AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

नाही तर शंभर आचारी, रस्सा भिकारी असं घडेल; दैनिक ‘सामना’तून कुणाला इशारा

केसीआर यांना राष्ट्रीय राजकारणाचे वेध लागले आहेत. त्यामुळेच ते देशातील प्रमुख विरोधी पक्षांच्या नेत्यांना भेटत आहेत. त्यामुळे त्यांनी त्यांची ही आघाडी भाजपविरोधी आहे की काँग्रेसविरोधी हे आधी स्पष्ट करायला हवं, असं अग्रलेखातून म्हटलं आहे.

नाही तर शंभर आचारी, रस्सा भिकारी असं घडेल; दैनिक 'सामना'तून कुणाला इशारा
k c chandrasekhar raoImage Credit source: tv9 marathi
| Updated on: Jan 20, 2023 | 9:56 AM
Share

मुंबई: राहुल गांधी यांच्या भारत जोडो यात्रेमुळे भाजप डचमळला आहे. त्यामुळे आता विरोधी पक्षाने एकदिलाने एकत्र येण्याची हीच वेळ आहे. पश्चिम बंगाल, महाराष्ट्र, कर्नाटक, तेलंगणा, बिहार, केरळ आणि राजस्थान आदी राज्यांनी मनावर घेतलं तर इतर राज्यांमध्येही जागरण होईल. त्यामुळे डोके ठिकाणावर ठेवून जमिनीवरील सत्य समजून घेऊन पावलं टाकावी लागतील, असं सांगतानाच तसे घडल्यावरच येत्या 2024मध्ये बदल होईल. नाही तर शंभर आचारी आणि रस्सा भिकारी असे घडेल, असा इशारा दैनिक ‘सामना’च्या अग्रलेखातून देण्यात आला आहे. लोकसभा निवडणुकीसाठी अवघे 400 दिवस उरले आहेत. मोदींनी भाजप कार्यकर्त्यांना कामाला लागण्याच्या सूचना दिल्या आहेत. देशातील विरोधी पक्षांनाही तोच इशारा आहे, असंही अग्रलेखातून स्पष्ट करण्यात आलं आहे.

दैनिक ‘सामना’च्या अग्रलेखातून विरोधी पक्षांची चांगलीच कानउघाडणी करण्यात आली आहे. तेलंगणाचे मुख्यमंत्री के. सी. चंद्रशेखर राव यांनी विरोधी पक्षांचे वेगळे संमेलन भरवले होते. त्याला विरोधी पक्षातील काही प्रमुख पक्षाचे नेते उपस्थित राहिले होते.

त्यावरून ‘सामना’तून आगपाखड करण्यात आली आहे. केसीआर यांना राष्ट्रीय राजकारणाचे वेध लागले आहेत. त्यामुळेच ते देशातील प्रमुख विरोधी पक्षांच्या नेत्यांना भेटत आहेत. त्यामुळे त्यांनी त्यांची ही आघाडी भाजपविरोधी आहे की काँग्रेसविरोधी हे आधी स्पष्ट करायला हवं, असं अग्रलेखातून म्हटलं आहे.

आपचा फायदा भाजपलाच

काँग्रेसला दुबळे करून भाजपशी कसे लढता येणार? असा सवाल करतानाच गुजरातमध्ये आपने निवडणूक लढवली. त्याचा फायदा भाजपलाच झाला. भाजपला गुजरातमध्ये क्रांतिकारी विजय मिळाला. त्याचं श्रेय आपलाच द्यावं लागेल, असंही सामनातून सांगण्यात आलं आहे.

काँग्रेसच 100 खासदार निवडून आणेल

राष्ट्रीय राजकारण करणारे सर्वच राजकीय पक्ष प्रादेशिक आहेत. त्यांना काँग्रेसला दूर ठेवून राष्ट्रीय राजकारण करायचे आहे. त्यांना काँग्रेसची एवढी भीती का वाटते? शंभरच्या पुढे खासदारांचा आकडा नेण्याची क्षमता आजही काँग्रेसमध्येच आहे. काँग्रेसने खासदारांचा आकडा शंभराच्या पुढे नेल्यास दिल्लीतील सध्याचा डोलारा सहज कोसळेल, असा दावाही करण्यात आला आहे.

