AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

‘मुंबईत रेल्वे मार्गावर पाणी साचणार नाही…,’ रेल्वे कॉर्पोरेशनचे महत्वाचे पाऊल

मुंबई रेल्वे विकास कॉर्पोरेशन लिमिटेडने महत्वाचा निर्णय घेतला आहे. पावसाळ्यात मुंबईतील रेल्वे रूळ पाण्याखाली जाऊ नये, यासाठी अर्ज मागवले आहे. एमआरव्हीसीने पूर निवारणासाठी कराव्या लागणाऱ्या उपाययोजना सुचवण्यासाठी हे अर्ज मागवले आहे.

'मुंबईत रेल्वे मार्गावर पाणी साचणार नाही...,' रेल्वे कॉर्पोरेशनचे महत्वाचे पाऊल
मुंबई रेल्वे स्टेशन (फाईल फोटो)
Jitendra Zavar
Jitendra Zavar | Updated on: Jun 14, 2025 | 9:53 AM
Share

पावसाळ्यात मुंबईची तुंबई होत असल्याचे अनेकदा दिसून आले आहे. रेल्वे मार्गावर पाणी साचत असल्यामुळे मुंबईची लाईफ लाईन लोकल सेवाही ठप्प होते. त्यामुळे लाखो मुंबईकरांना अडचणीचा सामना करावा लागतो. मुंबईतील रेल्वे मार्गावर पाणी साचू नये, यासाठी आता महत्वाचे पाऊल उचलण्यात आले आहे. मुंबई रेल्वे विकास कॉर्पोरेशन लिमिटेडने मास्टर प्लॅन तयार करण्यासाठी सल्लागार नेमण्याचा निर्णय घेतला आहे. रेल्वे मार्गावरील पूरस्थिती टाळण्यासाठी उपाययोजना सल्लागारांकडून सुचवण्यात येतील. या प्रकल्पासाठी ८७७ कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे.

एमआरव्हीसी मास्टर प्लॅन तयार करणार

पावसाळ्यात मुंबईतील रेल्वे रूळ पाण्याखाली जाऊ नये, यासाठी मुंबई रेल्वे विकास कॉर्पोरेशन लिमिटेड (एमआरव्हीसी) ने महत्त्वाचे पाऊल उचलले आहे. एमआरव्हीसीने पूर निवारणासाठी कराव्या लागणाऱ्या उपाययोजना सुचवण्यासाठी अर्ज मागवले आहे. पश्चिम आणि मध्य रेल्वेमार्गावर पाणी साचण्याची समस्या दूर करण्यासाठी एमआरव्हीसीने व्यापक पूरनिवारण मास्टर प्लॅन तयार करणार आहे. त्यासाठी सल्लागार नेमण्याची प्रक्रिया सुरू केली आहे.

एमआरव्हीसी यासंदर्भात पात्र सल्लागार कंपन्यांकडून अर्ज मागविण्यात आले आहे. निवड झालेल्या कंपनीकडून वर्षभर अभ्यासानंतर पूरस्थिती टाळण्यासाठी उपाययोजना सुचविण्यात येतील. हा प्रकल्प एमयूटीपी- ३अ अंतर्गत राबविण्यात येणार आहे. या प्रकल्पासाठी ८७७ कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. यासाठी एशियन इन्फ्रास्ट्रक्चर इन्व्हेस्टमेंट बँक (एआयआयबी) मार्फत आर्थिक मदत मिळणार आहे.

का होतात रेल्वे मार्ग ठप्प

पावसाचे पाणी रेल्वे ट्रॅकखालील वाहिन्यांतून समुद्रात जाणे अपेक्षित आहे. मात्र, अपुर्ण ड्रेनेज, गाळ साचणे व अनियोजित शहरीकरणामुळे पाणी तुंबण्याचे प्रमाण वाढले आहे. यामुळे रेल्वेमार्ग ठप्प होतात. ही समस्या सुटावी यासाठी एमआरव्हीसीचा हा प्रयत्न महत्त्वपूर्ण ठरणार आहे, असा दावा अधिकाऱ्यांकडून करण्यात येत आहे. यंदा मे महिन्यात अवकाळी पाऊस झाला. मध्य रेल्वेने नालेसफाई केल्यानंतरही कुर्ला, सायन, मशीद बंदर येथे थोड्याशा पावसातही पाणी साचले होते. मशीद बंदर येथे सकाळच्या वेळी पाणी साचल्याने लोकल सेवेला ब्रेक लागला होता. त्यामुळे कामावर जाणाऱ्यांचे हाल झाले होते.

Follow Us
भाजपमध्ये आतल्याआतच मोठं घडतंय? बड्या नेत्याचं पद जाईल म्हणून...
भाजपमध्ये आतल्याआतच मोठं घडतंय? बड्या नेत्याचं पद जाईल म्हणून... उद्धव ठाकरेंनी सांगितली इनसाईड स्टोरी
इतिहास आहे, इकडचे खासदार काही वर्षांनी.. संजय जाधवांच्या मतदारसंघातील
इतिहास आहे, इकडचे खासदार काही वर्षांनी.. संजय जाधवांच्या मतदारसंघातील दौऱ्यापूर्वीच उद्धव ठाकरेंचे विधान
अजित पवारांच्या आठवणीत सुप्रिया सुळे झाल्या भावूक! शेअर केला तो खास फो
Supriya Sule | अजित पवारांच्या आठवणीत सुप्रिया सुळे झाल्या भावूक! शेअर केला तो खास फोटो
धक्कादायक! आठवड्याभरातच मुंबई लोकलमध्ये तिसरा चाकू हल्ला; माहिममध्ये..
धक्कादायक! आठवड्याभरातच मुंबई लोकलमध्ये तिसरा चाकू हल्ला; माहिममध्ये...
एक-एक टक्का देतो, आधी 40... शिंदेंच्या आमदाराचा व्हिडीओ व्हायरल; खळबळ
एक-एक टक्का देतो, आधी 40...  शिंदेंच्या आमदाराचा व्हिडीओ व्हायरल; एकच खळबळ
श्रीकांत शिंदेंसह ओमराजेंनाही मंत्रीपदाची लॉटरी? स्वतःच केला मोठा खुला
Omraje Nimbalkar | श्रीकांत शिंदेंसह ओमराजेंनाही मंत्रीपदाची लॉटरी? स्वतःच केला मोठा खुलासा, म्हणाले....
ओमराजे निंबाळकर विमानतळावर पोहोचण्यापूर्वीच भयंकर घडलं; थेट पोलीस
Omraje Nimbalakar | ओमराजे निंबाळकर विमानतळावर पोहोचण्यापूर्वीच भयंकर घडलं; थेट पोलीस... मोठा गोंधळ
देवेंद्रजी हुशार, कपटी मित्र...एकनाथ शिंदेंची ठाकरेंवर बोचरी टीका, नेम
देवेंद्रजी हुशार, कपटी मित्र...एकनाथ शिंदेंची ठाकरेंवर बोचरी टीका, नेमकं काय म्हणाले?
मोठी अपडेट! NEETनंतर आता टीईटी पेपरफुटीत भयंकर खुलासा; धाड टाकताच
मोठी अपडेट! NEETनंतर आता टीईटी पेपरफुटीत भयंकर खुलासा; धाड टाकताच पोलिसांना...
तर नोकरी सोडून राजकारणात या, विश्वास नांगरे पाटलांच्या त्या भाषणानंतर
तर नोकरी सोडून राजकारणात या, IPS विश्वास नांगरे पाटलांच्या त्या भाषणानंतर राज ठाकरेंचा थेट हल्लबोल!