AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

अनिल परब यांचा सर्वात गंभीर आरोप, पदवीधर निवडणुकीत मोठा ट्विस्ट

मुंबई पदवीधर निवडणुकीवर शिवसेना ठाकरे गटाचे उमेदवार अनिल परब यांनी आक्षेप नोंदवला आहे. ठाकरे गटाने नोंदवलेली अनेक नावे रद्द करण्यात आली आहेत. आम्ही भरलेले अर्ज ठरवून बाद करण्यात आली आहेत, असा आरोप अनिल परब यांनी केला आहे.

अनिल परब यांचा सर्वात गंभीर आरोप, पदवीधर निवडणुकीत मोठा ट्विस्ट
ठाकरे गटाचे नेते अनिल परब
Chetan Patil
Chetan Patil | Updated on: Jun 20, 2024 | 5:42 PM
Share

विधान परिषदेच्या मुंबई पदवीधर निवडणुकीत मोठा ट्विस्ट येताना दिसत आहे. कारण शिवसेना ठाकरे गटाचे उमेदवार अनिल परब यांनी आज पत्रकार परिषद घेऊन निवडणूक आयोगावर गंभीर आरोप केले आहेत. खरंतर शिवसेना आमदार अपात्रतेची सुनावणी सुप्रीम कोर्टात प्रलंबित आहे. त्यामुळे या निवडणुकीनंतर विधान परिषदेची निवडणूक व्हावी, अशी त्यांनी मागणी केली. यासोबतच त्यांनी निवडणूक आयोगावर गंभीर आरोप केले आहेत. पदवीधर निवडणुकीवर अनिल परब यांनी आक्षेप नोंदवला आहे. ठाकरे गटाने नोंदवलेली अनेक नावे रद्द करण्यात आली आहेत. आम्ही भरलेले अर्ज ठरवून बाद करण्यात आली आहेत, असा आरोप अनिल परब यांनी केला आहे. नावं का गाळली ते आम्हाला कळायला हवं, अशी भूमिका अनिल परब यांनी पत्रकार परिषद घेत मांडली.

“शिवसेनेने जी नावे नोंदणी केली होती त्यामध्ये बरीचशी आमची नावे आली. पण काही आली नाहीत. पण जी नावे आली नाहीत त्यांचे आम्ही कारणे विचारले. त्याचे कारणे आम्हाला सांगितली गेली. पण आता जो सप्लिमेंटरी रोल खूप अगोदर यायला पाहिजे होतो तो चार दिवसांआधी प्रसिद्ध झाला. या सप्लिमेंटरी रोलमध्ये आम्ही जी हजारो नावे नोंदवली होती, नाव नोंदवताना तो फॉर्म भरल्यानंतर आमचा फॉर्म चेक केला जातो. चेक केल्यानंतर आम्हाला ती स्लिप दिली जाते. याचा अर्थ असा आहे की, मी फॉर्म भरला आहे. तो फॉर्म चेक करुन सबमीट झाला तरच मला स्लिप दिली जाते. माझे फॉर्म ज्यावेळेला काही कारणास्तव नाकारले जातात त्यावेळेला काही ऋुटी नोंदवल्या जातात. कोणते कागदपत्रे नाहीत, याबद्दल माहिती दिली जाते. अशी फॉर्म नाकारण्याची कारणे तिथेच सांगितली जातात”, असं अनिल परब म्हणाले.

‘आमच्या पक्षाची नावे ही ठरवून बाद केली’

“आता जो 40 हजारांचा रोल आला त्यामध्ये आमच्या पक्षाची नावे ही ठरवून बाद केली आहेत असं चित्र दिसत आहे. आमच्याकडे खूप स्लिप्स आहेत, ज्यामध्ये आमचा फॉर्म तुमच्याकडे गेल्याची पोचपावती आहे. ऑनलाईन रजिस्ट्रेशन केलं तर त्याचा स्वीकार होत नाही. माझ्या स्वत:च्या मुलीचा फॉर्म रिजेक्ट झाला आहे. माझ्या घरातील असे अनेकांचे फॉर्म रिजेक्ट झाले आहेत. अपलोड झाले आहेत, त्याची पोचपावती आली आहे. पण कुठलंही कारण न देता, मोठ्या प्रमाणात आमच्या पक्षाने नोंदवलेली नावे कट झाली आहे. भाजपने नोंदवलेली सर्व नावे आली आहेत, असा आमचा आरोप आहे”, अशी भूमिका अनिल परब यांनी मांडली.

