मुंबई: सकल हिंदू समाजाचा काल मुंबईत मोर्चा निघाला. दादरच्या शिवाजी पार्कवरून या मोर्चाची सुरुवात झाली आणि परळच्या कामगार मैदानावर या मोर्चाची सांगता झाली. शिवसेना भवनासमोरूनच हा मोर्चा निघाला. लव्ह जिहाद रोखण्यासाठी कायदा करावा आणि धर्मांतर विरोधी कायद्याची अंमलबजावणी करावी या मागणीसाठी हा मोर्चा निघाला होता. या मोर्चावरून दैनिक ‘सामना’तून भाजपवर निशाणा साधण्यात आला आहे. केंद्रात आणि राज्यात सर्व शक्तीमान हिंदुत्वादी सरकार असताना हिंदुत्व खतऱ्यात येतेच कसे? असा सवाल करतानाच शिवसेना भवन हेच सकल हिंदूंसाठी आशेचे स्थान आहे, असा टोला दैनिक ‘सामना’तून भाजपला लगावला आहे.