AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Eknath Shinde : ढुं**ला पाय लावून पळाला, गुलाबराव पाटलांवर राऊतांची सडकून टीका; संदीपान भुमरेही टार्गेटवर

महाभारतातील संजयचे वक्तव्य आहे, ज्याने तीस वर्ष बाळासाहेबांच्या पायाशी बसून काम केले आहे. माझा शब्द कधी खोटा ठरत नाही, असे ते म्हणाले. तर संदिपान भुमरे यांच्यावरही त्यांनी यावेळी टीका केली.

Eknath Shinde : ढुं**ला पाय लावून पळाला, गुलाबराव पाटलांवर राऊतांची सडकून टीका; संदीपान भुमरेही टार्गेटवर
गुलाबराव पाटील/संजय राऊत/संदिपान भुमरेImage Credit source: tv9
| Updated on: Jun 26, 2022 | 1:45 PM
Share

मुंबई : गुलाबराव पाटील पानटपरी चालवायचा. आता ढुंगणाला पाय लावून पळाला, अशी सडकून टीका संजय राऊत (Sanjay Raut) यांनी गुलाबराव पाटील यांनी केली आहे. दहीसरमध्ये आयोजित शिवसेनेच्या मेळाव्यात ते बोलत होते. यावेळी त्यांनी बंडखोर आमदारांवर निशाणा साधला. शिवसेनेत आता एकच वाघ उरलाय, असा गुलाबराव पाटलांचा (Gulabrao Patil) अविर्भाव होता. आता ढुंगणाला पाय लाऊन पळाला. हा आधी पानटपरी चालवायचा. आता पुन्हा त्याला पानटपरी चालवायला पाठवा, असा संताप त्यांनी व्यक्त केला. तर संदिपान भुमरे यांच्यावरही त्यांनी हल्लाबोल केला. हा संदिपान भुमरे (Sandipan Bhumre) पैठणच्या साखर कारखान्यात वॉचमन होता. मोरेश्वर सावेंचे तिकीट कापून त्याला बाळासाहेब ठाकरे यांनी तिकीट दिले, की हा साधा शिवसैनिक आहे, मात्र यांनी दगा दिला असे संजय राऊत म्हणाले.

‘कातडे वाघाचे आणि काळीज उंदराचे’

गुलाबराव पाटील आणि संदिपान भुमरे यांच्यावर टीका करताना पुढे ते म्हणाले, की गुलाबराव पाटील आणि संदिपान भुमरे यांच्यासारखे कातडे वाघाचे आणि काळीज उंदराचे असे आम्ही नाही. आमचे काळीजही वाघाचे आहे. गुलाबराव पाटील मोठमोठ्या बाता मारत होता, मी सच्चा शिवसैनिक आहे, मला कॅबिनेट मंत्री केले. मग आता का पळाला ढुंगणाला पाय लावून, असा हल्लाबोल त्यांनी केला. हे महाभारतातील संजयचे वक्तव्य आहे, ज्याने तीस वर्ष बाळासाहेबांच्या पायाशी बसून काम केले आहे. माझा शब्द कधी खोटा ठरत नाही, असे ते म्हणाले. तर संदिपान भुमरे यांच्यावरही त्यांनी यावेळी टीका केली.

‘ते अश्रु खोटे होते’

संदिपान भुमरे या साखर कारखान्यातील वॉचमनला बाळासाहेबांनी तिकीट दिले, साधा शिवसैनिक आहे म्हणून. हा प्रथम मुंबईत आला, याला साधा वडा सांबार खाता येत नव्हता. तो जमिनीवर बसून हॉटेलात वडासांबार खात होता. आज तो कॅबिनेट मंत्री झाला. त्यानंतर तो उद्धव साहेबांना भेटला, माझ्याकडे आला. शिवसेनेमुळे मी झालो वगैरे वगैरे म्हणत रडायला लागला. ते कसे खोटे अश्रु होते, हे आज कळायला लागले आहे, असे संजय राऊत म्हणाले. हे सगळे धुंदीत आहेत. त्यांच्यावर कोणती नशा आहे, हे तुम्ही व्हिडिओत पाहिले, असा टोला त्यांनी एकनाथ शिंदे यांना लगावला आहे. तर हे संकट नाही. याला मी संकट मानत नाही, असेही ते यावेळी म्हणाले.

गुलाबराव पाटील, संदिपान भुमरेंवर काय टीका केली?

Follow Us
ठाकरेंना विधानपरिषद हवी असेल तर...नरेश म्हस्केंच्या त्या विधानाने...
ठाकरेंना विधानपरिषद हवी असेल तर...नरेश म्हस्केंच्या त्या विधानाने....
महाराष्ट्राचे नवे राज्यपाल जिष्णू देव वर्मा यांचा शपथविधी
महाराष्ट्राचे नवे राज्यपाल जिष्णू देव वर्मा यांचा शपथविधी.
आखाती युद्धाचा भारतावर परिणाम; देशात ESMA कायदा लागू
आखाती युद्धाचा भारतावर परिणाम; देशात ESMA कायदा लागू.
मुंबईनंतर आता ठाण्यातही इलेक्ट्रिक डबल डेकर बस धावणार
मुंबईनंतर आता ठाण्यातही इलेक्ट्रिक डबल डेकर बस धावणार.
पुण्यातील हॉटेलमध्ये सिलेंडरचा तुटवडा, चुलीवर स्वयंपाक करण्याची वेळ
पुण्यातील हॉटेलमध्ये सिलेंडरचा तुटवडा, चुलीवर स्वयंपाक करण्याची वेळ.
उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांचे विधानसभेत महिला दिनानिमित्त निवेदन
उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांचे विधानसभेत महिला दिनानिमित्त निवेदन.
मुंबईत घरी परतल्यावर सूर्यकुमार यादवचं जल्लोषात स्वागत
मुंबईत घरी परतल्यावर सूर्यकुमार यादवचं जल्लोषात स्वागत.
अन् अरे संसार संसार म्हणताना सुनेत्रा पवारांचा आवाज झाला जड
अन् अरे संसार संसार म्हणताना सुनेत्रा पवारांचा आवाज झाला जड.
युद्धामुळे भाजीपाला निर्यातीवर परिणाम, दर घसरले, शेतकरी चिंतेत
युद्धामुळे भाजीपाला निर्यातीवर परिणाम, दर घसरले, शेतकरी चिंतेत.
पुरवठा-समतोल वितरण नियंत्रणासाठी जीवनावश्यक वस्तू कायदा लागू
पुरवठा-समतोल वितरण नियंत्रणासाठी जीवनावश्यक वस्तू कायदा लागू.