‘सर्वांना मतदान करायला मिळायला हवं’

“हा घोळ आपल्यासमोर आणण्याच्या अगोदर आम्ही निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यांची भेट घेतली. तिथे कुलकर्णी नावाचे अधिकारी आणि कलेक्टर होते. आम्ही त्यांच्यासमोर सगळ्या बाजू मांडल्या. आमचा अर्ज नाकारण्यामागील कारण विचारलं. आता चार-पाच दिवस राहिले आहेत. सर्वांना मतदान करायला मिळायला हवं, अशी मागणी आम्ही केलेली आहे. आता ते काय करतात ते बघू. पण जी नावे आमच्या पक्षाकडून गेली आहेत ती ठरवून बाद करण्यात आली आहेत”, असा आरोप अनिल परब यांनी केला.

“आमचे शिवसैनिक पाच ते दहा फॉर्म पाठवत होते. कारण त्यांनी तशी परवानगी दिली होती. ती नावे त्यांनी रद्द केले आहेत. याशिवाय वांद्र्याला राहणाऱ्या मतदाराचं नाव मुलुंडला आलं आहे. हे ठरवून टाकली आहेत की यंत्रणेतील चूक आहे, याबाबत तपास व्हायला हवा”, असं मत अनिल परब यांनी मांडलं.

Follow Us
संतोष पंडित यांना अखेर जामीन मंजूर, चंद्रकांत पाटील व्हिडिओ प्रकरणात..
संतोष पंडित यांना अखेर जामीन मंजूर, चंद्रकांत पाटील व्हिडिओ प्रकरणात दिलासा
गणेशोत्सवात आंदोलन करणं... चंद्रशेखर बावनकुळे यांचे जरांगे पाटलांना...
गणेशोत्सवात आंदोलन करणं... चंद्रशेखर बावनकुळे यांचे मनोज जरांगे पाटील यांना आवाहन
आमच्या वहिनी आहेत ना’ या अभियानांतर्गत राष्ट्रवादीचा मास्टर प्लॅन...
आमच्या वहिनी आहेत ना’ या अभियानांतर्गत राष्ट्रवादीचा मास्टर प्लॅन; रणनीतीकार प्रशांत किशोर यांच्या नेतृत्त्वात...
शिवसेना कुणाची हे तर... आजच सुनावणी पार पडली अन् शिंदे गटातील महिला...
शिवसेना कुणाची हे तर... आजच सुनावणी पार पडली अन् शिंदे गटातील महिला नेत्याचं मोठं विधान
दिशा सालियान प्रकरणात आदित्य ठाकरेंनी मांडली भूमिका, स्वतः ट्वीट...
दिशा सालियान प्रकरणात आदित्य ठाकरेंनी मांडली भूमिका, स्वतः ट्वीटद्वारे केला खुलासा!
माझा मुंबईत जाऊनच जीव निघालाा तर... जरांगे पाटलांची प्रतिक्रिया...
माझा मुंबईत जाऊनच जीव निघालाा तर...  आंदोलनाविषयी मनोज जरांगे पाटलांची मोठी प्रतिक्रिया!
त्यांच्यांतील लोकंच म्हणातात, जरांगे आंदोलनस्थळी... छगन भुजबळ नेमकं...
त्यांच्यांतील लोकंच म्हणातात, जरांगे आंदोलनस्थळी... छगन भुजबळ नेमकं काय म्हणाले?
बीड पाटोदा रस्त्यावर मराठा आंदोलकांचा रास्ता रोको; चलो मुंबईचा नारा...
बीड पाटोदा रस्त्यावर मराठा आंदोलकांचा रास्ता रोको; चलो मुंबईचा नारा...
मनोज जरांगे पाटलांची प्रकृती खालावली, डॉक्टरांनी दिली महत्त्वाची...
मनोज जरांगे पाटलांची प्रकृती खालावली, डॉक्टरांनी दिली महत्त्वाची माहिती
बिमारी का बहाना है, तुम्हे मुंबई... गुणरत्न सदावर्तेंनची जरांगेंवर...
बिमारी का बहाना है, तुम्हे मुंबई... गुणरत्न सदावर्तेंनची मनोज जरांगेंवर अजब कविता