AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

“…आता हळूहळू यांचा जय महाराष्ट्र होऊन जाईल”; निकालावरून सत्ताधाऱ्यांनी विरोधकांना मोडीत काढलं

उद्धव ठाकरे, शरद पवार यांच्याबरोबर चर्चा झाली असली तरी पंतप्रधान मोदींना कोणीही हरवू शकत नाहीत असा विश्वासही त्यांनी भाजपबद्दल बोलून दाखवला आहे.

...आता हळूहळू यांचा जय महाराष्ट्र होऊन जाईल; निकालावरून सत्ताधाऱ्यांनी विरोधकांना मोडीत काढलं
| Updated on: May 11, 2023 | 9:35 PM
Share

मुंबई : सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर राज्यातील राजकीय वातावरण ढवळून निघाले आहे. सत्ताधारी आणि विरोधकांकडून एकमेकावंर आरोप प्रत्यारोपांच्या फैरी झडत आहेत. त्यामुळे आता न्यायालयाच्या निकालानंतर आता सत्ताधाऱ्यांना बळ मिळाला असल्याने शिवसेनेचे प्रतोद भरत गोगावले यांनी विरोधकांवर जोरदार हल्लाबोल केला आहे. विरोधकांवर टीका करताना भरत गोगावले यांनी टीका करताना विरोधकांचे आता थोबडे काळे झालेले आहेत. त्यामुळे त्यांना आता कुठेच बोलायला वाव नाही असा टोलाही त्यांनी ठाकरे गटाला लगावला आहे.

भरत गोगावले यांनी टीका करताना विरोधकांवर सडकून टीका केली आहे. न्यायालयाचा निकाल लागल्यानंतर विरोधकांना धक्का बसला असल्याचे सांगितले.

या निकालामुळे आता विरोधकांचे थोबडे काळे झालेले आहेत. विरोधकांना जे-जे काय अपेक्षित होतं ते घडलेलं नाही त्यामुळे ते आता कायम नाराज राहणार असल्याचा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे.

हा निकाल लागण्याआधीपासूनच आम्हाला आमच्या निर्णयावर आणि न्यायालयावर विश्वास असल्याचे सांगत या निर्णयाबाबत आम्हाला अडचण येणार नाही हे आम्ही आधीच सांगितलं होतं त्यामुळे आम्ही समाधानी आहोत, आनंदीत आहोत असंही त्यांनी या निर्णयावर बोलताना सांगितले.

भरत गोगावले यांनी टीका करताना त्यांनी संजय राऊत यांच्यावरही जोरदार निशाणा साधला आहे. जे रोज सकाळी उठून चर्चा करत होते, की सरकार पडेल, निकाल आमच्या बाजूने लागेल, त्यांची तोंडं आता बंद झालेली आहेत. त्यामुळे उद्यापासून हे काही बोलणार नाही कारण त्यांचं भविष्य खोटं ठरलेलं आहे.

त्यांचा पोपट उडून गेलेला आहे असं म्हणत त्यांनी संजय राऊत यांच्यावर टीका केली आहे. तर विरोधकांकडून नरेंद्र मोदी यांच्यावरही जोरदार टीका केली जाते, तसेच विरोधकांनी आता लोकसभेच्या निवडणुकीसाठी नवी मोट बांधली असल्याचे सांगत त्यांनी नितिश कुणार यांच्यावरही निशाणा साधला आहे.

नितिश कुमार यांनी सर्वांना एकत्र घेतले आहे, त्यांनी फक्त पंतप्रधान पदी मोदी नको यासाठी ते एकत्र आलेले आहेत मात्र तसं काय होणार नाही असा टोलाही त्यांनी विरोधकांना लगावला आहे.

विरोधकांनी नितिश कुमार यांना घेऊन मोट बांधली असल्यामुळे विरोधकांसह सगळ्यांना वाटतं की नितिश कुमार आले म्हणजे काहीतरी चमत्कार घडेल पण चमत्कार घडणार नाही त्यांना परत जावे लागणार आहे असा टोलाही त्यांनी विरोधकांनी लगावला आहे.

उद्धव ठाकरे, शरद पवार यांच्याबरोबर चर्चा झाली असली तरी पंतप्रधान मोदींना कोणीही हरवू शकत नाहीत असा विश्वासही त्यांनी भाजपबद्दल बोलून दाखवला आहे.

वज्रमूठ सभेवरूनही त्यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला आहे. ही सभा हळूहळू खि्ळखिळी झाली आहे त्यातच महाविकास आघाडीमध्येच मतभेद चालू आहे. त्यामुळे त्यांची वज्रमूठ आता खिळखिळी झाली आहे असा टोला त्यांनी मविआला लगावला आहे.

Follow Us
भोंदू खरात प्रकरणाची विशेष कोर्टात सुनावणी; SIT अधिकाऱ्यांकडून....
भोंदू खरात प्रकरणाची विशेष कोर्टात सुनावणी; SIT अधिकाऱ्यांकडून.....
भोंदूबाबा खरात प्रकरणात 11 गुन्हे दाखल, कोर्टात SIT कडून पुन्हा दोन...
भोंदूबाबा खरात प्रकरणात 11 गुन्हे दाखल, कोर्टात SIT कडून पुन्हा दोन....
अशोक खरातला केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यापर्यंत कोण घेऊन गेले?
अशोक खरातला केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यापर्यंत कोण घेऊन गेले?.
खरातच्या संपर्कात अनेक बडे नेते, राऊतांच्या आरोपांनंतर राजकारण तापले
खरातच्या संपर्कात अनेक बडे नेते, राऊतांच्या आरोपांनंतर राजकारण तापले.
जैन समाजासाठी सिलेंडरची सोय, भाजपचा सर्वात मोठा नेता वादाच्या भोवऱ्यात
जैन समाजासाठी सिलेंडरची सोय, भाजपचा सर्वात मोठा नेता वादाच्या भोवऱ्यात.
माणिकराव कोकाटेंना मंत्रिपद नको, सुनील तटकरेंना कोणी केला फोन?
माणिकराव कोकाटेंना मंत्रिपद नको, सुनील तटकरेंना कोणी केला फोन?.
केवळ फोटो असणे म्हणजे त्यांच्या कृत्यात सहभाग नाही - दीपक केसरकर
केवळ फोटो असणे म्हणजे त्यांच्या कृत्यात सहभाग नाही - दीपक केसरकर.
विलीनीकरणाच्या चर्चेसाठी सुनेत्रा पवारांकडे यावे - NCPचा बडा नेता
विलीनीकरणाच्या चर्चेसाठी सुनेत्रा पवारांकडे यावे - NCPचा बडा नेता.
त्यांची अडचण का करता?, मला खाजगीत विचारा, काय म्हणाले शंभूराज देसाई?
त्यांची अडचण का करता?, मला खाजगीत विचारा, काय म्हणाले शंभूराज देसाई?.
पीएनजी घ्या, कदाचित तीन महिन्यानंतर LPG बंद होईल, काय म्हणाले भुजबळ ?
पीएनजी घ्या, कदाचित तीन महिन्यानंतर LPG बंद होईल, काय म्हणाले भुजबळ ?.