भाजपच्या विरोधकांना भीती का?

राहुल गांधी यांच्या भारत जोडोला लोकांचा प्रचंड पाठिंबा मिळत आहे. त्याची भीती भाजपला वाटायला हवी होती. भाजपच्या विरोधकांना ही भीती का वाटत आहे? काँग्रेसशी आमचे वैचारिक मतभेद असू शकतात पण भाजपशी आमचे कधी वैचारिक मतभेद नव्हते. तरीही भाजपने देशात असे काय दिवे लावले आहेत? असा सवालही करण्यात आला आहे.

तेच भाजपचा मार्ग मोकळा करताहेत

देशात अराजक निर्माण झालं आहे. शेतकरी अस्वस्थ आहे. त्याचा फायदा विरोधक एकजुटीने घेत नसतील तर कसे चालेल? काँग्रेसला वगळून किंवा काँग्रेसला लांब ठेवून विरोधी आघाडी करणे शक्य नाही. जे अशा विचाराने मेळावे आयोजित करून राष्ट्रीय राजकारणाचा एल्गार करत आहेत, तेच एकप्रकारे भाजपला 2024चा मार्ग मोकळा करत आहेत, असा दावाही अग्रलेखातून करण्यात आला आहे.

Follow Us
नाशिक आयटी कंपनीतील निदा खानचं काय होणार? जामीन अर्जावर सुनावणी पूर्ण
नाशिक आयटी कंपनीतील निदा खानचं काय होणार? जामीन अर्जावर सुनावणी पूर्ण.
थरकाप उडवणारी घटना! इतका भयंकर अपघात की तिघांचा जागीच मृत्यू अन्...
थरकाप उडवणारी घटना! इतका भयंकर अपघात की तिघांचा जागीच मृत्यू अन्....
मुंबईत धक्कादायक घटना; विषबाधेमुळे एकाच कुटुंबातील चौघांचा मृत्यू
मुंबईत धक्कादायक घटना; विषबाधेमुळे एकाच कुटुंबातील चौघांचा मृत्यू.
रायगडच्या नगरपंचायतीत मोठा ट्विस्ट, अपात्र 7 नगरसेवक पुन्हा पात्र
रायगडच्या नगरपंचायतीत मोठा ट्विस्ट, अपात्र 7 नगरसेवक पुन्हा पात्र.
परिवहन मंत्री प्रताप सरनाईकांविरोधात त्या जमिनवादावरुन पोलिसात तक्रार
परिवहन मंत्री प्रताप सरनाईकांविरोधात त्या जमिनवादावरुन पोलिसात तक्रार.
पारा थेट 46 अंशावर, कडाक्याच्या उन्हामुळे आरोग्यावर काय परिणाम होतोय?
पारा थेट 46 अंशावर, कडाक्याच्या उन्हामुळे आरोग्यावर काय परिणाम होतोय?.
...तरच विधानपरिषद निवडणूक बिनविरोध होईल, महाविकास आघाडीत घडामोडींना...
...तरच विधानपरिषद निवडणूक बिनविरोध होईल, महाविकास आघाडीत घडामोडींना....
मराठी सक्तीचा निर्णय लांबणीवर; प्रताप सरनाईकांनी केली मोठी घोषणा.....
मराठी सक्तीचा निर्णय लांबणीवर; प्रताप सरनाईकांनी केली मोठी घोषणा......
राघव चड्ढांचा 'आप'ला दे धक्का, पण भाजपामध्ये जाण्याआधी वाद काय झाला?
राघव चड्ढांचा 'आप'ला दे धक्का, पण भाजपामध्ये जाण्याआधी वाद काय झाला?.
मोठी बातमी ! मराठी सक्तीच्या मुदतवाढीवर सस्पेन्स कायम; परिवहन मंत्री..
मोठी बातमी ! मराठी सक्तीच्या मुदतवाढीवर सस्पेन्स कायम; परिवहन मंत्री...