AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

जे बॅनर लावत नव्हेत ते या विचारधारेवर येताहेत, दीपक केसरकर यांचा टोला

विरोधक विरोध करणारचं आम्ही असतो तर हे झालं नसतं, असं म्हणतात. पण, अनेक गोष्टी केंद्राच्या नियंत्रणाखाली असतात.

जे बॅनर लावत नव्हेत ते या विचारधारेवर येताहेत, दीपक केसरकर यांचा टोला
दीपक केसरकर
| Updated on: Dec 05, 2022 | 4:43 PM
Share

मुंबई – जे कधी महापरिनिर्वाण दिनाला बॅनर लावत नव्हते. त्यांना मदतीची गरज आहे. हिंदुत्व सोडलं म्हणून वंचितही गरज आहे, अशी टीका शिंदे गटाचे प्रवक्ते दीपक केसरकर यांनी केली. आधी काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस सोबत युती केली. आता वंचितशी सलगी करण्याचा प्रयत्न सुरू आहे. परंतु, ठाकरे यांच्या शिवसेनेबरोबर जायचं की, नाही याचा निर्णय वंचित बहुजन विकास आघाडीचे प्रकाश आंबेडकर यांना घ्यायचा आहे. तो निर्णय़ ते योग्य पद्धतीनं घेतली, असं मला वाटते. कारण त्यांना बाबासाहेब यांचा वारस आहे. बाबासाहेबांचा वारस चालवत असताना मतं कुठं मिळतील, यापेक्षा बाबासाहेबांचा वारसा जपनं हे अधिक महत्त्वाचं असतं.

आम्ही वारसा जपण्याच्या दृष्टिकोनातून बघतो. उद्या महापरिनिर्वाण दिन आहे. बाबासाहेबांचा ऐतिहासिक ठेवा जतन केला गेला पाहिजे. पंचायतची इमारत असो की, आंतरराष्ट्रीय सोशल जस्टीस मुव्हमेंट कशी पुढं नेता येईल, याचा प्रयत्न केला गेला पाहिजे.

विचाराचा ठेवा महाराष्ट्राच्या पलीकडचा आहे. तो ठेवा जपला गेला पाहिजे, असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना वाटते, असं दीपक केसरकर म्हणाले. तो ठेवा जपला गेला पाहिजे. त्या भूमिकेबरोबर आम्ही आहोत, असंही ते म्हणाले.

विरोधक विरोध करणारचं आम्ही असतो तर हे झालं नसतं, असं म्हणतात. पण, अनेक गोष्टी केंद्राच्या नियंत्रणाखाली असतात. राज्याच्या नियंत्रणात काय आहे, याचा विचार करून स्टेटमेंट केली गेली पाहिजे. काहीही झाला की, ते सरकारवर टाकायचं हा रडीचा खेळ असतो, असा आरोपही दीपक केसरकर यांनी केला.

महाराष्ट्र आणि कर्नाटकचा वाद हा आजचा नाही. गेल्या ५० वर्षांपासून हा वाद सुरू आहे. बाळासाहेब म्हणाले होते की, सीमाभागातील नागरिकांचं हित जोपासू, हे तुम्ही अडीच वर्षे जोपासू शकले नाही, अशी टीकाही केसरकर यांनी केली.

Follow Us
तामिळनाडूत मोठी घडामोड, CM विजय माजी मुख्यमंत्र्यांच्या भेटीला, नेमकं
तामिळनाडूत मोठी घडामोड, CM विजय माजी मुख्यमंत्र्यांच्या भेटीला, नेमकं.
तब्बल 66 लाख लाडक्या बहिणींचे 1500 रुपये बंद, सरकारचा मोठा निर्णय...
तब्बल 66 लाख लाडक्या बहिणींचे 1500 रुपये बंद, सरकारचा मोठा निर्णय....
इन्स्टाग्रामवर जुळलं प्रेम, बांगलादेशी तरुणीनं थेट... जळगावात नेमकं
इन्स्टाग्रामवर जुळलं प्रेम, बांगलादेशी तरुणीनं थेट... जळगावात नेमकं.
जा सिमरन जा… या आयकॉनिक सीनचं लोकेशन पर्यटनस्थळ करा; अनुपम खेर भावूक..
जा सिमरन जा… या आयकॉनिक सीनचं लोकेशन पर्यटनस्थळ करा; अनुपम खेर भावूक...
नाशिक TCS धर्मांतरण प्रकरणी महत्त्वाची सुनावणी, जामिन अर्जाबाबत...
नाशिक TCS धर्मांतरण प्रकरणी महत्त्वाची सुनावणी, जामिन अर्जाबाबत....
उष्णतेने नंदुरबार होरपळलं; तापमानाचा पारा 45.5 अंशावर
उष्णतेने नंदुरबार होरपळलं; तापमानाचा पारा 45.5 अंशावर.
सुनेत्रा पवारांचा रायगडकरांना शब्द; अजित दादांची उणीव भरून निघणार नाही
सुनेत्रा पवारांचा रायगडकरांना शब्द; अजित दादांची उणीव भरून निघणार नाही.
ट्रॅव्हल जिहाद विरोधात संग्राम जगताप आक्रमक
ट्रॅव्हल जिहाद विरोधात संग्राम जगताप आक्रमक.
राहुल गांधींची मोदी सरकारवर टीका, फडणवीसांचे सडेतोड उत्तर, म्हणाले....
राहुल गांधींची मोदी सरकारवर टीका, फडणवीसांचे सडेतोड उत्तर, म्हणाले.....
निदा खान ही इम्तियाज जलील यांची नातलग, अशा अनेक निदा महाराष्ट्रभर...
निदा खान ही इम्तियाज जलील यांची नातलग, अशा अनेक निदा महाराष्ट्रभर....