AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

रोड नंबर 5 वर नेमकं काय घडलं?, मॉर्निंग वॉकवेळी हल्ला कसा झाला?; संदीप देशपांडे यांनी सांगितला घटनाक्रम

संजय राऊतांचा मेंटल बॅलन्स गेला आहे. मी त्यांना पत्र लिहून काळजी व्यक्त केली आहे. मेंटल बॅलन्स गेलेल्या माणसाला आपली कुणी तरी सुपारी दिल्याचं वाटतं. सतत कोण तरी हल्ला करेल असं वाटत असतं.

रोड नंबर 5 वर नेमकं काय घडलं?, मॉर्निंग वॉकवेळी हल्ला कसा झाला?; संदीप देशपांडे यांनी सांगितला घटनाक्रम
sandeep deshpandeImage Credit source: tv9 marathi
| Edited By: | Updated on: Mar 04, 2023 | 12:58 PM
Share

मुंबई : मनसेचे नेते संदीप देशपांडे यांच्यावर काल दादरच्या शिवाजी पार्कात जीवघेणा हल्ला झाला. या हल्ल्यातून संदीप देशपांडे थोडक्यात बचावले. या हल्ल्यामुळे राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे. संदीप देशपांडे यांच्यावर हल्ला झाला कसा? हल्लेखोर आले कुठून? ते हल्लेखोर कोण होते? यावर आता चर्चा रंगल्या आहेत. या चर्चा सुरू असतानाच संदीप देशपांडे यांनी स्वत: पत्रकार परिषद घेऊन त्यांच्यावर हल्ला कसा झाला याची माहिती दिली आहे. काल नेमकं काय घडलं याची माहितीच त्यांनी मीडियासमोर दिली आहे.

मी नेहमीप्रमाणे वॉकला गेलो होतो. रोड नंबर 5 येथे गेटवरून जात असताना पाठीमागून कुणीतरी माझ्यावर स्टम्पने हल्ला केला. मला वाटलं चेंडू लागला. पाठीमागे वळून पाहिलं तेव्हा एकाजणाने माझ्या डोक्यावर मारण्याचा प्रयत्न केला. तो वार मी झेलला. दुसऱ्याने माझ्या पायावर मारलं. त्यामुळे मी खाली पडलो. त्यांनी मारहाण सुरू केली. तेव्हा लोक धावत आले. त्यांनी लोकांना दम दिला. पण लोक जेव्हा त्यांच्या अंगावर धावून गेले तेव्हा ते चार पाच लोक पळून गेले, अशी माहिती संदीप देशपांडे यांनी दिली.

त्यांना संरक्षण द्या

या हल्ल्याचं भांडूप कनेक्शन समोर आलं आहे. पोलिसांचा तपास योग्य रितीने चालला आहे. तो पूर्ण होईपर्यंत मी त्यावर बोलणार नाही. एक महत्त्वाची गोष्ट सांगतो. मुख्यमंत्र्यांचा फोन आला होता. त्यांनी माझ्या प्रकृतीची विचारपूस केली. त्यांनी काळजीपोटी माझ्या संरक्षणासाठी दोन पोलीस पाठवले. माझी सरकारला विनंती आहे. आम्ही कुणाला भीक घालत नाही. हल्ल्याला घाबरत नाही. त्यामुळे आम्हाला संरक्षण नको. सरकारने आमचं संरक्षण काढून घ्यावं. आम्हाला संरक्षणाची गरज नाही. ज्यांनी हल्ला केला त्यांना संरक्षण द्यावं. कुणी हल्ला केला हे आम्हाला माहीत आहे, असा सूचक इशाराही त्यांनी दिला.

राऊतांचा मेंटल बॅलन्स गेला

यावेळी त्यांनी खासदार संजय राऊत यांच्यावरही टीका केली. संजय राऊतांचा मेंटल बॅलन्स गेला आहे. मी त्यांना पत्र लिहून काळजी व्यक्त केली आहे. मेंटल बॅलन्स गेलेल्या माणसाला आपली कुणी तरी सुपारी दिल्याचं वाटतं. सतत कोण तरी हल्ला करेल असं वाटत असतं. मग फ्रस्टेशनमध्ये ते शिव्या घालण्याचं काम करतात. आज ते निवडणूक आयुक्तांना शिव्या घालत आहेत. उद्या सर्वोच्च न्यायालयाचा निकाल विरोधात गेला तर ते न्यायाधीशांनाही शिव्या घालतील. उद्धव ठाकरे मोठे डॉक्टर आहेत. ते जगाला सल्ला देतात. त्यांनी राऊतांवर इलाज केला पाहिजे. माणूस फ्रस्टेड झाला तर अशांना रोग होतात, अशी खोचक टीकाही त्यांनी केली.

Follow Us
परीक्षा रद्द, स्वप्नं उद्ध्वस्त; 3 विद्यार्थ्यांनी उचललं टोकाचं पाऊल
परीक्षा रद्द, स्वप्नं उद्ध्वस्त; 3 विद्यार्थ्यांनी उचललं टोकाचं पाऊल.
मिसिंग लिंकवर मृत्यूचा थरार; बसची वाहनांना जोरदार धडक आणि क्षणार्धात..
मिसिंग लिंकवर मृत्यूचा थरार; बसची वाहनांना जोरदार धडक आणि क्षणार्धात...
राष्ट्रवादीमधील बड्या नेत्याकडून पवारांकडे पार्थ पवार यांची तक्रार
राष्ट्रवादीमधील बड्या नेत्याकडून पवारांकडे पार्थ पवार यांची तक्रार.
पडद्यामागे नेमकं काय घडतंय? राष्ट्र्वादी (SP) च्या पुण्यातील बैठकीबाबत
पडद्यामागे नेमकं काय घडतंय? राष्ट्र्वादी (SP) च्या पुण्यातील बैठकीबाबत.
राष्ट्रवादीत मोठं काहीतरी घडणार? निवडणूक आयोगाला दिलेल्या या पत्रात...
राष्ट्रवादीत मोठं काहीतरी घडणार? निवडणूक आयोगाला दिलेल्या या पत्रात....
ही मशीद नाही मंदिरच! 800 वर्षांपासून सुरु असलेल्या वादावर, उच्च...
ही मशीद नाही मंदिरच! 800 वर्षांपासून सुरु असलेल्या वादावर, उच्च....
शेतकरी मोर्चादरम्यान मोठा गोंधळ, राजू शेट्टी, महादेव जानकरांसह........
शेतकरी मोर्चादरम्यान मोठा गोंधळ, राजू शेट्टी, महादेव जानकरांसह.........
सरकारच्या नव्या निर्णयाने राज्यात खळबळ; सदावर्तेंचा जोरदार विरोध......
सरकारच्या नव्या निर्णयाने राज्यात खळबळ; सदावर्तेंचा जोरदार विरोध.......
मान्सूनबाबत मोठी अपडेट! अंदमानात 16 मेच्या आसपास तर, कोकणात पावसाचं...
मान्सूनबाबत मोठी अपडेट! अंदमानात 16 मेच्या आसपास तर, कोकणात पावसाचं....
कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी गुड न्यूज, मुख्यमंत्र्यांनी मंचावरून केली
कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी गुड न्यूज, मुख्यमंत्र्यांनी मंचावरून केली.