AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

उल्हासनगरच्या उल्हासनदीचा रंगच बदलला, नदीचा रंग गढूळ करणारे हे कोण?

उल्हासनगरच्या उल्हासनदीचा रंगच बदलला आहे. नदीचा रंग गढूळ करणारे हे कोण? असा प्रश्न आता निर्माण झाला आहे. उल्हासनदीचं पाणी अतिशय गढूळ दिसतंय.

उल्हासनगरच्या उल्हासनदीचा रंगच बदलला, नदीचा रंग गढूळ करणारे हे कोण?
| Edited By: Govinda Hatwar | Updated on: Feb 17, 2023 | 4:09 PM
Share

उल्हासनगर : उल्हासनगर शहरातून (Ulhasnagar) वाहणाऱ्या वालधुनी नदीत आज दुपारच्या सुमारास कुणीतरी रासायनिक सांडपाणी सोडलं. त्यामुळे नदीचा रंग लाल झाला आहे. या प्रदूषित लाल पाण्याला (polluted water ) रसायनाचा उग्र दर्प येत आहे. त्यामुळे नागरिकही हैराण झाले आहेत. उल्हासनगरच्या स्टेशन परिसर, काजल पेट्रोल पंप, शांतीनगर परिसरात नदीचं पाणी लाल झाल्याचं पाहायला मिळतंय. वालधुनी नदीत अशा प्रकारे वारंवार रासायनिक सांडपाणी सोडलं जातात. नदीत प्रदूषण करणाऱ्यांचा शोध घेऊन त्यांच्यावर कारवाई करण्याची मागणी आता केली जातेय.

प्रदूषित पाण्याचा उग्र दर्पाने नागरिक हैराण उल्हासनगरातून वाहणारी वालधुनी नदी प्रदूषणामुळे लाल झाल्याचं निदर्शनास आलं आहे. या नदीत रासायनिक सांडपाणी सोडण्यात आलं आहे. त्याच्या उग्र दर्पामुळे नागरिक हैराण झाले आहेत.

उल्हास नदीचा रंगच बदलला

उल्हासनगरच्या उल्हास नदीचा रंगच बदलला आहे. नदीचा रंग गढूळ करणारे हे कोण? असा प्रश्न आता निर्माण झाला आहे. उल्हासनदीचं पाणी अतिशय गढूळ दिसतंय. हे पाणी गढूळ करणारे कोण याचा शोध घेणे आवश्यक आहे. नदीचे पाणी गढूळ झाले तर आजूबाजूच्या परिसरात जाणाऱ्या पाण्यावर त्याचा परिणाम होतो. या गढूळ पाण्यामुळं अनेक आजार बळावण्याची शक्यता असते.

नदीचे पाणी गढूळ कुणी केले?

नदीच्या बाजूला काही कंपन्या आहेत. या कंपन्यांमधील रासायनिक सांडपाणी या नदीत सोडले जाते. त्यामुळं या नदीचे पाणी गढूळ होते. हे पाणी गढूळ का झालं. याला जबाबदार कोण आहेत, याची चौकशी होणे आवश्यक आहे. दोषींवर प्रशासनाने कारवाई करावी, अशी मागणी केली जात आहे.

या परिसरातील पाणी लाल

उल्हासनगरच्या स्टेशन परिसर, काजल पेट्रोल पंप, शांतीनगर परिसरात नदीचं पाणी लाल झालंय. याचा अर्थ यापूर्वी कुणीतीही पाण्यात रासायनिक सांडपाणी टाकले असल्याची शक्यता आहे. नदीच्या पाण्याचा रंग बदलल्याने आजूबाजूचे नागरिक हैराण झाले आहेत. नदीचा रंग गढूळ करण्याऱ्यांवर कारवाईची मागणी केली जात आहे.

Follow Us
Jalna Triple S City! मुख्यमंत्री फडणवीसांचा मोठा प्लॅन....
Jalna Triple S City! मुख्यमंत्री फडणवीसांचा मोठा प्लॅन; रेशीम उद्योगाला मिळणार नवी झेप
राष्ट्रवादी शरद पवारांचीच!; सुप्रिया सुळेंचं मोठं विधान
Supriya Sule | राष्ट्रवादी शरद पवारांचीच!; सुप्रिया सुळेंचं मोठं विधान, नेमकं काय म्हणाल्या...
2027 च्या जनगणनेत जात, ओळख आणि कोविड लस संबंधित माहितीचा समावेश
2027 च्या जनगणनेत जात, ओळख आणि कोविड लस संबंधित माहितीचा समावेश
अमराठी रिक्षा-टॅक्सी चालकांना मुदतवाढ नाही; १५ ऑगस्ट डेडलाईन
प्रताप सरनाईक: अमराठी रिक्षा-टॅक्सी चालकांना मुदतवाढ नाही, १५ ऑगस्ट अंतिम तारीख
धीरज परदेशी हत्या प्रकरणात पोलिसांकडून दिशाभूल केल्याचा जगतापांचा आरोप
धीरज परदेशी हत्या प्रकरण: तपासात पोलिसांकडून दिशाभूल केल्याचा संग्राम जगतापांचा आरोप
पुण्यातील भोंदू बाबाचा व्हिडिओ व्हायरल: शिष्य पाय धुऊन पाणी पितात
उमेश तागुंदेचा वादग्रस्त व्हिडिओ: शिष्यांकडून पाय धुऊन पाणी पिण्याचा धक्कादायक प्रकार.
बाळासाहेबांची शिवसेना ही ठाकरेंचीच; सुप्रिया सुळे यांचं मोठं वक्तव्य
Supriya Sule | बाळासाहेबांची शिवसेना ही ठाकरेंचीच; सुप्रिया सुळे यांचं मोठं वक्तव्य
राज ठाकरेंनी पदाधिकाऱ्यांना जन-झीशी संपर्क साधण्याचे दिले निर्देश
राज ठाकरे यांचे पदाधिकाऱ्यांना जन-झीशी संपर्क वाढवण्याचे निर्देश, पुण्यातील बैठकीत स्पष्टीकरण
पुण्यात भोंदूबाबाचा धक्कादायक प्रकार! दैवी शक्तीच्या नावाखाली...
Pune | पुण्यात भोंदूबाबाचा धक्कादायक प्रकार! दैवी शक्तीच्या नावाखाली अल्पवयीन मुलींचं शोषण; आरोपी फरार
चाकण एमआयडीसीतून २० उद्योगांच्या स्थलांतरावर शरद पवारांचा सरकारला सवाल
चाकण एमआयडीसीतून २० उद्योगांच्या स्थलांतरावर शरद पवारांचा सरकारला सवाल, रोजगार टिकवण्यासाठी उपाययोजनांची मागणी