाईत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची भूमिका काय असा प्रश्न कायम विचारल्या जातो. डावी चळवळ आणि पुरोगामी, अनुसूचित जाती संघटना, बहुजन समाजातून संघाला याविषयी कायम विचारणा होते. याविषयावर सरसंघचालक मोहन भागवत यांनी मन मोकळं केलं. त्यांनी या विषयावर संघाची भूमिका स्पष्ट केली.

अखंड भारताची इच्छा

2047 मध्ये भारताचं विभाजन होईल ही भीती बाळगण्यापेक्षा 2047मध्ये अखंड भारताची कल्पना करा. सुलतान, बादशाह 500 वर्ष राहिला, इंग्रजांना 200 वर्षात जमलं नाही ते आता कसं होईल. स्वतंत्र भारतात तर शक्यच नाही. आता हा 1947 पूर्वीचा भारत राहिला नाही. अखंड भारत होईल आणि करून दाखवू ही इच्छा मनात बाळगा. भारताचे तुकडे होईल असं काही लोक स्वप्न पाहत आहेत.ते पूर्ण होणार नाही, असे सरसंघचालकांनी ठणकावून सांगितलं.

हिंदू आणि शीख एकच होते. आजही रोटीबेटी व्यवहार होतातच. रक्ताचं नातं आहे. पूजा वेगळी आहे. धर्म म्हणून शीख वेगळे आहेत. त्यांच्या विशिष्टेला मान्यता दिली पाहिजे. पण समाज म्हणून आपण सर्व एक आहोत. हे सर्व धर्म एकाच स्वभावाचे आहेत. त्यामुळे आपल्या एकात्मता स्त्रोतात या सर्व धर्माचे नावे घेतो. श्रद्धापूर्वक त्यांचं हृद्यात धारण करतो. गुरू ग्रंथ साहिबात फक्त शीखांची वाणी आहे का. तर संपूर्ण भारताची वाणी आहे. शीख पंथ म्हणून आचार विचार वेगळे असू शकतात. पण समाज आणि राष्ट्र म्हणून ते कधी वेगळे नव्हते. काश्मीर पंडितांची सुरक्षा त्यांनीच केली आहे. त्यामुळे त्याचं स्मरण झालं पाहिजे. नवीन एकता आणण्याची गरज नाही. जुनीच एकता पुढे न्यायची आहे यावर सरसंघचालकांनी खास जोर दिला.

जातीअंतावर सरसंघचालकांचे विचार काय?

पुण्यात वसंत व्याख्यानमालेत बाळासाहेब देवरस यांचं भाषण झालं. त्यात संविधानातील सर्व आरक्षणाला समर्थन दिलं आहे. जातीयवाद जात नाही, तोपर्यंत आरक्षण राहिलं पाहिजे. जातीभेद दूर झाला असं ज्यांच्यावर जातीय अत्याचार झाले त्यांना वाटलं पाहिजे. आता भेद नाही. आता आरक्षणाची गरज नाही. असं आता सुरू झालं आहे. अनेकांनी आरक्षण सोडलं आहे. इतरांना दिलं आहे. जातीगत भेदभावाची सर्व कारणे गेली पाहिजे. आम्ही त्यावर ठोस भूमिका घेतली आहे, असे सरसंघचालकांनी स्पष्ट केले.

व्यवस्था नियमाने दूर होणारी ही गोष्ट नाही. कायद्याने ही गोष्ट जाणार नाही. ही गोष्ट केवळ सदभावनेने दूर होईल. समाजात जे झालं ते गेलं. पण त्याचा परिणाम असा झाला की एक वर्ग खड्ड्यात आहे. ज्यांच्यासाठी आरक्षण आहे, ते खड्ड्यात आहे. जो मोठा आहे, त्याने आरक्षण घेतलं. जे खड्ड्यात पडलेले आहेत, त्यांना गुडघ्यावर उभं करून उचलंल पाहिजे. जे वर आहेत, त्यांनी खाली वाकून खड्ड्यातील लोकांना हात वर दिला आहे. २००० वर्षात ज्यांनी विषमता सोसली, त्यांना बाहेर आणण्यासाठी आपण २०० वर्ष सहन केलं तर काय झालं. आपलेच भाऊ आहेत. आपलाच देश आहे. प्राण थोडीच द्यायचे आहे. फक्त थोडंच सोडायचे आहे. त्यासाठी समजदारी पाहिजे. जे विषमतेचे दंश झेलत आहे, त्यांना संरक्षण दिलं पाहिजे. नवीन पिढी म्हणते आम्ही केलं नाही. नवीन नियमाने प्रश्न निकाली निघत नाही हे सत्य आहे. त्यावर एकच उपाय म्हणजे दोघांनी मिळून मिसळून राहिलं पाहिजे. झगडा करू नये. काही घेतलं पाहिजे, काही सोडलं पाहिजे. त्यासाठी सदभावना ठेवली पाहिजे. समाजात फूट पडू नये. समजदारीने पुढे गेले पाहिजे. ही गोष्ट सर्वांमध्ये आली पाहिजे, असे विचार मोहन भागवत यांनी मांडला.

