AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

LoudSpeaker Ban : कुठे आहे आंदोलन? मला आंदोलन दिसलं नाही; राऊतांनी राज ठाकरेंना डिवचलं

LoudSpeaker Ban : कोणी चिथावणीची भाषा करत असेल तर समान नागरी कायद्याचं उल्लंघन आहे.

LoudSpeaker Ban : कुठे आहे आंदोलन? मला आंदोलन दिसलं नाही; राऊतांनी राज ठाकरेंना डिवचलं
कुठे आहे आंदोलन? मला आंदोलन दिसलं नाही; राऊतांनी राज ठाकरेंना डिवचलंImage Credit source: tv9 marathi
| Edited By: | Updated on: May 04, 2022 | 11:33 AM
Share

मुंबई: मनसेने पुकारलेलं भोंग्यांविरोधातील आंदोलन (LoudSpeaker Ban)अपयशी झाल्याने त्यावरून शिवसेना नेते संजय राऊत यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना डिवचले आहे. कुठे आंदोलन आहे? कुठलं आंदोलन? मला कुठे आंदोलन दिसलं नाही. आंदोलनाचा प्रश्नच येत नाही, अशा शब्दात शिवसेना नेते संजय राऊत (sanjay raut) यांनी राज ठाकरेंना (raj thackeray) डिवचले आहे. राज्यात भोंग्याच्या बाबतीत कायद्याचा प्रश्न निर्माण झालेला नाही. सरकार सक्षम आहे. भोंग्यावर आंदोलन करावं अशी परिस्थिती नाही. मुंबईचे पोलीस आयुक्त आणि राज्याचे महासंचालक तसेच गृहमंत्री दिलीप वळसे पाटील या प्रत्येकाचं नियोजन आणि भूमिका पाहिली असेल तर भोंग्याबाबत कायद्याचं उल्लंघन झालं नाही हे स्पष्ट होतं. त्यांनी कशासाठी हाक दिली माहीत नाही. सुप्रीम कोर्टाने जे नियम घालून दिले आहे त्यानुसार काम केलं जात आहे. त्या पलिकडे कुणी जात असेल तर सरकार पाहून घेईल. मुंबईसह महाराष्ट्रात भोंग्यावर आंदोलन करावं अशी परिस्थिती बिघडली नाही, असं संजय राऊत यांनी पत्रकार परिषदेत सांगितलं.

काल मी वर्षावर होतो. मुंबईत मशिदीवर भोंगे आहेत. त्यांनी परवानग्या घेतल्या आहेत. त्यांनी आवाजाचं पालन करण्याचं मान्य केलं. हाच नियम मंदिर आणि चर्चला आहे. इतर सार्वजिनक कार्यक्रमांना आहे. सर्वांनी पालन केलं तर सर्वोच्च न्यायालयाचा मान राखला जाईल. सर्वोच्च न्यायालयाचं पालन करत नसेल तर समान नागरी कायद्याची भाषा का करता? प्रत्येकाने धर्माच्या पलिकडे जाऊन कोर्टाच्या आदेशाचं पालन करावं. धर्माच्यावर कायदा आहे. आम्ही कायद्याचे पालन करतो. इतरांनी पालन करावं, असं राऊत म्हणाले.

तर देशात अशांतता होईल

कोणी चिथावणीची भाषा करत असेल तर समान नागरी कायद्याचं उल्लंघन आहे. महाराष्ट्रात कोणी चिथावणीची भाषा करत असेल, फक्त राजकीय स्वार्थासाठी केंद्रात बसलेला पक्ष अशा प्रकारे चिथावणीखोरांना बळ देत असेल तर पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि देशाचे गृहमंत्री अमित शहा यांनी या गोष्टीची गांभीर्याने दखल घेण्याची गरज आहे. राज्य नाही तर देश अशांत होईल, अशी भीतीही त्यांनी व्यक्त केली.

