AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

शिवसेनेचे तब्बल 7 मंत्री उपमुख्यमंत्र्यांना भेटले, गणपत गायकवाड यांच्यावर कारवाईची मागणी

भाजप आमदार गणपत गायकवाड गोळीबार प्रकरणी एक मोठी अपडेट समोर आली आहे. शिवसेनेच्या सर्व मंत्र्यांनी आज उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन आपली भूमिका मांडली आहे. शिवसेनेच्या मंत्र्यांनी गणपत गायकवाड यांच्यावर कारवाई करण्याची मागणी केली आहे. मंत्री शंभूराज देसाई यांनी याबाबत माहिती दिली.

शिवसेनेचे तब्बल 7 मंत्री उपमुख्यमंत्र्यांना भेटले, गणपत गायकवाड यांच्यावर कारवाईची मागणी
| Updated on: Feb 05, 2024 | 5:05 PM
Share

मुंबई | 5 जानेवारी 2024 : आमदार गणपत गायकवाड गोळीबार प्रकरणी एक मोठी अपडेट समोर आली आहे. राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वाची बैठक आज पार पडली. या बैठकीच्या आधी शिवसेनेच्या सर्व मंत्र्यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. यावेळी शिवसेनेच्या मंत्र्यांनी भाजप आमदार गणपत गायकवाड यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याबाबत केलेल्या आरोपांवर भूमिका मांडली. गणपत गायकवाड यांनी माध्यमांसमोर एकनाथ शिंदे यांच्याबाबत असे गंभीर आरोप करणे चुकीचं आहे, असं मत शिवसेनेच्या सर्व मंत्र्यांनी फडणवीसांकडे मांडलं. तसेच गणपत गायकवाड यांच्यावर पक्षाकडून योग्य ती कठोर कारवाई केली जावी, अशी मागणी शिवसेनेच्या मंत्र्यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली. याबाबत शिवसेनेचे नेते आणि राज्याचे उत्पादन शुल्क मंत्री शंभूराज देसाई यांनी प्रतिक्रिया दिली. राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर त्यांनी प्रसारमाध्यमांना प्रतिक्रिया दिली. यावेळी त्यांनी सविस्तर भूमिका मांडली. तसेच “मंत्रिमंडळाच्या बैठकीत बऱ्याच विषयांमध्ये चर्चा झाली. याबाबतची अधिकृत प्रेसनोट मुख्यमंत्री कार्यालयाकडून दिली जाईल”, असं शंभूराज देसाई यांनी सांगितलं.

“आम्ही सर्व शिवसेनेचे मंत्री मंत्रिमंडळाच्या बैठकीत होतो. मंत्रिमंडळाच्या बैठकीपूर्वी आम्ही उपमु्ख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना भेटलो. गोळीबाराच्या विषय वेगळा. पण भारतीय जनता पक्षाचे आमदार गणपत गायकवाड यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याबद्दल जे तथ्यहीन, बिनबुडाचे, ज्याच्यामध्ये कसलाही अर्थ नाही, असे आरोप केले. या आरोपांबद्दल आम्ही आमचं मत देवेंद्र फडणवीस यांच्याकडे मांडलं आहे. हे चुकीचं आहे. त्याअनुषंगाने भाजप पक्षाने योग्य ती कारवाई करावी, असं मत आम्ही देवेंद्र फडणवीस यांच्यासमोर मांडलेलं आहे”, अशी प्रतिक्रिया शंभूराज देसाई यांनी दिली.

‘समन्वय समितीच्या नियमित बैठका होतील’

“समन्वय समितीच्या नियमित बैठका होत असतात. मध्यंतरीच्या काळात समन्वय समितीच्या बैठका काही कारणास्तव होऊ शकलेल्या नाहीत. पण आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार हे एकत्र बसतील. नियमित समन्वय समितीच्या बैठका कशाप्रकारे घ्याव्यात याबाबतचं पुढचं सगळं धोरण ठरवतील. त्याप्रमाणे ते समन्वय समितीला कळवतील. त्यामुळे समन्वय समितीच्या यापुढे नियमित बैठका होतील”, अशी माहिती शंभूराज देसाई यांनी दिली.

‘गणपत गायकवाड यांनी एकदासुद्धा याबाबतचा विषय मांडला नाही’

“मी समन्वय समितीचासुद्धा सदस्य आहे. गणपत गायकवाड ज्या जिल्ह्याचे आमदार आहेत त्या जिल्ह्याचा मी पालकमंत्री आहे. या दीड वर्षात आमदार गणपत गायकवाड यांनी एकदासुद्धा याबाबतचा विषय मांडलेला नाही. किंवा समन्वय समितीच्या बैठकीतही यापूर्वी याविषयी चर्चा झालेली नाही. हा विषय आमदार गणपत गायकवाड यांनी मुख्यमंत्र्यांवर आरोप केला, तो पहिल्यांदाच केलेला आहे. आम्ही आमचं मत देवेंद्र फडणवीस यांच्याकडे मांडलेलं आहे. निश्चितपणे त्याची योग्य दखल फडणवीस घेतील”, अशी आशा त्यांनी व्यक्त केली.

Follow Us
ठाकरेंना विधानपरिषद हवी असेल तर...नरेश म्हस्केंच्या त्या विधानाने...
ठाकरेंना विधानपरिषद हवी असेल तर...नरेश म्हस्केंच्या त्या विधानाने....
महाराष्ट्राचे नवे राज्यपाल जिष्णू देव वर्मा यांचा शपथविधी
महाराष्ट्राचे नवे राज्यपाल जिष्णू देव वर्मा यांचा शपथविधी.
आखाती युद्धाचा भारतावर परिणाम; देशात ESMA कायदा लागू
आखाती युद्धाचा भारतावर परिणाम; देशात ESMA कायदा लागू.
मुंबईनंतर आता ठाण्यातही इलेक्ट्रिक डबल डेकर बस धावणार
मुंबईनंतर आता ठाण्यातही इलेक्ट्रिक डबल डेकर बस धावणार.
पुण्यातील हॉटेलमध्ये सिलेंडरचा तुटवडा, चुलीवर स्वयंपाक करण्याची वेळ
पुण्यातील हॉटेलमध्ये सिलेंडरचा तुटवडा, चुलीवर स्वयंपाक करण्याची वेळ.
उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांचे विधानसभेत महिला दिनानिमित्त निवेदन
उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांचे विधानसभेत महिला दिनानिमित्त निवेदन.
मुंबईत घरी परतल्यावर सूर्यकुमार यादवचं जल्लोषात स्वागत
मुंबईत घरी परतल्यावर सूर्यकुमार यादवचं जल्लोषात स्वागत.
अन् अरे संसार संसार म्हणताना सुनेत्रा पवारांचा आवाज झाला जड
अन् अरे संसार संसार म्हणताना सुनेत्रा पवारांचा आवाज झाला जड.
युद्धामुळे भाजीपाला निर्यातीवर परिणाम, दर घसरले, शेतकरी चिंतेत
युद्धामुळे भाजीपाला निर्यातीवर परिणाम, दर घसरले, शेतकरी चिंतेत.
पुरवठा-समतोल वितरण नियंत्रणासाठी जीवनावश्यक वस्तू कायदा लागू
पुरवठा-समतोल वितरण नियंत्रणासाठी जीवनावश्यक वस्तू कायदा लागू.