AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

‘एकनाथ शिंदे आनंद दिघे यांचे सच्चे चेले असतील, तर…’, ठाकरे गटाच्या महिला नेत्याचं मुख्यमंत्र्यांना थेट चॅलेंज

ठाकरे गटाच्या एका महिला नेत्याने राहुल शेवाळे यांच्यावर निशाणा साधत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना थेट चॅलेंज दिलंय.

'एकनाथ शिंदे आनंद दिघे यांचे सच्चे चेले असतील, तर...', ठाकरे गटाच्या महिला नेत्याचं मुख्यमंत्र्यांना थेट चॅलेंज
Image Credit source: tv9 marathi
| Updated on: Dec 26, 2022 | 11:48 PM
Share

गिरीश गायकवाड, नागपूर : खासदार राहुल शेवाळे यांच्याविरोधात ठाकरे गटाच्या नेत्या मनिषा कायंदे चांगल्यात आक्रमक झाल्या. राहुल शेवाळे यांचं जुम्मा चुम्मा काय होतं? असा खोचक प्रश्न मनिषा कायंदे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना विचारला आहे. राहुल शेवाळे यांनी मनिषा कायंदे यांच्यावरही गंभीर आरोप केल्याची माहिती समोर आली होती. शेवाळे यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहित मनिषा कायंदे यांच्याबद्दल तक्रार केली होती. कायंदे यांच्याकडून एका माजी आमदाराला गुंडांच्या मदतीने ब्लॅकमेलिंग केली जात असल्याचा आरोप शेवाळे यांनी गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पाठवलेल्या पत्रात केला होता. त्यानंतर आता मनिषा कायंदे यांनी राहुल शेवाळे यांच्यावर निशाणा साधत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनाही आव्हान दिलं.

“‘राहुल शेवाळे यांचं काय करायचं ही एकनाथ शिंदेंची जबाबदारी आहे. एकनाथ शिंदे आनंद दिघे यांचे सख्खे चेले असतील तर ते कारवाई करतील”, असं आव्हान मनिषा कायंदे यांनी मुख्यमंत्र्यांना दिलं.

“राहुल शेवाळे यांनी माझ्यावर केलेले आरोप हे मुळात प्रकरणच नाहीय. त्यांच्या विरोधात जी महिला आवाज करतेय, चार-पाच महिन्यांपासून हा विषय चालूय. तुम्ही आज सांगताय की तिचं पाकिस्तान कनेक्शन आहे. मग तुमचं जुम्मा चुम्मा दे दे हे काय चालू होतं? ते जरा लोकांना सांगाना. हे शब्द बोलणंही मला चुकीचं वाटतंय. हे खासदार आहेत. यांना कळत नाहीय का?”, असा सवाल मनिषा कायंदे यांनी केला.

“हे जेवढं चिखलात उड्या मारत आहेत तितकं ते चिखलात खोल जाणार आहेत”, अशी टीका मनिषा कायंदे यांनी राहुल शेवाळे यांच्यावर केली.

“ज्यांनी कोणी खंडणीचे आरोप केले आहेत त्यांना समोर आणा. महिलांना बदनाम करणं हेच त्यांचं हिंदुत्व आहे का?”, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला.

यावेळी त्यांनी विधीमंडळाच्या हिवाळी अधिवेशनावरुनही सत्ताधाऱ्यांवर टीका केली. “खरंतर सभागृहाचा वेळ जनतेचे प्रश्न सोडवण्यासाठी खर्ची व्हायला पाहिजे. राज्यात आज अंगणवाडी सेविकांचा ज्वलंत प्रश्न आहे. प्राध्यापकांचा प्रश्न आहे, बेरोजगार तरुणांचे प्रश्न आहेत. पण दुर्देवाने सत्ताधारी अधिवेशन बंद करण्याचं काम करत आहेत”, अशीदेखील टीका त्यांवी यावेळी केली.

सटोगे तो बचोगे वरना बटोगे तो पिटोगे , शिवसेना भवनासमोर बॅनरबाजी
सटोगे तो बचोगे वरना बटोगे तो पिटोगे , शिवसेना भवनासमोर बॅनरबाजी.
अमोल कोल्हे-अजित पवारांची भेट, राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण
अमोल कोल्हे-अजित पवारांची भेट, राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण.
मुंबईत हवेचा दर्जा खालावला, AQI थेट 195 वर
मुंबईत हवेचा दर्जा खालावला, AQI थेट 195 वर.
अजित पवार बारामती हॉस्टेलमधून अचानक रवाना, दादा नेमके गेले कुठे ?
अजित पवार बारामती हॉस्टेलमधून अचानक रवाना, दादा नेमके गेले कुठे ?.
मरेपर्यंत काँग्रेसमध्ये...प्रशांत जगताप काँग्रेसमध्ये, पंजा हाती घेतला
मरेपर्यंत काँग्रेसमध्ये...प्रशांत जगताप काँग्रेसमध्ये, पंजा हाती घेतला.
नाद अन् दहशत या शब्दांवरून महायुतीच्या दोन मंत्र्यांमध्ये जुंपली
नाद अन् दहशत या शब्दांवरून महायुतीच्या दोन मंत्र्यांमध्ये जुंपली.
महापालिका निवडणुकीत घराणेशाहीचं वाढतं प्रस्थ, कुटुंबासाठी लॉबिंग
महापालिका निवडणुकीत घराणेशाहीचं वाढतं प्रस्थ, कुटुंबासाठी लॉबिंग.
बीएमसी निवडणुकीसाठी अजित पवार यांच्या राष्ट्रवादीसमोर मोठी अट
बीएमसी निवडणुकीसाठी अजित पवार यांच्या राष्ट्रवादीसमोर मोठी अट.
लाल किल्ल्या स्फोट प्रकरणात महाराष्ट्र कनेक्शन उघड, आरोपीनं...
लाल किल्ल्या स्फोट प्रकरणात महाराष्ट्र कनेक्शन उघड, आरोपीनं....
प्रशांत जगताप काँग्रेसमध्ये येताच म्हणाले, माझी लढाई भाजप विरोधात....
प्रशांत जगताप काँग्रेसमध्ये येताच म्हणाले, माझी लढाई भाजप विरोधात.....