AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

शरद पवार यांनी पाकिस्तानातला ‘तो’ किस्सा सांगितला, देशातील ‘या’ राजकारण्यांवर साधला इशारा

धर्मावरुन राज्य आणि देशात जे राजकारण केलं जातं त्यामुळे आपल्याला खूप दु:ख होतं, असं शरद पवार (Sharad Pawar) म्हणाले. मुंबईतील एका कार्यक्रमात शरद पवार बोलत होते.

शरद पवार यांनी पाकिस्तानातला 'तो' किस्सा सांगितला, देशातील 'या' राजकारण्यांवर साधला इशारा
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवारImage Credit source: tv9 marathi
| Edited By: | Updated on: Feb 04, 2023 | 7:53 PM
Share

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी देशातील सर्व राजकीय नेत्यांना धर्मावरुन राजकारण न करण्याचं आवाहन केलं. धर्मावरुन राज्य आणि देशात जे राजकारण केलं जातं त्यामुळे आपल्याला खूप दु:ख होतं, असं शरद पवार म्हणाले. मुंबईतील एका कार्यक्रमात शरद पवार बोलत होते. यावेळी त्यांनी पाकिस्तानात (Pakistan) त्यांना आलेल्या अनुभवाचा किस्सा सांगितला. बीसीसीआयचा अध्यक्ष असताना आपण टीम इंडियासोबत पाकिस्तानला गेलो होतो. त्यावेळी तिथल्या नागरिकांकडून मिळालेला प्रतिसाद हा चांगला होता. सगळे सौजन्याने वागायचे, असं शरद पवार म्हणाले. “मला दुःख होतं. आपल्या देशात वेगवेगळ्या धर्माचे, भाषाचे लोक आहेत. सर्वांमध्ये चांगले संबंध असले पाहिजेत. एकात्मता आणि प्रेम असलं पाहिजे. पण धर्म नावावर राजकारण करणारे लोक समजात द्वेष पसरवत आहेत”, अशा शब्दांत त्यांनी नाराजी व्यक्त केली.

“मी एकदा एक गोष्ट बोललो तर मीडियाने माझ्यावर टीका केली. मी बीसीसीआयचा अध्यक्ष असताना एकदा भारत विरुद्ध पाकिस्तान मॅच होती. खरंतर तेव्हा भारत सरकारची पाकिस्तानास क्रिकेट टीमला पाठवण्याची परवानगी नव्हती. तेव्हा मी तत्कालीन पंतप्रधान मनमोहन सिंग यांना तरुणांना खेळायला संधी द्या, अशी विनंती केली. त्यानंतर मनमोहन सिंग यांनी परवानगी दिली”, असं शरद पवार यांनी सांगितलं.

“त्यावेळी खेळाडू मला बोलले आम्हाला कराची बघायचं आहे. आम्ही कराचीमध्ये नाश्ता करायला थांबलो. काऊंटर पैसे द्यायला पोहोचलो तेव्हा हॉटेल मालक बोलले पैसे घेणार नाही. ते म्हणाले तुम्ही आमचे पाहुणे आहात”, असं शरद पवार म्हणाले.

“ते म्हणाले टीव्हीवर पाहिलं खेळाडू कराचीमध्ये आले आहेत. आम्ही पाहुण्यांकडून पैसे घेत नाहीत. त्यांनी पैसे घेतले नाहीत”, असा किस्सा शरद पवारांनी सांगितला.

‘ती लोकंसुद्धा भारतात येण्यासाठी तडफडत होते’

“ही गोष्ट सांगतो. माझा अनुभव आहे. किक्रेटच्या निमित्ताने परदेशात जायचो. पाकिस्तान, बांगलादेश, श्रीलंकेत जायचो. पाकिस्तान आणि बांगलादेशची लोकंदेखील भारतात येण्यासाठी तडफडत होते. त्यांचे कोणी नातेवाईक भारतात होते. त्यांना भेटायला भारतात यायचं होतं”, असा दावा शरद पवार यांनी केला.

“सामान्य लोकांमध्ये द्वेष नाही. राजकारणी जे लोक आहेत त्यांच्यात द्वेष आहे, नागरिकांमध्ये नाही”, असं शरद पवार म्हणाले.

“आपल्यालापण याच रस्त्यावरून गेले पाहिजे. जगातील सगळे धर्म, सर्व भाषिक लोक एकत्र आणले पाहिजेत. एकता ठेवली पाहिजे”, असं आवाहन शरद पवार यांनी केलं.

Follow Us
'...तर कॅबिनेट मंत्री पद मिळाले असते, पण,'...काय म्हणाले योगेश कदम?
'...तर कॅबिनेट मंत्री पद मिळाले असते, पण,'...काय म्हणाले योगेश कदम?.
जुन्या वादातून शेजाऱ्यांनी 7 वर्षांच्या मुलीला संपवले, पलंगात मृतदेह..
जुन्या वादातून शेजाऱ्यांनी 7 वर्षांच्या मुलीला संपवले, पलंगात मृतदेह...
भोंदूबाबाचे साटेलोटे, मुलीसोबत उपजिल्हाधिकाऱ्याच्या पतीची जमीन खरेदी
भोंदूबाबाचे साटेलोटे, मुलीसोबत उपजिल्हाधिकाऱ्याच्या पतीची जमीन खरेदी.
भोंदूबाबाच्या विरोधात आणखी एका महिलेची तक्रार,निर्लज्जतेचा कळसच गाठला
भोंदूबाबाच्या विरोधात आणखी एका महिलेची तक्रार,निर्लज्जतेचा कळसच गाठला.
भोंदूबाबा खरात याला एसआयटीने अज्ञातस्थळी हलवले, काय नेमके कारण?
भोंदूबाबा खरात याला एसआयटीने अज्ञातस्थळी हलवले, काय नेमके कारण?.
उद्धव ठाकरे यांचे मातोश्रीत खासदारांशी गुफ्तगू , डॅमेज कंट्रोलसाठी ?
उद्धव ठाकरे यांचे मातोश्रीत खासदारांशी गुफ्तगू , डॅमेज कंट्रोलसाठी ?.
चाकणकरांना खरात लिंग पिसाट आहे हे माहिती होते, तृप्ती देसाई यांचा आरोप
चाकणकरांना खरात लिंग पिसाट आहे हे माहिती होते, तृप्ती देसाई यांचा आरोप.
अशोक खरातला धरणाचे पाणी कोणी दिलं ? मुख्यमंत्र्यांनी काय दिला इशारा?
अशोक खरातला धरणाचे पाणी कोणी दिलं ? मुख्यमंत्र्यांनी काय दिला इशारा?.
भोंदूबाबाला जमीन विकल्यानंतर मुलगा आणि पैसेही गेले,शेतकऱ्याने सांगितले
भोंदूबाबाला जमीन विकल्यानंतर मुलगा आणि पैसेही गेले,शेतकऱ्याने सांगितले.
दर अमावस्या आणि पौर्णिमेला खरात गावात यायचा, गावकऱ्यांनी मांडली व्यथा
दर अमावस्या आणि पौर्णिमेला खरात गावात यायचा, गावकऱ्यांनी मांडली व्यथा.