AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

वाचाळांमध्ये कृतीतून बोलणारा माणूस म्हणजे उद्धव ठाकरे : उर्मिला मातोंडकर

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे (Balasaheb Thackeray birth anniversary) यांच्या जयंतीनिमित्त आज शिवाजीपार्कवर रक्तदान शिबीराचे आयोजन करण्यात आले.

वाचाळांमध्ये कृतीतून बोलणारा माणूस म्हणजे उद्धव ठाकरे : उर्मिला मातोंडकर
उर्मिला मातोंडकर
| Updated on: Jan 23, 2021 | 12:23 PM
Share

मुंबई : दिवंगत शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे (Balasaheb Thackeray birth anniversary) यांच्या जयंतीनिमित्त आज शिवाजीपार्कवर रक्तदान शिबीराचे आयोजन करण्यात आले. या शिबिरात खासदार संजय राऊत (Sanjay raut) आणि शिवसेना नेत्या उर्मिला मातोंडकर (Urmila Matondkar) यांनी हजेरी लावली. यावेळी उर्मिला मातोंडकर यांनी माध्यमांशी बोलताना विविध विषयावर भाष्य केलं. बाळासाहेबांमुळे बॉलिवूड सुरक्षित होतं, असं उर्मिला म्हणाल्या.

“आज मी शिवसेनेचा हिस्सा आहे. मात्र बाळासाहेबांबाबत नेहमीच आदर होता. बाळासाहेब ‘मातोश्री’त होते म्हणून चित्रपटसृष्टीत सुरक्षित होती. आमच्याकरिता बाळासाहेब आणि त्यांचे विचार अजूनही तसेच आहेत”, असं उर्मिला मातोंडकर म्हणाल्या.

उद्धव ठाकरे कृतीततून बोलतात

सध्याच्या वाचाळ नेत्यांमध्ये मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे कमी बोलून कृतीवर विश्वास ठेवणारे व्यक्ती आहेत. बोले तैसा चालेल त्याची वंदावी पाऊले. लॉकडाऊनदरम्यान मंदिरे सुरु करण्यासंदर्भात मागणी होत होती. मात्र त्यावेळी धर्म म्हणजे केवळ मंदिर नाही, अशाप्रकारे परिस्थिती उद्धव ठाकरेंनी हाताळली, असं उर्मिलाने नमूद केलं.

VIDEO : बाळासाहेबांमुळे बॉलिवूड सुरक्षित : उर्मिला मातोंडकर

संजय राऊत काय म्हणाले?

दरम्यान, यावेळी शिवसेना खासदार संजय राऊत यांनीही आपली प्रतिक्रिया व्यक्त केली. “लोकांना संकटाच्यावेळी नेत्यांची आठवण येते. मात्र मला आनंदाच्या वेळी बाळासाहेबांची आठवण येते. कारण आमच्या जीवनात त्यांच्यामुळेच आनंदाचे दिवस आले आहेत. बाळासाहेबांचे विचार जिवंत राहतीलच. पुतळे-स्मारक हे फक्त निमित्त आहे. शिवसेना आणि शिवसैनिक हे बाळासाहेबांचे विचार आहे”, असं संजय राऊत म्हणाले.

बाळासाहेब ठाकरे हे शतकातून एकदाच निर्माण होतात

संजय राऊत यांनी पत्रकारांशी बोलताना शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे हे शतकातून एकदाच निर्माण होतात, असं वक्तव्य केले. बाळासाहेबांनी राज्याच्या आणि देशाच्या राजकारणाला वेगळं वळण दिलं, त्यांनी हिंदुत्वाची लाट निर्माण केली. बाळासाहेब ठाकरेंचे स्मरण ठेवावं लागेल, असं संजय राऊत म्हणाले.

(The man who speaks through action is Uddhav Thackeray said Urmila Matondkar on Balasaheb Thackeray birth anniversary )

संबंधित बातम्या 

‘खचलेल्या मराठी माणसाला बाळासाहेबांनी लढण्याचं बळ दिलं’, शिवसेनाप्रमुखांच्या जयंतीदिवशी संजय राऊतांची भावना 

बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो.
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं.
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!.
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.