AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

‘मुंबईत रेल्वे मार्गावर पाणी साचणार नाही…,’ रेल्वे कॉर्पोरेशनचे महत्वाचे पाऊल

मुंबई रेल्वे विकास कॉर्पोरेशन लिमिटेडने महत्वाचा निर्णय घेतला आहे. पावसाळ्यात मुंबईतील रेल्वे रूळ पाण्याखाली जाऊ नये, यासाठी अर्ज मागवले आहे. एमआरव्हीसीने पूर निवारणासाठी कराव्या लागणाऱ्या उपाययोजना सुचवण्यासाठी हे अर्ज मागवले आहे.

'मुंबईत रेल्वे मार्गावर पाणी साचणार नाही...,' रेल्वे कॉर्पोरेशनचे महत्वाचे पाऊल
मुंबई रेल्वे स्टेशन (फाईल फोटो)
Jitendra Zavar
Jitendra Zavar | Updated on: Jun 14, 2025 | 9:53 AM
Share

पावसाळ्यात मुंबईची तुंबई होत असल्याचे अनेकदा दिसून आले आहे. रेल्वे मार्गावर पाणी साचत असल्यामुळे मुंबईची लाईफ लाईन लोकल सेवाही ठप्प होते. त्यामुळे लाखो मुंबईकरांना अडचणीचा सामना करावा लागतो. मुंबईतील रेल्वे मार्गावर पाणी साचू नये, यासाठी आता महत्वाचे पाऊल उचलण्यात आले आहे. मुंबई रेल्वे विकास कॉर्पोरेशन लिमिटेडने मास्टर प्लॅन तयार करण्यासाठी सल्लागार नेमण्याचा निर्णय घेतला आहे. रेल्वे मार्गावरील पूरस्थिती टाळण्यासाठी उपाययोजना सल्लागारांकडून सुचवण्यात येतील. या प्रकल्पासाठी ८७७ कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे.

एमआरव्हीसी मास्टर प्लॅन तयार करणार

पावसाळ्यात मुंबईतील रेल्वे रूळ पाण्याखाली जाऊ नये, यासाठी मुंबई रेल्वे विकास कॉर्पोरेशन लिमिटेड (एमआरव्हीसी) ने महत्त्वाचे पाऊल उचलले आहे. एमआरव्हीसीने पूर निवारणासाठी कराव्या लागणाऱ्या उपाययोजना सुचवण्यासाठी अर्ज मागवले आहे. पश्चिम आणि मध्य रेल्वेमार्गावर पाणी साचण्याची समस्या दूर करण्यासाठी एमआरव्हीसीने व्यापक पूरनिवारण मास्टर प्लॅन तयार करणार आहे. त्यासाठी सल्लागार नेमण्याची प्रक्रिया सुरू केली आहे.

एमआरव्हीसी यासंदर्भात पात्र सल्लागार कंपन्यांकडून अर्ज मागविण्यात आले आहे. निवड झालेल्या कंपनीकडून वर्षभर अभ्यासानंतर पूरस्थिती टाळण्यासाठी उपाययोजना सुचविण्यात येतील. हा प्रकल्प एमयूटीपी- ३अ अंतर्गत राबविण्यात येणार आहे. या प्रकल्पासाठी ८७७ कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. यासाठी एशियन इन्फ्रास्ट्रक्चर इन्व्हेस्टमेंट बँक (एआयआयबी) मार्फत आर्थिक मदत मिळणार आहे.

का होतात रेल्वे मार्ग ठप्प

पावसाचे पाणी रेल्वे ट्रॅकखालील वाहिन्यांतून समुद्रात जाणे अपेक्षित आहे. मात्र, अपुर्ण ड्रेनेज, गाळ साचणे व अनियोजित शहरीकरणामुळे पाणी तुंबण्याचे प्रमाण वाढले आहे. यामुळे रेल्वेमार्ग ठप्प होतात. ही समस्या सुटावी यासाठी एमआरव्हीसीचा हा प्रयत्न महत्त्वपूर्ण ठरणार आहे, असा दावा अधिकाऱ्यांकडून करण्यात येत आहे. यंदा मे महिन्यात अवकाळी पाऊस झाला. मध्य रेल्वेने नालेसफाई केल्यानंतरही कुर्ला, सायन, मशीद बंदर येथे थोड्याशा पावसातही पाणी साचले होते. मशीद बंदर येथे सकाळच्या वेळी पाणी साचल्याने लोकल सेवेला ब्रेक लागला होता. त्यामुळे कामावर जाणाऱ्यांचे हाल झाले होते.

Follow Us
मांसाहारींना घर नाकारल्याने ब्रोकर भावेश कावरेवर टीकेची झड, मनसे...
ताडदेव गृहप्रकल्प वाद; मांसाहारींना घर नाकारल्याने ब्रोकर भावेश कावरेवर टीकेची झड, मनसे नेते थेट...
अमित शाह यांचा चर्चेचा प्रस्ताव, खरगे यांचा विलंबावर पलटवार
संसदीय वादंग: अमित शाह यांचा चर्चेचा प्रस्ताव, खरगे यांचा १९ दिवसांच्या विलंबावर पलटवार
मनोज जरांगेंचा मुख्यमंत्र्यांच्या वर्षा बंगल्यावर उपोषणाचा कडक इशारा
Manoj Jarange | मनोज जरांगेंचा मुख्यमंत्र्यांच्या वर्षा बंगल्यावर उपोषणाचा कडक इशारा; मुंबईत मराठ्यांना येण्याचे आवाहन
असीम सरोदे यांचे सर्वोच्च न्यायालयातील सुनावणीवर विश्लेषण
शिवसेना पक्ष आणि चिन्हाचा वाद अंतिम टप्प्यात. असीम सरोदे यांचे सर्वोच्च न्यायालयातील सुनावणीवर विश्लेषण
धनुष्यबाण गोठवून पक्ष ठाकरेंना देणार, सरोदे यांचा दावा
शिवसेना पक्षचिन्ह सुनावणी: धनुष्यबाण गोठवून पक्ष ठाकरेंना देणार, सरोदे यांचा दावा
मांसाहार करणाऱ्यांना घर नाही म्हणण्यावर टीकेची झोड
भावेश कावरेच्या वादग्रस्त जाहिरातीवरून राज्यात संताप: मांसाहार करणाऱ्यांना घर नाही म्हणण्यावर टीकेची झोड
तामिळनाडूच्या निर्णयावरून अमित ठाकरेंनी केला सरकारवर प्रहार
नीट परीक्षा आणि तामिळनाडूच्या निर्णयावरून अमित ठाकरेंनी केला सरकारवर प्रहार
दिल्लीच्या रस्त्यावर माकडं जशी उड्या मारतात... गांधींवर मस्केंची टीका
Naresh Maske | दिल्लीच्या रस्त्यावर माकडं जशी उड्या मारतात... राहुल गांधींवर नरेश मस्केंची बोचरी टीका!
देवेंद्र फडणवीस यांच्या मागणीनुसार मुंबईसाठी २३८ एसी लोकल मंजूर
मुंबईला मिळणार २३८ एसी लोकल; फडणवीसांनी मानले केंद्र सरकारचे आभार
मुंबईत डोमिनोजच्या तीन आउटलेटचे परवाने निलंबित
मुंबईत डॉमिनोजवर एफडीएची कारवाई: तीन आउटलेटचे परवाने निलंबित