मला जात मिटवायची असेल तर सत्तेत येऊन मिटवली पाहिजे. समाजात जातीला थारा नाही असं कळल्यावर लोक जातीच्या नावाने मतदान मागणार नाही. जातीच्या नावाने मतमागणारे हे समतावादी नाहीत. ते मतवादी आहेत. त्यामुळे त्यावर सद्भावनाच उपया आहे. आपल्यासारख्या लोकांनी डोकं थंड ठेवलं पाहिजे. तरुणांनी आणि सोशल मीडियावरील लोकांनी शांत राहिलं पाहिजे.

जात नावाची व्यवस्था नाही. अव्यवस्था आहे. पूर्वी एक काम एक जात होती. आता तसं नाही. त्यामुळे जात पात आहे कुठे,. स्वार्थासाठी, राजकारणासाठी जात आहे. प्राण गेले, पण लाश घेऊन जात आहोत. जातीअंत होणं शक्य आहे. फक्त सद्भावनेचं परिवर्तन आलं पाहिजे. नंतर जातही जाईल, असा विश्वास सरसंघचालकांनी दाखवला.

संत गजानन महाराज प्रकट दिन सोहळा; लाखो भाविकांची शेगावात मांदियाळी
संत गजानन महाराज प्रकट दिन सोहळा; लाखो भाविकांची शेगावात मांदियाळी.
प्रकट दिनानिमित्त गजानन महाराजांच्या मंदिरात भक्तांची गर्दी
प्रकट दिनानिमित्त गजानन महाराजांच्या मंदिरात भक्तांची गर्दी.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अहिल्यानगरमध्ये दाखल
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अहिल्यानगरमध्ये दाखल.
19 ते 25 वर्षात लग्न, 3 मुलं व्हावी असं शास्त्र सांगतं - मोहन भागवत
19 ते 25 वर्षात लग्न, 3 मुलं व्हावी असं शास्त्र सांगतं - मोहन भागवत.
संभाजीनगरात CTET केंद्रावर दागिने काढायला लावल्याने वाद!
संभाजीनगरात CTET केंद्रावर दागिने काढायला लावल्याने वाद!.
सरसंघचालक हा हिंदू म्हणून निवडला जाईल! मोहन भागवतांनी स्पष्टच सांगितलं
सरसंघचालक हा हिंदू म्हणून निवडला जाईल! मोहन भागवतांनी स्पष्टच सांगितलं.
... म्हणून कोणी दात तोडत नाही! मोहन भागवत याचं मोठं वक्तव्य
... म्हणून कोणी दात तोडत नाही! मोहन भागवत याचं मोठं वक्तव्य.
गर्दी जमवण्यासाठी सलमान खान आमंत्रित होते का? राऊतांचा संघाला सवाल
गर्दी जमवण्यासाठी सलमान खान आमंत्रित होते का? राऊतांचा संघाला सवाल.
सगळ्यांचा स्वीकार आणि सन्मान हा भारताचा स्वभाव! मोहन भागवतांचं वक्तव्य
सगळ्यांचा स्वीकार आणि सन्मान हा भारताचा स्वभाव! मोहन भागवतांचं वक्तव्य.
बांगलादेशला मदत कशासाठी? संजय राऊत यांचा सरकारला सवाल
बांगलादेशला मदत कशासाठी? संजय राऊत यांचा सरकारला सवाल.