AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

“…आता हळूहळू यांचा जय महाराष्ट्र होऊन जाईल”; निकालावरून सत्ताधाऱ्यांनी विरोधकांना मोडीत काढलं

उद्धव ठाकरे, शरद पवार यांच्याबरोबर चर्चा झाली असली तरी पंतप्रधान मोदींना कोणीही हरवू शकत नाहीत असा विश्वासही त्यांनी भाजपबद्दल बोलून दाखवला आहे.

...आता हळूहळू यांचा जय महाराष्ट्र होऊन जाईल; निकालावरून सत्ताधाऱ्यांनी विरोधकांना मोडीत काढलं
महादेव कांबळे
महादेव कांबळे | Updated on: May 11, 2023 | 9:35 PM
Share

मुंबई : सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर राज्यातील राजकीय वातावरण ढवळून निघाले आहे. सत्ताधारी आणि विरोधकांकडून एकमेकावंर आरोप प्रत्यारोपांच्या फैरी झडत आहेत. त्यामुळे आता न्यायालयाच्या निकालानंतर आता सत्ताधाऱ्यांना बळ मिळाला असल्याने शिवसेनेचे प्रतोद भरत गोगावले यांनी विरोधकांवर जोरदार हल्लाबोल केला आहे. विरोधकांवर टीका करताना भरत गोगावले यांनी टीका करताना विरोधकांचे आता थोबडे काळे झालेले आहेत. त्यामुळे त्यांना आता कुठेच बोलायला वाव नाही असा टोलाही त्यांनी ठाकरे गटाला लगावला आहे.

भरत गोगावले यांनी टीका करताना विरोधकांवर सडकून टीका केली आहे. न्यायालयाचा निकाल लागल्यानंतर विरोधकांना धक्का बसला असल्याचे सांगितले.

या निकालामुळे आता विरोधकांचे थोबडे काळे झालेले आहेत. विरोधकांना जे-जे काय अपेक्षित होतं ते घडलेलं नाही त्यामुळे ते आता कायम नाराज राहणार असल्याचा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे.

हा निकाल लागण्याआधीपासूनच आम्हाला आमच्या निर्णयावर आणि न्यायालयावर विश्वास असल्याचे सांगत या निर्णयाबाबत आम्हाला अडचण येणार नाही हे आम्ही आधीच सांगितलं होतं त्यामुळे आम्ही समाधानी आहोत, आनंदीत आहोत असंही त्यांनी या निर्णयावर बोलताना सांगितले.

भरत गोगावले यांनी टीका करताना त्यांनी संजय राऊत यांच्यावरही जोरदार निशाणा साधला आहे. जे रोज सकाळी उठून चर्चा करत होते, की सरकार पडेल, निकाल आमच्या बाजूने लागेल, त्यांची तोंडं आता बंद झालेली आहेत. त्यामुळे उद्यापासून हे काही बोलणार नाही कारण त्यांचं भविष्य खोटं ठरलेलं आहे.

त्यांचा पोपट उडून गेलेला आहे असं म्हणत त्यांनी संजय राऊत यांच्यावर टीका केली आहे. तर विरोधकांकडून नरेंद्र मोदी यांच्यावरही जोरदार टीका केली जाते, तसेच विरोधकांनी आता लोकसभेच्या निवडणुकीसाठी नवी मोट बांधली असल्याचे सांगत त्यांनी नितिश कुणार यांच्यावरही निशाणा साधला आहे.

नितिश कुमार यांनी सर्वांना एकत्र घेतले आहे, त्यांनी फक्त पंतप्रधान पदी मोदी नको यासाठी ते एकत्र आलेले आहेत मात्र तसं काय होणार नाही असा टोलाही त्यांनी विरोधकांना लगावला आहे.

विरोधकांनी नितिश कुमार यांना घेऊन मोट बांधली असल्यामुळे विरोधकांसह सगळ्यांना वाटतं की नितिश कुमार आले म्हणजे काहीतरी चमत्कार घडेल पण चमत्कार घडणार नाही त्यांना परत जावे लागणार आहे असा टोलाही त्यांनी विरोधकांनी लगावला आहे.

