रोड नंबर 5 वर नेमकं काय घडलं?, मॉर्निंग वॉकवेळी हल्ला कसा झाला?; संदीप देशपांडे यांनी सांगितला घटनाक्रम

संजय राऊतांचा मेंटल बॅलन्स गेला आहे. मी त्यांना पत्र लिहून काळजी व्यक्त केली आहे. मेंटल बॅलन्स गेलेल्या माणसाला आपली कुणी तरी सुपारी दिल्याचं वाटतं. सतत कोण तरी हल्ला करेल असं वाटत असतं.

रोड नंबर 5 वर नेमकं काय घडलं?, मॉर्निंग वॉकवेळी हल्ला कसा झाला?; संदीप देशपांडे यांनी सांगितला घटनाक्रम
sandeep deshpandeImage Credit source: tv9 marathi
Follow us
| Updated on: Mar 04, 2023 | 12:58 PM

मुंबई : मनसेचे नेते संदीप देशपांडे यांच्यावर काल दादरच्या शिवाजी पार्कात जीवघेणा हल्ला झाला. या हल्ल्यातून संदीप देशपांडे थोडक्यात बचावले. या हल्ल्यामुळे राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे. संदीप देशपांडे यांच्यावर हल्ला झाला कसा? हल्लेखोर आले कुठून? ते हल्लेखोर कोण होते? यावर आता चर्चा रंगल्या आहेत. या चर्चा सुरू असतानाच संदीप देशपांडे यांनी स्वत: पत्रकार परिषद घेऊन त्यांच्यावर हल्ला कसा झाला याची माहिती दिली आहे. काल नेमकं काय घडलं याची माहितीच त्यांनी मीडियासमोर दिली आहे.

मी नेहमीप्रमाणे वॉकला गेलो होतो. रोड नंबर 5 येथे गेटवरून जात असताना पाठीमागून कुणीतरी माझ्यावर स्टम्पने हल्ला केला. मला वाटलं चेंडू लागला. पाठीमागे वळून पाहिलं तेव्हा एकाजणाने माझ्या डोक्यावर मारण्याचा प्रयत्न केला. तो वार मी झेलला. दुसऱ्याने माझ्या पायावर मारलं. त्यामुळे मी खाली पडलो. त्यांनी मारहाण सुरू केली. तेव्हा लोक धावत आले. त्यांनी लोकांना दम दिला. पण लोक जेव्हा त्यांच्या अंगावर धावून गेले तेव्हा ते चार पाच लोक पळून गेले, अशी माहिती संदीप देशपांडे यांनी दिली.

हे सुद्धा वाचा

त्यांना संरक्षण द्या

या हल्ल्याचं भांडूप कनेक्शन समोर आलं आहे. पोलिसांचा तपास योग्य रितीने चालला आहे. तो पूर्ण होईपर्यंत मी त्यावर बोलणार नाही. एक महत्त्वाची गोष्ट सांगतो. मुख्यमंत्र्यांचा फोन आला होता. त्यांनी माझ्या प्रकृतीची विचारपूस केली. त्यांनी काळजीपोटी माझ्या संरक्षणासाठी दोन पोलीस पाठवले. माझी सरकारला विनंती आहे. आम्ही कुणाला भीक घालत नाही. हल्ल्याला घाबरत नाही. त्यामुळे आम्हाला संरक्षण नको. सरकारने आमचं संरक्षण काढून घ्यावं. आम्हाला संरक्षणाची गरज नाही. ज्यांनी हल्ला केला त्यांना संरक्षण द्यावं. कुणी हल्ला केला हे आम्हाला माहीत आहे, असा सूचक इशाराही त्यांनी दिला.

राऊतांचा मेंटल बॅलन्स गेला

यावेळी त्यांनी खासदार संजय राऊत यांच्यावरही टीका केली. संजय राऊतांचा मेंटल बॅलन्स गेला आहे. मी त्यांना पत्र लिहून काळजी व्यक्त केली आहे. मेंटल बॅलन्स गेलेल्या माणसाला आपली कुणी तरी सुपारी दिल्याचं वाटतं. सतत कोण तरी हल्ला करेल असं वाटत असतं. मग फ्रस्टेशनमध्ये ते शिव्या घालण्याचं काम करतात. आज ते निवडणूक आयुक्तांना शिव्या घालत आहेत. उद्या सर्वोच्च न्यायालयाचा निकाल विरोधात गेला तर ते न्यायाधीशांनाही शिव्या घालतील. उद्धव ठाकरे मोठे डॉक्टर आहेत. ते जगाला सल्ला देतात. त्यांनी राऊतांवर इलाज केला पाहिजे. माणूस फ्रस्टेड झाला तर अशांना रोग होतात, अशी खोचक टीकाही त्यांनी केली.

Non Stop LIVE Update
विठुरायांच्या भक्तांसाठी आनंदाची बातमी, 2 जूनपासून पदस्पर्श दर्शन सुरु
विठुरायांच्या भक्तांसाठी आनंदाची बातमी, 2 जूनपासून पदस्पर्श दर्शन सुरु.
सुरुवातीला त्यांची गरज.. पण आता आम्ही सक्षम, जे.पी.नड्डांचं मोठं वक्तव
सुरुवातीला त्यांची गरज.. पण आता आम्ही सक्षम, जे.पी.नड्डांचं मोठं वक्तव.
पोलिसांना जाहीर इशारा तर फडतूणवीस म्हणत ठाकरेंची फडणवीसांवर टीका
पोलिसांना जाहीर इशारा तर फडतूणवीस म्हणत ठाकरेंची फडणवीसांवर टीका.
जीएसटी ते महिलांना वर्षाला एक लाख, मल्लिकार्जुन खरगेंची मोठी घोषणा
जीएसटी ते महिलांना वर्षाला एक लाख, मल्लिकार्जुन खरगेंची मोठी घोषणा.
तोडा फोडा राज्य करा यावर भाजपचा भर, ठाकरेंचं फडणवीसांना प्रत्युत्तर
तोडा फोडा राज्य करा यावर भाजपचा भर, ठाकरेंचं फडणवीसांना प्रत्युत्तर.
Mega Block : रविवारी 'या' मार्गांवर असणार मेगाब्लॉक, वाचा सविस्तर
Mega Block : रविवारी 'या' मार्गांवर असणार मेगाब्लॉक, वाचा सविस्तर.
तर तुम्हाला गेटआऊट केल्याशिवाय राहणार नाही, उद्धव ठाकरेंचा रोख कुणावर?
तर तुम्हाला गेटआऊट केल्याशिवाय राहणार नाही, उद्धव ठाकरेंचा रोख कुणावर?.
मोदींचं शरद पवारांना एकच चॅलेंज, म्हणाले; तुम्ही राहुल गांधींना....
मोदींचं शरद पवारांना एकच चॅलेंज, म्हणाले; तुम्ही राहुल गांधींना.....
हा आत्मा तुम्हाला सत्तेवरून खाली...; शरद पवारांचा इशारा कुणाला?
हा आत्मा तुम्हाला सत्तेवरून खाली...; शरद पवारांचा इशारा कुणाला?.
राज ठाकरेंनी भर मंचावर भाषणात नरेंद्र मोदींकडे ठेवल्या 'या' 7 मागण्या
राज ठाकरेंनी भर मंचावर भाषणात नरेंद्र मोदींकडे ठेवल्या 'या' 7 मागण्या.