AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

तीन पक्षांसोबत या पक्षांनीही मविआसोबत यावे…विधानसभा निवडणुकीसाठी शरद पवार यांनी उघडले पत्ते

Sharad Pawar press conference: महाविकास आघाडीतील या तीन पक्षांसोबत डावे पक्ष आणि इतर पक्षांनी यावे, असे शरद पवार यांनी शुक्रवारी माध्यमांशी बोलताना सांगितले. लवकरात लवकर मतदार संघाचे निर्णय द्या. लोकांसमोर पर्याय द्या, असे शरद पवार यांनी सांगितले.

तीन पक्षांसोबत या पक्षांनीही मविआसोबत यावे...विधानसभा निवडणुकीसाठी शरद पवार यांनी उघडले पत्ते
Sharad Pawar
Jitendra Zavar
Jitendra Zavar | Updated on: Aug 23, 2024 | 1:39 PM
Share

राज्यात विधानसभा निवडणुकीसाठी तीन पक्षांची बैठक होणार होती. परंतु बदलापूरचा विषय समोर आल्यामुळे ती बैठक स्थगित झाली. आता 27 ऑगस्ट रोजी काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) आणि शिवसेना (उबाठा) बैठक होणार आहे. या बैठकीत विधानसभा निवडणुकीच्या जागा वाटपांवर चर्चा करण्यात येणार आहे. तसेच महाविकास आघाडीतील या तीन पक्षांसोबत डावे पक्ष आणि इतर पक्षांनी यावे, असे शरद पवार यांनी शुक्रवारी माध्यमांशी बोलताना सांगितले. लवकरात लवकर मतदार संघाचे निर्णय द्या. लोकांसमोर पर्याय द्या, अशी आपली अपेक्षा असल्याचे शरद पवार यांनी सांगितले.

बदलापूर घटनेबाबत बोलतान शरद पवार म्हणाले की, बदलापुरातील घटना म्हणजे लोकांनी आपली प्रतिक्रिया व्यक्त केली होती. त्या जनभावना होत्या. त्यामुळे त्या आंदोलकांवर गुन्हे दाखल करणे योग्य नाही. राज्य सरकार आणि गृहखात्याने त्याबाबत संवेदनशील व्हावे.

बदलापूर प्रकरण ही धक्का देणारी घटना आहे. या प्रकरणी राज्य सरकारने सतर्क राहून कठोर भूमिका घेतली पाहिजे. हा प्रकार बदलापूरपर्यंतच मर्यादीत नाही. मुलींवर अत्याचार, बालिकांवर अत्याचाराच्या घटना वाढत आहेत. कायदा सुव्यवस्थेची यंत्रणा जागरूक करावी लागणार आहे. या प्रकरणी मी कोणाला दोष देत नाही. सगळ्यांनी शांततेत काम करावे. या घटना वाढत आहेत थांबत नाही. त्यामुळे पोलिस दलाने अधिक संवेदनशील काम केले पाहिजे. परत गुन्हे दाखल करण योग्य नाही.

ही सुरक्षा केंद्राने दिली

शरद पवार यांना पुन्हा झेड प्लस सुरक्षा दिली. विधानसभा निवडणुकीमुळे ही सुरक्षा दिली का? असा प्रश्न शरद पवार यांना विचारले. त्याबाबत बोलताना शरद पवार म्हणाले की, या प्रकरणी मी जास्त बोलू इच्छित नाही. सुरक्षा राज्याने किती वर्ष दिली आहे. केंद्राने ही सुरक्षा दिली आहे. केंद्राने तीन लोकांना सुरक्षा दिली. त्यात माझे एक नाव आहे. केंद्र सरकारकडे आलेल्या माहितीनुसार, ही सुरक्षा दिली.

सहकार चळवळीत राजकारण नको

सहकारी चळवळीत राजकारण कधी येत नव्हती. यापूर्वी अस घडले नव्हते. राज्य सरकार एक नीती तयार करते सगळ्या अडचणीत असलेल्या कारखान्यांना मदत मिळत होते. पण आता तसे होताना दिसत नाही. आता राजकारण होत आहे. शपथ घेताना आपण न्यायाने राहू, असे होत पण तसे आता होताना दिसते नाही, असे शरद पवार यांनी म्हटले.

Follow Us
मुंबई–पुणे एक्सप्रेसवेवर पुन्हा दरड कोसळली; वाहतूक एकाच लेनवर
Breaking! मुंबई–पुणे एक्सप्रेसवेवर पुन्हा दरड कोसळली; वाहतूक एकाच लेनवर, प्रशासन अॅक्शन मोडमध्ये
'दादांच्या आठवणी कुठे नाहीत...' पंढरपूर वारीदरम्यान सुनेत्रा पवारांचं
Sunetra Pawar | 'दादांच्या आठवणी कुठे नाहीत...' पंढरपूर वारीदरम्यान सुनेत्रा पवारांचं भावनिक विधान
कल्याण-डोंबिवलीत पुन्हा पावसाचा कहर! मुसळधार सरींनी नागरिकांची धावपळ
Heavy Rain | कल्याण-डोंबिवलीत पुन्हा पावसाचा कहर! अचानक मुसळधार सरींनी नागरिकांची धावपळ
जयंत पाटील–विनोद तावडे भेटीमुळे महाराष्ट्राच्या राजकारणात मोठी खळबळ
NDAमध्ये शरद पवारांची एन्ट्री? जयंत पाटील–विनोद तावडे भेटीमुळे महाराष्ट्राच्या राजकारणात मोठी खळबळ
इतका भयंकर वेग की मोठमोठे कंटेनर फरफटले गेले, दोघांचा मृत्यू अन्...
इतका भयंकर वेग की मोठमोठे कंटेनर फरफटले गेले, दोघांचा मृत्यू अन्... भुस्खलनाचा थरारक व्हिडीओ समोर
मृत्यूवर हसलो नाही! अमित साटम यांचा सभागृहात मोठा खुलासा; म्हणाले...
Amit Satam | मृत्यूवर हसलो नाही! अमित साटम यांचा सभागृहात मोठा खुलासा; म्हणाले...
देवस्थानाच्या पाहणीला गेले अन् कार चिखलातच अडकली; गिरीश महाजन यांनाही
देवस्थानाच्या पाहणीला गेले अन् कार चिखलातच अडकली; गिरीश महाजन यांनाही पूरस्थितीचा फटका
खाली धावपट्टी आहे की नाही? हेच समजेना! अखेर वैमानिकाने... अंगावर काटा
Navi Mumbai | खाली धावपट्टी आहे की नाही? हेच समजेना! अखेर वैमानिकाने... अंगावर काटा आणणारा व्हिडीओ
स्थानिकांना दिलासा! वाऱ्यांची दिशा बदलेली अन् मोठं संकट टळलं, आता...
स्थानिकांना दिलासा! वाऱ्यांची दिशा बदलेली अन् मोठं संकट टळलं, आता या शहरावर ओढावलं ढगफुटीचं संकट
संत एकनाथ महाराजांची पालखी पंढरपूरकडे रवाना! 427 वर्षांची परंपरा...
Ashadhi Wari 2026 | संत एकनाथ महाराजांची पालखी पंढरपूरकडे रवाना! 427 वर्षांची परंपरा, विठ्ठल... विठ्ठलच्या गजरात दुमदुमलं पैठण