AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

आघाडी कृषी कायद्यांना विरोध करते, मग महाराष्ट्रात त्याविरोधात विधेयक मंजूर का करत नाही? : सुधीर मुनगंटीवार

कृषी कायद्यांना विरोध करारं आघाडी सरकार महाराष्ट्रात त्याविरोधात विधेयक मंजूर का करत नाही? असा सवाल मुनगंटीवार यांनी विचारला आहे.

आघाडी कृषी कायद्यांना विरोध करते, मग महाराष्ट्रात त्याविरोधात विधेयक मंजूर का करत नाही? : सुधीर मुनगंटीवार
| Updated on: Dec 06, 2020 | 5:43 PM
Share

मुंबई : भाजपचे नेते सुधीर मुनगंटीवार यांनी राज्यातील आघाडी सरकारवर जोरदार टीका केली आहे. तसेच कृषी कायद्यांना विरोध करारं आघाडी सरकार महाराष्ट्रात त्याविरोधात विधेयक मंजूर का करत नाही? असा सवाल मुनगंटीवार यांनी विचारला आहे. महाआघाडीतील पक्षांमधील प्रेम पुतणा-मावशीचं आहे. त्यांची आघाडी 5 वर्षे नाही, तर 5000 वर्षे टिकू द्या, फक्त जनतेला जगू देत त्यांनी महाविकासआघाडीवर हल्ला चढवला (Sudhir Mungantiwar criticize MVA on Farmer Protest and Bharat Band0.

सुधीर मुनगंटीवार म्हणाले, “शेतकऱ्यांच्या कायद्याचा अर्थ भ्रमनिरास करण्यासाठी होतोय, ते चांगलं नाही. शेतकरी कायद्याचा अर्थ चुकीचा काढला जातोय. आधीच्या सरकारचं धोरण शेतकऱ्यांचे मरण होतं. शेतकऱ्यांची आर्थिक स्थिती सुधारावी हाच या कायद्याचा उद्देश आहे. या कायद्यात कोणताही मुद्दा पटत नसेल, तर चर्चा आणि संवाद करता येऊ शकतो. योग्य पद्धतीने कायदा वाचला, तर अर्थ समजेल. उणीव असेल तर पंतप्रधान मोदी यांची वेळ घेऊन भेटा आणि चर्चा करा.”

भाजप महाराष्ट्र सरकार पाडणार?

भाजप राज्यातील आघाडी सरकार पाडणार का? या प्रश्नावर बोलताना ते म्हणाले, “महाराष्ट्रातील महाविकासआघाडी सरकारला संताजी धनाजी स्वप्नातही दिसतो. त्यांचा त्यांच्या आमदारांवर विश्वास नाही का? तुम्ही 5 वर्षे नको, तर 5000 वर्ष टीका. फक्त महाराष्ट्राच्या जनतेला जगू द्या आणि टिकू द्या. तुमचं प्रेम पुतणा मावशीप्रमाणे विखारी आहे”.

“मोदी सरकारच्या कृषी कायद्यांना विरोध करता, मग महाराष्ट्रात त्याविरोधात विधेयक मंजूर का करत नाही? शेतकऱ्यांच्या जीवनात बदल करायचा असेल, तर मग राज्यात अध्यादेश का काढत नाही? हे नेते सत्ताप्रिय आहेत. तुमच्या कुटुंबातील कोणी मंत्री होणार नाही अशी शपथ घ्या. ते घराणेशाही चालवत आहेत,” असा घणाघातही मनुगंटीवार यांनी केला.

हेही वाचा :

भाजप बेसावध, ससा-कासवाच्या गोष्टीप्रमाणे पदवीधरमध्ये जिंकून येण्याचा आभास : मुनगंटीवार

‘मोठा भाऊ पाहून कुंभकर्णानेही आत्महत्या केली असती, मुनगंटीवारांचा मुख्यमंत्र्यांवर निशाणा

‘कोरोना व्हायरस ठाकरे सरकारला म्हणाला, नागपूरला याल तर त्रास देईन, मुंबईत तुमच्या वाटेला येणार नाही’, मुनगंटीवारांचा उपरोधिक टोला

Sudhir Mungantiwar criticize MVA on Farmer Protest and Bharat Band

'स्टाईल वापरुन काही होत नाही, कतृत्व...',आदित्य यांना महाजन यांचा टोला
'स्टाईल वापरुन काही होत नाही, कतृत्व...',आदित्य यांना महाजन यांचा टोला.
माजी मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांचा पणतू,पालिका निवडणूकीच्या रिंगणात
माजी मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांचा पणतू,पालिका निवडणूकीच्या रिंगणात.
मुंबईत आम्हाला 14-15 जागा मिळाल्या पाहिजेत, रामदास आठवले यांची मागणी
मुंबईत आम्हाला 14-15 जागा मिळाल्या पाहिजेत, रामदास आठवले यांची मागणी.
अशोक चव्हाण यांना भाजपा हिरवा करायचाय, प्रताप पाटील चिखलीकर यांचा आरोप
अशोक चव्हाण यांना भाजपा हिरवा करायचाय, प्रताप पाटील चिखलीकर यांचा आरोप.
मुंबईचा महापौर उत्तर भारतीय होणार, सुनील शुक्ला यांचा दावा
मुंबईचा महापौर उत्तर भारतीय होणार, सुनील शुक्ला यांचा दावा.
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आली तर काँग्रेस स्वबळावर लढेल - वडेट्टीवार
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आली तर काँग्रेस स्वबळावर लढेल - वडेट्टीवार.
काँग्रेसमध्ये आलो तरी शरद पवार कायम श्रद्धास्थानी - प्रशांत जगताप
काँग्रेसमध्ये आलो तरी शरद पवार कायम श्रद्धास्थानी - प्रशांत जगताप.
जळगाव महापालिकेत प्रतिनिधीत्व द्या, बारा बुलतेदार महासंघाची मागणी
जळगाव महापालिकेत प्रतिनिधीत्व द्या, बारा बुलतेदार महासंघाची मागणी.
याक्षणी आम्ही मुंबई पालिकेत 115 जागा जिंकत आहोत, संजय राऊत यांचा दावा
याक्षणी आम्ही मुंबई पालिकेत 115 जागा जिंकत आहोत, संजय राऊत यांचा दावा.
पुण्यात दोन्ही राष्ट्रवादीची युती होणार की नाही? काकडे काय म्हणाले
पुण्यात दोन्ही राष्ट्रवादीची युती होणार की नाही? काकडे काय म्हणाले.