AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

शरद पवार तेव्हा कोणत्या एजन्सीला घाबरून आमच्यासोबत येत होते?; देवेंद्र फडणवीस यांचा पुन्हा हल्लाबोल

राष्ट्रपती राजवटीवर मी कालच भाष्य केलं आहे. मी खुलासा केला आहे तो खरा आहे. त्यावेळी शरद पवार यांनी आमच्यासोबत चर्चा केली होती. राष्ट्रपती राजवट लागू द्या. आम्ही सरकार बनवत नाही, असं त्यांनी राज्यपालांना सांगितलं होतं, असा दावा फडणवीस यांनी केला.

शरद पवार तेव्हा कोणत्या एजन्सीला घाबरून आमच्यासोबत येत होते?; देवेंद्र फडणवीस यांचा पुन्हा हल्लाबोल
devendra fadnavis Image Credit source: tv9 marathi
| Updated on: Oct 05, 2023 | 2:50 PM
Share

विनायक डावरुंग, टीव्ही9 मराठी प्रतिनिधी, मुंबई | 5 ऑक्टोबर 2023 : राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्या सांगण्यावरूनच राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करण्यात आली होती, असा खळबळजनक दावा राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केला होता. त्यामुळे राज्यात एकच खळबळ उडाली आहे. शरद पवारच 2019च्या राजकीय खेळी मागे असल्याचंही फडणवीस यांच्या दाव्यातून स्पष्ट झालं आहे. तर, राष्ट्रवादीचे नेते तपास यंत्रणांना घाबरून भाजपसोबत गेल्याचा दावा शरद पवार यांनी केला होता. त्यावरूनही देवेंद्र फडणवीस यांनी जोरदार पलटवार केला आहे.

शरद पवार यांनी 2019मध्ये आमच्याशी चर्चा केली होती. ते आमच्यासोबत यायला तयार होते. त्याआधी 2017 लाही त्यांनी आमच्याशी चर्चा केली होती. कोणत्या एजन्सीला घाबरून त्यांनी चर्चा केली होती? तेव्हा पवारसाहेब कोणत्या एजन्सीला घाबरून आमच्यासोबत येत होते का? असा सवाल देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे.

अजितदादांनीच स्पष्ट केलंय

शरद पवार यांच्या मान्यतेनेच आम्ही भाजपला पाठिंबा दिला आहे असं अजित पवार यांनी स्पष्टच सांगितलं आहे. पवार साहेबांशी चर्चा करून आम्ही सह्या करूनच आलो आहोत हेही अजित पवार यांनी स्पष्ट केलं आहे. आता सगळं गेल्यानंतर आरोप करणं योग्य नाही, असं फडणवीस म्हणाले.

कुठे ना कुठे संधी मिळतेच

अजितदादा लवकरच मुख्यमंत्री होतील असं अन्न आणि औषध प्रशासन मंत्री धर्मराव बाबा अत्राम म्हणाले होते. त्यावरही फडणवीस यांनी भाष्य केलं आहे. राजकारणात कुठे ना कुठे संधी मिळतेच. अजितदादा हे मोठे नेते आहेत. आमच्या शुभेच्छा त्यांच्या पाठिशी आहेत. मात्र, एकनाथ शिंदे मुख्यमंत्री आहेत आणि तेच मुख्यमंत्री राहणार आहेत, आम्ही सर्व निवडणूका एकत्रित लढणार आहोत. काल मी अतिशय क्लिअर बोललो आहे. काही लोकाना माझं वाक्य समजलं नाही. त्यांनी समजून घेतलं पाहिजे, असंही त्यांनी सांगितलं.

म्हणून शिंदे दिल्लीला

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज अचानक दिल्ली दौऱ्यावर गेले आहेत. त्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे. त्यावरही त्यांनी भाष्य केलं. मी दिल्लीला जाणार नाही. दिल्लीत नक्षलवादाबाबतची बैठक आहे. या बैठकीला राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना बोलावलं आहे. त्यासाठी ते गेले आहेत, असं त्यांनी सांगितलं.

Follow Us
परीक्षा रद्द, स्वप्नं उद्ध्वस्त; 3 विद्यार्थ्यांनी उचललं टोकाचं पाऊल
परीक्षा रद्द, स्वप्नं उद्ध्वस्त; 3 विद्यार्थ्यांनी उचललं टोकाचं पाऊल.
मिसिंग लिंकवर मृत्यूचा थरार; बसची वाहनांना जोरदार धडक आणि क्षणार्धात..
मिसिंग लिंकवर मृत्यूचा थरार; बसची वाहनांना जोरदार धडक आणि क्षणार्धात...
राष्ट्रवादीमधील बड्या नेत्याकडून पवारांकडे पार्थ पवार यांची तक्रार
राष्ट्रवादीमधील बड्या नेत्याकडून पवारांकडे पार्थ पवार यांची तक्रार.
पडद्यामागे नेमकं काय घडतंय? राष्ट्र्वादी (SP) च्या पुण्यातील बैठकीबाबत
पडद्यामागे नेमकं काय घडतंय? राष्ट्र्वादी (SP) च्या पुण्यातील बैठकीबाबत.
राष्ट्रवादीत मोठं काहीतरी घडणार? निवडणूक आयोगाला दिलेल्या या पत्रात...
राष्ट्रवादीत मोठं काहीतरी घडणार? निवडणूक आयोगाला दिलेल्या या पत्रात....
ही मशीद नाही मंदिरच! 800 वर्षांपासून सुरु असलेल्या वादावर, उच्च...
ही मशीद नाही मंदिरच! 800 वर्षांपासून सुरु असलेल्या वादावर, उच्च....
शेतकरी मोर्चादरम्यान मोठा गोंधळ, राजू शेट्टी, महादेव जानकरांसह........
शेतकरी मोर्चादरम्यान मोठा गोंधळ, राजू शेट्टी, महादेव जानकरांसह.........
सरकारच्या नव्या निर्णयाने राज्यात खळबळ; सदावर्तेंचा जोरदार विरोध......
सरकारच्या नव्या निर्णयाने राज्यात खळबळ; सदावर्तेंचा जोरदार विरोध.......
मान्सूनबाबत मोठी अपडेट! अंदमानात 16 मेच्या आसपास तर, कोकणात पावसाचं...
मान्सूनबाबत मोठी अपडेट! अंदमानात 16 मेच्या आसपास तर, कोकणात पावसाचं....
कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी गुड न्यूज, मुख्यमंत्र्यांनी मंचावरून केली
कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी गुड न्यूज, मुख्यमंत्र्यांनी मंचावरून केली.