AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

पक्षात काही लोकं असे आहते, त्यांच्यामुळे पक्षाची हानी होतेय – गोपाळ शेट्टी

भाजपचे नेते आणि माजी खासदार गोपाळ शेट्टी यांना उमेदवारी न मिळाल्याने ते नाराज आहेत. आधी लोकसभा आणि नंतर विधानसभेत देखील त्यांचं तिकीट कापल्याने त्यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. सकाळी त्यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. त्यानंतर ते उमेदवारी मागे घेतील अशी शक्यता होती. पण तसे संकेत अजून मिळालेले नाहीत.

पक्षात काही लोकं असे आहते, त्यांच्यामुळे पक्षाची हानी होतेय - गोपाळ शेट्टी
| Updated on: Nov 02, 2024 | 7:30 PM
Share

भाजपचे नेते गोपाळ शेट्टी हे नाराज आहेत. बोरिवली मतदारसंघातून त्यांना उमेदवारी न मिळाल्याने त्यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. त्यामुळे भाजपची डोकेदुखी वाढवलीये. बोरिवली विधानसभेतून भाजपने संजय उपाध्याय यांना उमेदवारी दिलीये. त्यामुळे आधी लोकसभा आणि नंतर विधानसभेत उमेदवारी न दिल्याने शेट्टी नाराज आहेत. आज गोपाळ शेट्टी यांनी सागर बंगल्यावर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. यावेळी ते म्हणाले की, देवेंद्र फडणवीस यांना शुभेच्छा देण्यासाठी गेलो होतो. भाजपचा प्रत्येक नेता म्हणेल की आम्ही पटवून देऊ. चुका होतात, त्या सुधारून पुढे जायला हवे. देवेंद्र फडणवीसजी उपमुख्यमंत्री आहेत पण माझ्यासाठी ते मुख्यमंत्री आहेत. ते माझ्या घरी आले तर हे मला आवडले नाही म्हणून मी त्यांच्या घरी गेलो.

ED कारवाईवर काय म्हणाले

गोपाळ शेट्टी म्हणाले की, मी यापूर्वीच सर्व बड्या नेत्यांना पत्र लिहून माझ्या सर्व मालमत्तेची चौकशी करून कारवाई करावी, अशी विनंती केली आहे. मी देवेंद्र फडणवीस यांनाही पत्र लिहिले आहे, चौकशी करा, माझी सर्व मालमत्ता जप्त करा आणि मग कारवाई करा.

पुढे ते म्हणाले की, पीयूषजी यांनी या जागेवर निवडणूक लढवली ही उत्तर मुंबईसाठी अभिमानाची बाब आहे. 9 तारखेला अमित शहा येत आहेत. त्यांचे स्वागत करण्याचे आवाहन मी सर्वांना करेन. अमित शाह बोरिवलीत येत आहेत ही बोरिवलीकरांसाठी अभिमानाची गोष्ट आहे.

अमित शाहांचे स्वागत करणार

काश्मीरमधून कलम 370 हटवल्यानंतर ते येत आहेत, मी सर्व कार्यकर्त्यांना आणि लोकांना त्यांचे स्वागत करण्याचे आवाहन करतो. कुणाला शिव्या देऊन मी महान होत नाही, काम करून महान बनतो. आज नवीन वर्ष आहे, मी आज सर्व प्रश्नांची उत्तरे देऊ शकणार नाही. माझ्या हृदयातून आणि मनातून कमळ काढू शकत नाही. काही नेत्यांविरुद्ध मात्र लढत आहे. असं ही ते म्हणाले

गोपाळ शेट्टी म्हणाले की, पक्षाने काढलं, तरी मी पक्ष सोडणार नाही. मी आजही ठाम आहे. मी जे काम करतोय ते पक्षहितासाठी आहे. अन्य पक्षात जाणार नाही. पक्षात काही लोकं असे आहते, त्यांच्यामुळे पक्षाची हानी होतेय. माझी लढाई त्यांच्याविरोधात आहे. पक्ष हितासाठी जे करायचं ते करणार. माझं पाऊल पुढे पडलं, तर ते पक्ष हितासाठी असेल.”

बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो.
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं.
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!.
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.