AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

अदानींना झेपत नसेल तर…; धारावी पुनर्विकास प्रकल्पावरून उद्धव ठाकरे आक्रमक

Uddhav Thackeray Dharavi Redevelopment Project : उद्धव ठाकरे यांनी आज मुंबईत पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांनी धारावी पुनर्वसनाच्या मुद्द्यावर भाष्य केलं. तसंच सरकारवरही त्यांनी निशाणा साधला आहे. 'लाडका मित्र योजना' असं म्हणत त्यांनी टोला लगावला आहे. वाचा सविस्तर...

अदानींना झेपत नसेल तर...; धारावी पुनर्विकास प्रकल्पावरून उद्धव ठाकरे आक्रमक
उद्धव ठाकरेImage Credit source: ANI
आयेशा सय्यद
आयेशा सय्यद | Updated on: Jul 20, 2024 | 2:07 PM
Share

धारावी पुनर्विकास प्रकल्पाबाबत उद्धव ठाकरे यांनी मुंबईत आज पत्रकार परिषद घेतली. यावेळी उद्धव ठाकरे यांनी शिंदे सरकारवर जोरदार निशाणा साधला आहे. गौतम अदानींना झेपत नसेल तर हे टेंडर रद्द करा आणि दुसऱ्या योग्य व्यक्तीला हे टेंडर द्या, अशी आमची जाहीर मागणी आहे. त्यासाठी पुन्हा ग्बोबल टेंडर मागवा. पण हा मुंबई उध्वस्त करण्याचा डाव, धारावीकरांना उध्वस्त करण्याचा डाव आम्ही यशस्वी होऊ देणार नाही, असं उद्धव ठाकरे म्हणालेत.

तर टेंडर रद्द करा- ठाकरे

आमचं सरकार आल्यावर अदानींना दिलेलं टेंडर रद्द करण्याचा मुद्दा आहेच. पण आताच या या सरकारने अदानींचं टेंडर का रद्द करू नये? हा आमचा प्रश्न आहे. धारावीकरांवर अन्याय करून मुंबईची अदानी सिटी आम्ही होऊ देणार नाही. कोणत्याही परिस्थितीत आम्ही हे होऊ देणार नाही, असं उद्धव ठाकरे म्हणाले.

“धारावीचा विकास म्हणजे अदानींचा विकास नव्हे”

धारावीची विकास म्हणजे नेमकं काय? याची तुम्ही व्याख्या आधी सांगा… धारावीचा विकास म्हणजे अदानींचा विकास नव्हे… धारावीतील लोकांचा विकास व्हायला पाहिजे. तिथल्या लोकांना घरं मिळाली पाहिजेत. जर हे त्या विकासकाला जमत नसेल, तर त्याने थेट सांगावं, की आम्हाला झेपत नाही. नवीन टेंडर काढा. पण त्यासाठी मुंबईची विल्हेवाट लावू नका, असं उद्धव ठाकरे म्हणालेत. बेसुमार टेडीआर काढून अदानी यांना देण्याचा सरकारचा डाव आहे. तो डाव आम्ही यशस्वी होऊ देणार नाही. मुंबईतील सर्वच्या सर्व टीडीआर आम्ही अदानी यांना घेऊ देणार नाही. उद्या ते मुंबईचं नाव बदलून अदानी सिटी असं करतील… पण त्यांचा हा डाव आम्ही यशस्वी होऊ देणार नाही, असं उद्धव ठाकरेंनी ठणकावून सांगितलं आहे.

धारावीकरांना त्यांच्या हक्काचं घर मिळालंच पाहिजे. 500 फुटांचं घर मिळालं पाहिजे, अशी शिवसेनेची आग्रही भूमिका कायम आहे. एक बेसुमार काढून अडानींना द्यायचा सरकारचा डाव आहे, तो आम्ही उधळून लावणार आहोत. तो डाव कधीच यशस्वी होऊ देणार नाही, असंही उद्धव ठाकरे म्हणालेत.

Follow Us
संतोष पंडित यांना अखेर जामीन मंजूर, चंद्रकांत पाटील व्हिडिओ प्रकरणात..
संतोष पंडित यांना अखेर जामीन मंजूर, चंद्रकांत पाटील व्हिडिओ प्रकरणात दिलासा
गणेशोत्सवात आंदोलन करणं... चंद्रशेखर बावनकुळे यांचे जरांगे पाटलांना...
गणेशोत्सवात आंदोलन करणं... चंद्रशेखर बावनकुळे यांचे मनोज जरांगे पाटील यांना आवाहन
आमच्या वहिनी आहेत ना’ या अभियानांतर्गत राष्ट्रवादीचा मास्टर प्लॅन...
आमच्या वहिनी आहेत ना’ या अभियानांतर्गत राष्ट्रवादीचा मास्टर प्लॅन; रणनीतीकार प्रशांत किशोर यांच्या नेतृत्त्वात...
शिवसेना कुणाची हे तर... आजच सुनावणी पार पडली अन् शिंदे गटातील महिला...
शिवसेना कुणाची हे तर... आजच सुनावणी पार पडली अन् शिंदे गटातील महिला नेत्याचं मोठं विधान
दिशा सालियान प्रकरणात आदित्य ठाकरेंनी मांडली भूमिका, स्वतः ट्वीट...
दिशा सालियान प्रकरणात आदित्य ठाकरेंनी मांडली भूमिका, स्वतः ट्वीटद्वारे केला खुलासा!
माझा मुंबईत जाऊनच जीव निघालाा तर... जरांगे पाटलांची प्रतिक्रिया...
माझा मुंबईत जाऊनच जीव निघालाा तर...  आंदोलनाविषयी मनोज जरांगे पाटलांची मोठी प्रतिक्रिया!
त्यांच्यांतील लोकंच म्हणातात, जरांगे आंदोलनस्थळी... छगन भुजबळ नेमकं...
त्यांच्यांतील लोकंच म्हणातात, जरांगे आंदोलनस्थळी... छगन भुजबळ नेमकं काय म्हणाले?
बीड पाटोदा रस्त्यावर मराठा आंदोलकांचा रास्ता रोको; चलो मुंबईचा नारा...
बीड पाटोदा रस्त्यावर मराठा आंदोलकांचा रास्ता रोको; चलो मुंबईचा नारा...
मनोज जरांगे पाटलांची प्रकृती खालावली, डॉक्टरांनी दिली महत्त्वाची...
मनोज जरांगे पाटलांची प्रकृती खालावली, डॉक्टरांनी दिली महत्त्वाची माहिती
बिमारी का बहाना है, तुम्हे मुंबई... गुणरत्न सदावर्तेंनची जरांगेंवर...
बिमारी का बहाना है, तुम्हे मुंबई... गुणरत्न सदावर्तेंनची मनोज जरांगेंवर अजब कविता