उद्धव ठाकरे, शरद पवार यांच्याबरोबर चर्चा झाली असली तरी पंतप्रधान मोदींना कोणीही हरवू शकत नाहीत असा विश्वासही त्यांनी भाजपबद्दल बोलून दाखवला आहे.

वज्रमूठ सभेवरूनही त्यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला आहे. ही सभा हळूहळू खि्ळखिळी झाली आहे त्यातच महाविकास आघाडीमध्येच मतभेद चालू आहे. त्यामुळे त्यांची वज्रमूठ आता खिळखिळी झाली आहे असा टोला त्यांनी मविआला लगावला आहे.

Follow Us
तर एकनाथ शिंदेंना पक्ष मिळालाच नसता' त्या निर्णयावर...
तर एकनाथ शिंदेंना पक्ष मिळालाच नसता' त्या निर्णयावर... अखेर कपिल सिब्बल यांची कोर्टाकडे मोठी मागणी
भर मंचावरून जरांगेंचं व्यंग; अखेर बावनुकळे म्हणाले, 'माझ्या शरीर...
Manoj Jarange Video | भर मंचावरून मनोज जरांगेंचं व्यंग; अखेर बावनुकळे म्हणाले, 'माझ्या शरीरावरून, चेहऱ्यावरून...
पंजाबचे माजी मुख्यमंत्री सुखबीर सिंह यांच्यावर हल्ल्याचं नेमकं कारण...
Sukhbir Singh Badal | पंजाबच्या माजी मुख्यमंत्री सुखबीर सिंह यांच्यावर हल्ल्याचं नेमकं कारण काय? याआधीही... मोठी अपडेट समोर
अगामी सुनावणी मंगळवारी, पण... कोर्टाबाहेर येताच संजय राऊत नेमकं काय...
अगामी सुनावणी मंगळवारी, पण... कोर्टाबाहेर येताच संजय राऊत नेमकं काय म्हणाले?
शिवसेनेच्या सुनावणीत मोठा ट्विस्ट! हायकोर्टही पक्षाची नोंदणी रद्दचे...
शिवसेनेच्या सुनावणीत मोठा ट्विस्ट! हायकोर्टही पक्षाची नोंदणी रद्दचे आदेश आयोगाला देऊ शकत नाही, मग...
अपात्र होणाऱ्या... एकनाथ शिंदेंच्या अडचणी वाढल्या? कपिल सिब्बल...
अपात्र होणाऱ्या... एकनाथ शिंदेंच्या अडचणी वाढल्या? कपिल सिब्बल यांनी नेमका युक्तिवाद काय लढवला?
मोठी बातमी! निकाल कोणाच्या बाजून झुकतोय? सिब्बल यांचा नेमक्या...
मोठी बातमी! निकाल कोणाच्या बाजूने झुकतोय? सिब्बल यांचा नेमक्या मुद्यावर युक्तिवाद, कोर्टाचं निदर्शन काय?
कपिल सिब्बल यांचा निवडणूक आयोगाच्या निर्णयाला आव्हान
शिवसेना पक्षचिन्ह प्रकरण: कपिल सिब्बल यांचा निवडणूक आयोगाच्या निर्णयाला आव्हान
पेगलवाडी रस्त्याची पाहणी. विद्यार्थ्यांशी साधला संवाद.
आदित्य ठाकरे यांच्याकडून त्र्यंबकेश्वरमधील पेगलवाडी रस्त्याची पाहणी. विद्यार्थ्यांशी साधला संवाद.
कोर्टातील निकालाच मोठा परिणाम हा... शिंदेंच्या गट नेत्याचं मोठं विधान
कोर्टातील निकालाच मोठा परिणाम हा... एकीकडे कोर्टात सुनावणी सुरू दुसरीकडे शिंदेंच्या गट नेत्याचं मोठं विधान