AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

ते अजूनही धक्क्यातून सावरले नाहीत…फडणवीस, पवार, शिंदे रोज एकमेकांना चिमटे काढतात, EVM चे नाव न घेता, संजय राऊतांनी काढले सोलपटून

Sanjay Raut on Mahayuti : राज ठाकरे यांनी वरळीत पक्षाच्या मेळाव्यात मत गायब झाल्याचा मुद्दा आणल्यानंतर पुन्हा EVM ने राजकारणात एंट्री केली आहे. खासदार संजय राऊत यांनी हाच धागा पकडून महायुती सरकारवर तोंडसुख घेतले आहे.

ते अजूनही धक्क्यातून सावरले नाहीत...फडणवीस, पवार, शिंदे रोज एकमेकांना चिमटे काढतात, EVM चे नाव न घेता, संजय राऊतांनी काढले सोलपटून
संजय राऊतांचा तिरकस बाण
| Updated on: Feb 01, 2025 | 10:45 AM
Share

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी लोकसभेला भाजपला पाठिंबा दिला तर विधानसभेत एकला चलो रेची भूमिका घेतली. त्यानंतर काल परवा वरळीत पक्षाच्या मेळाव्यात त्यांनी अनेक उमेदवारांची मत गायब झाल्याचा मुद्दा समोर आणला. पूर्वी ज्या ठिकाणी हजर मत मिळायची तिथे एक सुद्धा मत मिळाल्याचा सूर त्यांनी आळवला. नेमका तोच धागा पकडत खासदार संजय राऊत यांनी महायुतीवर तोंडसुख घेतले. सकाळी माध्यमांशी बोलताना त्यांनी ईव्हीएमचा उल्लेख न करता महायुतीच्या महाविजयावर पुन्हा आक्षेप घेतला. कालच सामन्यातून ईव्हीएमला कुंभमेळ्यात शाही स्नान घालून पापमुक्त करण्याचा तिरकस बाण सोडण्यात आला होता.

ते धक्क्यातून सावरले नाहीत

महायुतीचा विजय हा ईव्हीएममधून झाल्याचा आरोप महाविकास आघाडीकडून सातत्याने होत आला आहे. संजय राऊत यांनी राज ठाकरे यांच्या भाषणाचा धागा पकडून महायुतीच्या महाविजयावर तोंडसुख घेतले. या विजयामुळे महायुतीचे नेते अजूनही धक्क्यातून सावरले नसल्याचे ते म्हणाले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, एकनाथ शिंदे हे अजूनही या धक्क्यातून सावरले नाहीत. ते तिघे अजूनही एकमेकांना रोज चिमटे काढतात, आपण खरोखरच जिंकलो आहोत का? मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री झालो आहोत का, याची खातरजमा करतात असा चिमटा राऊतांनी काढला.

राज ठाकरे यांनी फडणवीसांना भेटायला हवे

जर राज ठाकरे यांच्या मनात मतामधील गडबडीविषयी संशय असेल तर त्यांनी फडणवीस यांचा राजीनामा मागितला पाहिजे, त्यांच्यासोबत चहा कसले पिताय असा सवाल राऊतांनी केला. राज ठाकरेंनी मनातील प्रश्न घेऊन फडणवीस यांना भेटले पाहिजे. या दोघांमधील संवाद लाईव्ह दाखवायला हवा, असा चिमटा सुद्धा राऊतांनी काढला.

लक्ष्मी केवळ गौतम अदानीवर प्रसन्न

बजेटपूर्वीच खासदार संजय राऊत यांनी मोदी सरकारवर टीका केली. हा अर्थसंकल्प, गोरगरिबांसाठी नाही, तर गौतम अदानींसाठी असल्याचा आरोप त्यांनी केला. लक्ष्मी केवळ गौतम अदानींवर प्रसन्न असल्याचा टोला त्यांनी यावेळी हाणला. त्यांनी मोदी सरकार आणि त्यांच्या धोरणावर टीक केली.

Follow Us
बापरे! NEET पेपरफुटीत हे काय घडलं? मॅडमने भलतंच केलं, ॲडमिशन करून...
बापरे! NEET पेपरफुटीत हे काय घडलं? मॅडमने भलतंच केलं, ॲडमिशन करून....
सरकार संवादात अपयशी मराठा आंदोलनावर पवारांनी उपस्थित केले गंभीर प्रश्न
सरकार संवादात अपयशी मराठा आंदोलनावर पवारांनी उपस्थित केले गंभीर प्रश्न.
तटकरे-पटेलांबाबत राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाची पत्रकार परिषद, स्पष्ट...
तटकरे-पटेलांबाबत राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाची पत्रकार परिषद, स्पष्ट....
NEET घोटाळ्यात राज्यातील आणखी एक बायोलॉजी प्राध्यापक अटकेत
NEET घोटाळ्यात राज्यातील आणखी एक बायोलॉजी प्राध्यापक अटकेत.
NCPच्या दिल्ली कार्यालयात तटकरे-पटेल यांच्या नावाच्या पाट्या, मात्र...
NCPच्या दिल्ली कार्यालयात तटकरे-पटेल यांच्या नावाच्या पाट्या, मात्र....
जे कोणाचेच नाहीत, ते कुणाचे राहणार?पवारांचा बड्या नेत्यांवर थेट निशाणा
जे कोणाचेच नाहीत, ते कुणाचे राहणार?पवारांचा बड्या नेत्यांवर थेट निशाणा.
भोंदू खरातला लागली लॉट्री, तुरुंगात असातानाच मिळणार 3 कोटी, नेमकं...
भोंदू खरातला लागली लॉट्री, तुरुंगात असातानाच मिळणार 3 कोटी, नेमकं....
मोठी बातमी! मराठा आरक्षणासाठी पुन्हा आमरण उपोषण...
मोठी बातमी! मराठा आरक्षणासाठी पुन्हा आमरण उपोषण....
मुख्यमंत्रीच सर्वेसर्वा तर मग जबाबदार कोण? जरांगेंचा फडणवीसांवर.......
मुख्यमंत्रीच सर्वेसर्वा तर मग जबाबदार कोण? जरांगेंचा फडणवीसांवर........
होय मी झुरळ आहे आणि मी झुरळच राहणार; अंजली दमानिया असं का म्हणाल्या?
होय मी झुरळ आहे आणि मी झुरळच राहणार; अंजली दमानिया असं का म्हणाल्या?.