भोंग्याबाबत सल्ले देऊ नये

मुंबईत महाराष्ट्रात भोंगेच नसतील आणि तुम्ही तुमचे भोंगे लावणार असाल तर तुम्ही आंदोलन करताय की बेकायदेशीर कृत्य करत आहात? आंदोलन काय असतं हे बघा. आंदोलनाचा सर्वात जास्त अनुभव शिवसेनेला आहे. माझ्या बाजूला शिशीर शिंदे आहेत. ते आंदोलनाचे जनक आहे. कशी आणि का करायची हे शिवसेनेकडून शिका. प्रसिद्धीसाठी आंदोलनं नसतात. आम्ही 50 वर्ष आंदोलन करत आहोत. आम्ही सत्तेत असलो तरी आंदोलनाशी आमचा संबंध आहे. काही लोकांचे छंद असतात. काही लोक राजाकारणात हौशे नौशे गवशे असतात. त्यांना राजकीय बळ प्रेरणा मिळत असते सर्व बाबतीत. त्यातून हे प्रकार घडत असतात. पण महाराष्ट्रात ठाकरेंचं सरकार आहे. बाळासाहेबांचे पूत्रं आहेत. त्यामुळे रस्त्यावरील नमाजबाबत काय करायचं आणि बेकायदेशीर भोंग्याबाबत काय करायचं याचे सल्ले कुणी देऊ नये, असा टोलाही त्यांनी लगावला.

Follow Us
नेपाळमध्ये अडकलेल्या ११५ महाराष्ट्रीयांना मुख्यमंत्र्यांकडून मदत
नेपाळमध्ये अडकलेल्या ११५ महाराष्ट्रीयांना मुख्यमंत्र्यांकडून मदतीचा हात, सुखरूप परत आणणार
मुंबई महापालिकेकडून शालेय साहित्य वाटपास विलंब: इराण युद्ध कारणीभूत
मुंबईतील शालेय मुलांना छत्र्या मिळेनात: मुंबई महापालिकेचे अजब उत्तर इराण युद्ध
शिल्पा गवारे कुटुंबीयांकडून छळाचा आरोप, न्यायची मागणी
पिंपरी चिंचवडमधील शिल्पा गवारे मृत्यू प्रकरण: पती, सासू-सासरे आणि दिराला पोलीस कोठडी
नेपाळमध्ये अडकलेल्या नागपूरच्या 106 पर्यटकांची सुखरूप सुटका
नेपाळमध्ये अडकलेल्या नागपूरच्या 106 पर्यटकांची सुखरूप सुटका, मुख्यमंत्री फडणवीसांच्या प्रयत्नांनी परतीचा प्रवास सुरू
ट्रोलर्सवरील प्रतिक्रियेवरून रोहित पवारांचा मुख्यमंत्र्यांवर निशाणा
ट्रोलर्सवरील प्रतिक्रियेवरून रोहित पवारांचा मुख्यमंत्र्यांवर निशाणा
दिशा सालियान प्रकरणाची मुंबई हाटकोर्टात सुनावणी पार
Disha Salian Case : दिशा सालियान प्रकरणाची मुंबई हाटकोर्टात सुनावणी, काय सुनावणी घडलं?
नेपाळ पुराचा बिहारला फटका: पाटणा, चंपारण, गोपाळगंज, सारणमध्ये सतर्कता
नेपाळमधील महापुराचा बिहारला फटका: गंगा नदीकाठच्या झोपड्या पाण्याखाली
धक्कादायक! पोटच्या मुलालाच इतकं मारलं की... श्रावण महिन्यात मांसाहार
धक्कादायक! पोटच्या मुलालाच इतकं मारलं की... श्रावण महिन्यात मांसाहार मागणाऱ्या लेकाला पालकांनीच संपवलं
यंदाही नारळी पौर्णिमेनिमित्त आदित्य ठाकरे वरळी कोळीवाड्यात
यंदाही नारळी पौर्णिमेनिमित्त आदित्य ठाकरे वरळी कोळीवाड्यात; सांस्कृतिक सोहळ्यांमध्ये सहभाग
MPSC पेपरफुटी प्रकरणावर फडणवीसांचा मोठा निर्णय, दोषींवर कठोर...
MPSC पेपरफुटी प्रकरणावर फडणवीसांचा मोठा निर्णय, दोषींवर कठोर कारवाईचे निर्देश