काय आहे सोहराबुद्दीन चकमक प्रकरण?

सोहराबुद्दीन शेख चकमक प्रकरणातील सर्व 22 आरोपींची निर्दोष मुक्तता सीबीआयच्या विशेष कोर्टाने केली. सर्व 210 साक्षीदार फितूर झाले असून, समाधानकारक पुरावे नाहीत, असे नमूद करुन कोर्टाने आरोपींची निर्दोष मुक्तता केली आहे. काय आहे सोहराबुद्दीन चकमक प्रकरण? सोहराबुद्दीन चकमक प्रकरण गुजरातमधील अहमादाबादेतील आहे. सोहराबुद्दीन शेख आणि त्याची पत्नी कौसर बी यांना कथित बनावट चकमकीत ठार करण्यात […]

काय आहे सोहराबुद्दीन चकमक प्रकरण?
Follow us
| Updated on: Jul 05, 2019 | 4:48 PM

सोहराबुद्दीन शेख चकमक प्रकरणातील सर्व 22 आरोपींची निर्दोष मुक्तता सीबीआयच्या विशेष कोर्टाने केली. सर्व 210 साक्षीदार फितूर झाले असून, समाधानकारक पुरावे नाहीत, असे नमूद करुन कोर्टाने आरोपींची निर्दोष मुक्तता केली आहे.

काय आहे सोहराबुद्दीन चकमक प्रकरण?

सोहराबुद्दीन चकमक प्रकरण गुजरातमधील अहमादाबादेतील आहे. सोहराबुद्दीन शेख आणि त्याची पत्नी कौसर बी यांना कथित बनावट चकमकीत ठार करण्यात आलं होतं. अहमदाबादच्या विशाला सर्कलजवळच्या टोलनाक्यावर 26 नोव्हेंबर 2005 रोजी हा घटना घडली होती. इतकंच नाही तर या प्रकरणातील साक्षीदार  आणि सोहराबुद्दीनचा मित्र तुलसीराम प्रजापतीला वर्षभरानंतर 27 डिसेंबर 2006 रोजी, गुजरात-राजस्थान सीमेजवळ चापरी इथे कथित बनावट चकमकीत ठार केलं होतं. मात्र या सर्व हत्या गुजरात एटीएसने राजकीय दबावात केल्याचा आरोप होता. त्यामुळेच गुजरात सीआयडीकडून हा तपास 2012 मध्ये सीबीआयकडे सोपवण्यात आला. त्यानंतर या खटल्याची निष्पक्ष सुनावणी व्हावी यासाठी सर्वोच्च न्यायालयाने गुजरातमधील हे प्रकरण महाराष्ट्रातील न्यायालयात वर्ग केलं होतं.

38 जणांविरोधात आरोपपत्र

सीबीआयने तपासानंतर 38 आरोपींविरोधात आरोपपत्र दाखल केलं होतं. यामध्ये भाजपचे विद्यमान अध्यक्ष अमित शाह, गुजरात एटीएसचे तात्कालीन प्रमुख डी.जी. वंझारा यांच्यासह अनेक बड्या व्यक्तींच्या अधिकाऱ्यांच्या नावाचा समावेश होता. मात्र खटल्यादरम्यान अमित शहा आणि वंझारा यांच्यासह एकूण 16 आरोपींना पुराव्याअभावी कोर्टाने निर्दोष मुक्त केलं.

उर्वरित 22 जणांचं भवितव्य

16 जणांना निर्दोष मुक्त केल्यानंतर, उरलेल्या 22 आरोपींविरोधात खटला सुरु होता, ज्याचा निकाल आज लागला. या 22 जणांमध्ये गुजरात आणि राजस्थान पोलीस दलातील अधिकाऱ्यांचा समावेश होता. सीबीआयने जवळपास 210 साक्षीदारांची साक्ष नोंदवली होती, मात्र यापूर्वी 92 जणांनी आपली साक्ष फिरवली होती.

Non Stop LIVE Update
नवा पक्ष स्थापन करणार, निवडणूकही लढवणार, संजय पांडे यांचा कुणाशी सामना
नवा पक्ष स्थापन करणार, निवडणूकही लढवणार, संजय पांडे यांचा कुणाशी सामना.
इतक्या हिऱ्यांनी साकरले बाळासाहेब, ठाकरेंना वाढदिवसानिमित्त अनोखी भेट
इतक्या हिऱ्यांनी साकरले बाळासाहेब, ठाकरेंना वाढदिवसानिमित्त अनोखी भेट.
... तर तुम्हाला तोंड दाखवता येणार नाही, मनोज जरांगेंचा शेलारांना इशारा
... तर तुम्हाला तोंड दाखवता येणार नाही, मनोज जरांगेंचा शेलारांना इशारा.
एक माणूस आला नाही..., मुरलीधर मोहोळ यांच्यासमोर युवकानं फोडला टाहो
एक माणूस आला नाही..., मुरलीधर मोहोळ यांच्यासमोर युवकानं फोडला टाहो.
उद्धव ठाकरेंनी राज ठाकरेंचे पाय धुवायला हवे, कुणी लगावला खोचक टोला?
उद्धव ठाकरेंनी राज ठाकरेंचे पाय धुवायला हवे, कुणी लगावला खोचक टोला?.
विठुरायाची थकवा जाण्यासाठी गरम पाण्यानं स्नान अन् आयुर्वेदिक काढा
विठुरायाची थकवा जाण्यासाठी गरम पाण्यानं स्नान अन् आयुर्वेदिक काढा.
भाजपने बेवकूफ बनवल यार... घरवापसी होताच माजी आमदाराची मातोश्रीतून टीका
भाजपने बेवकूफ बनवल यार... घरवापसी होताच माजी आमदाराची मातोश्रीतून टीका.
'ते परदेशात होते...',राज ठाकरेंच्या स्वबळाच्या घोषणेवरून राऊतांची टीका
'ते परदेशात होते...',राज ठाकरेंच्या स्वबळाच्या घोषणेवरून राऊतांची टीका.
पावसाचा रेल्वे वाहतुकीला फटका, ट्रॅकवर मातीचा गाळ अन् मालगाडी थांबली
पावसाचा रेल्वे वाहतुकीला फटका, ट्रॅकवर मातीचा गाळ अन् मालगाडी थांबली.
पावसाचा जोर कमी, पूरही ओसरला, पुणे जिल्ह्यातील बंद असलेले मार्ग कोणते?
पावसाचा जोर कमी, पूरही ओसरला, पुणे जिल्ह्यातील बंद असलेले मार्ग कोणते?.