AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

लोकल अपघातातील बळींना ‘शोध’णे अवघड बनले

काही वर्षांपूर्वी लोहमार्ग पोलीसांनी लाेकल अपघातातील बळींचा धांडोळा घेण्यासाठी 'शोध' नावाचे सॉफ्टवेअर तयार केले होते. ते आता बंद पडले आहे.

लोकल अपघातातील बळींना 'शोध'णे अवघड बनले
lifelineImage Credit source: lifeline
| Edited By: Chetan Patil | Updated on: Dec 03, 2022 | 2:57 PM
Share

अतुल कांबळे,TV9 मराठी, मुंबई : मुंबई उपनगरीय लोकल प्रवासात दररोज दहाहून अधिक प्रवाशांचा बळी जात असतो. अशावेळी जर एखाद्या प्रवाशाचा लोकलमधून पडून मृत्यू झाल्यास त्याचे पाकिट गर्दुल्ल्यांकडून हिसकावले जाताच त्याची ओळख संपते. त्यामुळे पिडीत प्रवाशाच्या वारसदारांना त्यांच्या प्रिय व्यक्तीचा शोध घेणे अवघड बनले आहे.

मुंबईतील तिनही उपनगरीय मार्गावर लोकल अपघातात दरवर्षी तीन हजार प्रवाशांचा मृत्यू होत असतो. कोरोनाकाळात लोकल वाहतूकीवर निर्बंध आल्याने ही संख्या गेली दोन वर्षे कमी झाली होती. आता  लोकल सेवा पूर्वपदावर आल्याने दुर्दैवाने पुन्हा एकदा राेजचे लाेकल बळी काेराेना काळापूर्वीची सरासरी संख्या गाठण्याची शक्यता आहे.

लोहमार्ग पोलीस आयुक्त रवींद्र सिंगल यांच्या कारर्कीदीत हे ‘शोध’ नावाचे वेबपोर्टल तयार करण्यात आले होते. यात हरविलेल्या व्यक्तींचा शोध घेण्यासाठी थेट शवागृहात न जाता जीआरपी पोलीसांकडे जाऊन नाव आणि इतर माहिती देताच माहीती मिळण्यास मदत मिळत होती.

लोकल अपघातातील वाढत्या मृत्यूंच्या संख्येसंदर्भात सामाजिक कार्यकर्ते समीर झव्हेरी यांनी मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. या याचिकेवर मुख्य न्यायमूर्ती स्वतंत्रकुमार आणि डॉ.डी.वाय.चंद्रचूड यांच्या खंडपीठाने रेल्वे आणि राज्य सरकारला महाराष्ट्राच्या सर्व रेल्वे स्थानकांवर आपात्कालिन वैद्यकीय कक्ष उभारण्याचे आदेश देण्यासह इतरही आदेश दिले होते. डॉ.डी.वाय.चंद्रचूड आता सर्वाेच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश आहेत.

मुंबई उच्च न्यायालयाने रेल्वे प्रशासनाला याबाबत आदेश देताना स्वत:ची वेबसाईट तयार करीत तिच्यावर अपघातातील बळीत व्यक्तीचे नाव,अपघाताचा प्रकार आणि ठिकाण टाकावे असे म्हटले होते. तसेच या वेबसाईटवर ज्यावेळी फोटो टाकला जाईल, त्यावेळी त्या संबंधीत व्यक्तीचे नाव रेल्वेने सेंट्रल अनाऊन्समेंट सिस्टीमद्वारे जाहीर करावे असे म्हटले होते, परंतू रेल्वेने अशी तजवीज केली नसल्याचे समीर झव्हेरी यांनी टीव्ही नाइन मराठी वेबसाईटशी बोलताना सांगितले.

Follow Us
बनावट नोटांचा कारखाना उद्ध्वस्त, पाच आरोपींना अटक
नाशिकमध्ये बनावट नोटांचा कारखाना उद्ध्वस्त, पाच आरोपींना अटक
माझ्या कार्यक्रमानंतर भाजपकडून स्टेजचं शुद्धीकरण - खर्गे
Mallikarjun Kharge | माझ्या कार्यक्रमानंतर भाजपकडून स्टेजचं शुद्धीकरण - खर्गे
राजकीय समीकरणे आणि १३ ऑगस्टच्या प्रमुख बातम्या
महाराष्ट्र आणि राष्ट्रीय घडामोडी: राजकीय समीकरणे आणि १३ ऑगस्टच्या प्रमुख बातम्या
शिवसेना कुणाची? आज ठाकरे गटाचा युक्तिवाद संपणार; शिंदे गट....
शिवसेना कुणाची? आज ठाकरे गटाचा युक्तिवाद संपणार; शिंदे गट सुप्रीम कोर्टात बाजू मांडणार!
धनुष्यबाण गोठणार? शिवसेना ठाकरेंना परत मिळणार? सरोदेंचा खळबळजनक दावा!
धनुष्यबाण गोठणार? शिवसेना ठाकरेंना परत मिळणार? असीम सरोदेंचा खळबळजनक दावा!
टेकऑफ घेणार इतक्यात... उदय सामंतांच्या हेलिकॉप्टरसोबत नेमकं काय झालं?
मोठी घडामोड! टेकऑफ घेणार इतक्यात... उदय सामंतांच्या हेलिकॉप्टरसोबत नेमकं काय झालं?
महाराष्ट्र आधी राजकारण नंतर! NEETवरून अमित ठाकरेंनी सरकारला थेट सुनवलं
महाराष्ट्र आधी… राजकारण नंतर! NEETवरून अमित ठाकरेंनी सरकारला थेट सुनवलं
शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी! सातबाऱ्यावर नाव नाही?; सरकारने घेतला निर्णय
शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी! सातबाऱ्यावर नाव नाही?; सरकारने घेतला मोठा निर्णय, व्हिडिओ बघाच
शिवसेना 5 हजार कोटींना विकली! संजय राऊतांचा खळबळजनक दावा
Sanjay Raut | शिवसेना 5 हजार कोटींना विकली! संजय राऊतांचा खळबळजनक दावा; नेमकं काय म्हणाले?
मुंबईच्या 24 वर्षीय बायकरचा दुर्दैवी अंत; नेमकं काय घडलं?
बस्तर सफरीत काळाचा घाला! मुंबईच्या 24 वर्षीय बायकरचा दुर्दैवी अंत; नेमकं काय घडलं?