AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

खरं की खोटं हे निवडणूक आयोग ठरवेल, संजय शिरसाट यांचं म्हणणं काय?

युती झाल्यापासून काही लोकं दंड थोपटून बसले आहेत. त्यांना चपराक देणं आवश्यक आहे. त्यासाठी दोन पाऊलं कोण पुढं नि कोण मागं हा आमच्यासाठी महत्त्वाचा प्रश्न नसल्याचंही त्यांनी म्हंटलं.

खरं की खोटं हे निवडणूक आयोग ठरवेल, संजय शिरसाट यांचं म्हणणं काय?
संजय शिरसाट
| Edited By: | Updated on: Jan 11, 2023 | 9:56 PM
Share

मुंबई : २३ जानेवारीला उद्धव ठाकरे यांची पक्षप्रमुख पदाची शेवटची तारीख आहे. वेळ देण्याची मागणी त्यांनी निवडणूक आयोगाकडं केली आहे. प्रातिनिधीक बैठका घेण्याचीही विनंती त्यांनी न्यायालयाला केली आहे. यावर बोलताना शिंदे गटाचे नेते संजय शिरसाट (Sanjay Shirsat) म्हणाले, मुळात अशी मागणी करणं हे चुकीचं आहे. पक्ष कोणाचा खरा यावर तुम्ही आपली बाजू कोर्टात मांडता. त्यामुळं निवडणूक आयोगाकडं ही हेरींग चालली ती होऊ दिली पाहिजे होती.

खंडपीठाचा निकाल लागेपर्यंत निवडणूक आय़ोगानं हेरींग घेऊ नये, असं तुमचं मत होतं. यातून तुमच्या दुटप्पीपणा दिसून येतो. असा टोला संजय शिरसाट यांनी उद्धव ठाकरे यांना लगावला. तुम्हाला भीती कशाची वाटत आहे.

तुम्ही आम्हाला चुकीचं ठरविता. तसा वाद घालता. मग, भीती कशाची वाटली. कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी आम्हाला वेळ द्यावा, अशी मागणी करायला पाहिजे होती. पण, कातडी बचावोचं धोरण सुरू आहे. त्या माध्यमातून त्यांनी केलेली ही एक वेगळी खेळी आहे.

संजय शिरसाट म्हणाले, ते काय बोलतात याला महत्व नाही. आता आपली बाजू ही निवडणूक आयोगाच्या कोर्टात गेली आहे. ठाकरे गटाचे साडेतीन हजार बाँड पकडले गेलेत. त्यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे. ते खरे की खोटे हे निवडणूक आयोग ठरवेल.

निकालापर्यंत वाट पाहिली पाहिजे

कोणता पक्ष खरा. कोणता पक्ष खोटा. कोणाला काय नाव मिळालं पाहिजे, हे निवडणूक आय़ोगाला ठरवू द्या. जो निकाल लागेल, त्या निकालाला तुम्ही माना. निकाल लागेपर्यंत उगाच बडबड करण्याला काही अर्थ नाही.

आपण चुकीचं काम केलं. शिंदे गटाला नाव आणि चिन्ह मिळणार, हे ठाकरे गटाच्या लक्षात आलं आहे. आपण कमीजोर आहोत, असं माहीत असते, अशावेळी अशी वक्तव्य केली जात असल्याचं संजय शिरसाट म्हणाले.

चर्चेतून ठरलं

विधानपरिषदेच्या पाचही जागा भाजपला मिळाल्याची चर्चा आहे. यावर बोलताना संजय शिरसाट यांनी सांगितलं की, काल भाजपचे नेते आणि शिंदे गटाचे नेते यांच्यात चर्चा झाली.

युती झाल्यापासून काही लोकं दंड थोपटून बसले आहेत. त्यांना चपराक देणं आवश्यक आहे. त्यासाठी दोन पाऊलं कोण पुढं नि कोण मागं हा आमच्यासाठी महत्त्वाचा प्रश्न नसल्याचंही त्यांनी म्हंटलं.

Follow Us
सुनेत्रा पवारांचा रायगडकरांना शब्द; अजित दादांची उणीव भरून निघणार नाही
सुनेत्रा पवारांचा रायगडकरांना शब्द; अजित दादांची उणीव भरून निघणार नाही.
ट्रॅव्हल जिहाद विरोधात संग्राम जगताप आक्रमक
ट्रॅव्हल जिहाद विरोधात संग्राम जगताप आक्रमक.
राहुल गांधींची मोदी सरकारवर टीका, फडणवीसांचे सडेतोड उत्तर, म्हणाले....
राहुल गांधींची मोदी सरकारवर टीका, फडणवीसांचे सडेतोड उत्तर, म्हणाले.....
निदा खान ही इम्तियाज जलील यांची नातलग, अशा अनेक निदा महाराष्ट्रभर...
निदा खान ही इम्तियाज जलील यांची नातलग, अशा अनेक निदा महाराष्ट्रभर....
जनतेला नियम आणि स्वतःला सूट?; मोदींच्या बचत आवाहनावर दमानिया आक्रमक
जनतेला नियम आणि स्वतःला सूट?; मोदींच्या बचत आवाहनावर दमानिया आक्रमक.
मोठी बातमी! आणखी एक MIM नेता कचाट्यात, गोवंश तस्करी प्रकरणी 3 लाख...
मोठी बातमी! आणखी एक MIM नेता कचाट्यात, गोवंश तस्करी प्रकरणी 3 लाख....
पंतप्रधान मोदींच्या आवाहनानंतर राहुल गांधी आक्रमक; थेट म्हणाले. हे...
पंतप्रधान मोदींच्या आवाहनानंतर राहुल गांधी आक्रमक; थेट म्हणाले. हे....
मुंबईत उष्णतेचा कहर; सलग तिसऱ्या दिवशी तापमान 35 अंशांच्या पार
मुंबईत उष्णतेचा कहर; सलग तिसऱ्या दिवशी तापमान 35 अंशांच्या पार.
पेट्रोल-डिझेल टंचाईची शक्यता? पंतप्रधान मोदींच्या आवाहानाबाबत नागरिक..
पेट्रोल-डिझेल टंचाईची शक्यता? पंतप्रधान मोदींच्या आवाहानाबाबत नागरिक...
पुन्हा वर्क फ्रॉम होमची गरज; मोदींचं मोठं आवाहन, म्हणाले.....
पुन्हा वर्क फ्रॉम होमची गरज; मोदींचं मोठं आवाहन, म्हणाले......