AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Sanjay Raut: बुस्टर डोस माहीत नाही, पण मास्टर ब्लास्टर डोस आमचाच असेल; राऊतांचा भाजपला टोला

Sanjay Raut: आजच्या सभेचं व्यासपीठ पाहाल तर इतकं मोठं व्यासपीठ मुंबईत निर्माण झालं नव्हतं. भव्य असं व्यासपीठ आहे. शिवसेनेचा कारभार भव्य असतो.

Sanjay Raut: बुस्टर डोस माहीत नाही, पण मास्टर ब्लास्टर डोस आमचाच असेल; राऊतांचा भाजपला टोला
बुस्टर डोस माहीत नाही, पण मास्टर ब्लास्टर डोस आमचाच असेल; राऊतांचा भाजपला टोला Image Credit source: tv9 marathi
| Updated on: May 14, 2022 | 10:17 AM
Share

मुंबई: महाराष्ट्रातील, देशातील वातावरण आणि वातावरणावर आलेलं मळभ, धुकं, गढूळपणा हे उद्धव ठाकरेंच्या (cm uddhav thackeray) भाषणाने दूर होईल. महाराष्ट्रातील आकाश निरभ्र होईल. या आकाशात भगव्या रंगाचाच धनुष्य दिसेल. अर्थात हे राज्य आणि शिवसेना (shivsena) पूर्णपणे शिवाजी महाराजांच्या विचारांवर चालत आहे. शिवसेनाप्रमुखांची प्रेरणा आहे. काही लोकं राज्य बिघडणवण्याचा प्रयत्न करत आहेत. काही अडथळे निर्माण करत आहेत. ही पोटदुखी आहे, जळजळ आहे त्यावर आजच्या सभेत योग्य उपचार केले जातील, असं सांगतानाच कोणाचा बुस्टर डोस माहीत नाही. पण मास्टर ब्लास्टर डोस आमचाच असेल. आमची फटकेबाजी असते. प्युअर मास्टर ब्लास्टर डोस असतो, असं शिवसेना नेते संजय राऊत (sanjay raut) म्हणाले. मीडियाशी संवाद साधताना राऊत यांनी हे विधान केलं.

आजच्या सभेचं व्यासपीठ पाहाल तर इतकं मोठं व्यासपीठ मुंबईत निर्माण झालं नव्हतं. भव्य असं व्यासपीठ आहे. शिवसेनेचा कारभार भव्य असतो. मैदानात उतरण्याच्या निश्चियाने, जिद्दीने उतरण्यासाठी सभेचं आयोजन केलं आहे. उद्धव ठाकरे यांच्या भाषणाची शिवसैनिक वाट पाहत होते. दोन वर्षात उद्धव ठाकरेंनी ऑनलाईन संवाद साधला. बैठका घेतल्या. पण विराट सभा प्रदीर्घ कालावधीनंतर होत आहे. शिवसेना आणि गर्दी याचं नातं आहे. समीकरण आहे. आम्हाला गर्दी जमवावी लागत नाही, गर्दी आणावी लागत नाही. बाळासाहेबांचा विचार, राज्याचा विचार, विकासाचा विचार या विचाराचं लोहचुंबक आहे. त्यामुळे लोकं आपोआप जमतात. उद्धव ठाकरेंच्या भाषणाची उत्सुकता महाराष्ट्राला आणि देशाला आहे. या सभेतून प्रत्येक प्रश्नाचं उत्तर मिळेल, असं राऊत म्हणाले.

करारा जवाब देणार

अडीच वर्षानंतर सभा होत आहे. संपूर्ण देश त्यांचे विचार ऐकू इच्छितो. ऐतिहासिक आणि क्रांतीकारी रॅली होईल. काही लोक राज्याची अशांतता बिघडवण्याचा प्रयत्न करत आहे. राज्याला अस्थिर करण्याचा प्रयत्न करत आहे. त्यांना उद्धव ठाकरे करारा जवाब देणार आहेत, असंही त्यांनी स्पष्ट केलं.

बाळासाहेब ठाकरेच हिंदू हृदयसम्राट

हिंदू जननायक वगैरे काही नाही. असे प्रश्न अजिबात निर्माण झाले नाही. आम्ही हिंदूचं संघटन करतोय. हिंदू जननायक कोण हे प्रश्नच उभे राहू शकत नाही. बाळासाहेब ठाकरे हेच हिंदुहृदय स्रमाट राहतील. त्या पलिकडे कोणी नाही. इतरही नाही, असंही त्यांनी सांगितलं.

रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत
रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत.
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त.
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!.
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान.
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर.
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य.
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका.
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल.
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?.
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती.