AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Mahayuti Manifesto 2024 Maharashtra: महायुतीचे सरकार आल्यावर मुख्यमंत्री कोण? भाजप चाणक्य अमित शाह यांनी स्पष्टच सांगितले….

amit shah bjp manifesto: शरद पवार यांनी सुप्रिया सुळे ऐवजी अजित पवार यांच्याकडे पक्षाची सूत्रे दिली असती आणि उद्धव ठाकरे यांनी आदित्य ठाकरे ऐवजी एकनाथ शिंदे यांच्याकडे पक्ष दिला असता तर हे दोन्ही पक्ष फुटले नसते.

Mahayuti Manifesto 2024 Maharashtra: महायुतीचे सरकार आल्यावर मुख्यमंत्री कोण? भाजप चाणक्य अमित शाह यांनी स्पष्टच सांगितले....
अमित शाह
Jitendra Zavar
Jitendra Zavar | Updated on: Nov 10, 2024 | 12:28 PM
Share
Mahayuti Manifesto 2024 Maharashtra : महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडी आणि महायुती यांच्यात लढत होत आहे. दोन्ही आघाडी आणि युती सरकारकडून मुख्यमंत्री कोण? याबाबतचा चेंडू एकमेकांच्या कोर्टात टाकला जात आहे. महाविकास आघाडीकडून आधी महायुतीने मुख्यमंत्री कोण होणार? हे सांगावे मग आम्ही आमचा निर्णय जाहीर करु, असे म्हटले जात आहे. आता महायुतीचे चाणक्य म्हणून ओळखले जाणारे केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी महायुतीचे पुढील मुख्यमंत्री कोण? या प्रश्नाचे उत्तर दिले आहे. भाजपचा संकल्पपत्राचे प्रकाशन रविवारी झाले. त्यावेळी विचारलेल्या प्रश्नावर उत्तर देताना अमित शाह यांनी पुढील मुख्यमंत्री कोण? हे सांगितले.

संकल्पपत्र असे लागू होणार

महायुतीचे सरकार आल्यावर मुख्यमंत्री कोण होणार? या प्रश्नावर अमित शाह म्हणाले, सध्या महायुतीचे नेतृत्व एकनाथ शिंदे करत आहेत. निवडणूक त्यांच्या नेतृत्वाखाली लढवली जात आहे. निवडणुकीनंतर मुख्यमंत्री कोण होणार? हे तिन्ही पक्षाचे नेते एकत्र बसून निर्णय घेणार आहे, असे अमित शाह यांनी म्हटले. महायुतीची सरकार आल्यावर तीन पक्षांची कमेटी बनणार आहे. ती कमेटी तिन्ही पक्षाचा संकल्पपत्राचा अभ्यास करुन ती लागू करण्याबाबत निर्णय घेणार आहे.

सर्वाधिक दंगे काँग्रेसच्या काळात

महायुतीचे सरकार आल्यानंतर आता धर्मांतरविरोधात कठोर कायदा करणार आहे, असे अमित शाह यांनी सांगितले. यावेळी त्यांनी काँग्रेसवर शेतकऱ्यांचे प्रश्न न सोडवल्याबाबत टीका केली. ते म्हणाले. काँग्रेस सरकार असताना शेतमाल किमान आधारभूत किंमतीवर किती घेतला गेला. आता महायुती सरकार असताना किती घेतला गेला, त्याचा डाटा डाऊनलोड करुन पाहा. तसेच राज्यात सर्वाधिक जास्त दंगे आघाडीच्या सरकारमध्ये झाले आहेत. काँग्रेसच्या सरकारमध्ये झाले आहेत.

संघावर बंदी आणण्याचे तीन वेळा प्रयत्न काँग्रेसने केले आहे. परंतु प्रत्येक वेळी संघ अधिक मजबूत होऊन पुढे आला आहे. आता तर काँग्रेसची सरकार येणार नाही? यामुळे हा प्रश्नच येत नाही. पूर्ण बहुमताने महायुतीचे सरकार येणार आहे, असे एका प्रश्नाच्या उत्तरात अमित शाह यांनी सांगितले.

शिवसेना, राष्ट्रवादी यामुळे फुटली

शिवसेना आणि राष्ट्रवादी पक्ष का फुटला ते अमित शाह यांनी सांगितले. शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांनी पक्षापेक्षा परिवारास प्राधान्य दिले, यामुळे पक्ष फुटला. शरद पवार यांनी सुप्रिया सुळे ऐवजी अजित पवार यांच्याकडे पक्षाची सूत्रे दिली असती आणि उद्धव ठाकरे यांनी आदित्य ठाकरे ऐवजी एकनाथ शिंदे यांच्याकडे पक्ष दिला असता तर हे दोन्ही पक्ष फुटले नसते. त्यांना कधीतरी परिवार बाजूला ठेऊन पक्षाला प्राधान्य द्यावा लागणार आहे, असे अमित शाह यांनी म्हटले.

Follow Us
आठ दिवसांत कांदा दुपटीने महागला, लसूणही २०० रुपये किलोपर्यंत पोहोचला
आठ दिवसांत कांदा दुपटीने महागला, लसूणही २०० रुपये किलोपर्यंत पोहोचला
साखरेच्या दरात मोठी वाढ; सणासुदीत सर्वसामान्यांच्या खिशाला फटका
साखरेच्या दरात मोठी वाढ; सणासुदीत सर्वसामान्यांच्या खिशाला फटका
मराठा आरक्षणासाठी जरांगे पाटील ठाम; 29 ऑगस्टचे आंदोलन निर्णायक होणार
मराठा आरक्षणासाठी जरांगे पाटील ठाम; 29 ऑगस्टचे आंदोलन निर्णायक होणार...
आगामी निवडणुका एकत्र लढण्यावर शिक्कामोर्तब
Chandrashekhar Bawankule : आगामी निवडणुका एकत्र लढण्यावर शिक्कामोर्तब, बावनकुळेंनी दिली महायुती बैठकीची माहिती
विद्यार्थ्यांच्या उपोषणावरून राहुल गांधींचं फडणवीसांना उद्देशून ट्विट
'विद्यार्थी भीक नाही हक्क मागतायत', पुण्यातील आदिवासी विद्यार्थ्यांच्या उपोषणावरून राहुल गांधींचं फडणवीसांना उद्देशून ट्विट
धाराशिवमध्ये ठाकरेंना धक्का; 4 नगरसेवक भाजपमध्ये प्रवेश करणार
Dharashiv | धाराशिवमध्ये ठाकरेंना धक्का; 4 नगरसेवक भाजपमध्ये प्रवेश करणार
निधीवरुन मतभेद झाल्यास आयुक्तांमार्फत तोडगा काढला जाणार
महायुतीच्या समन्वय समितीची बैठक: निधीवरून मतभेद झाल्यास आयुक्तांमार्फत तोडगा, फडणवीस-शिंदेंकडे अंतिम निर्णय
पुण्यात राहुल गांधींसमोर विद्यार्थिनीने मांडले आदिवासींचे प्रश्न
Rahul Gandhi : राहुल गांधींसमोर विद्यार्थीनीनं आदिवासींच्या समस्यांचा पाढा वाचला
नवी इलेक्ट्रिक बुलेटप्रूफ कार ताफ्यात दाखल
देवेंद्र फडणवीस यांच्यासाठी नवी इलेक्ट्रिक बुलेटप्रूफ कार ताफ्यात दाखल
खान्देशात कानबाई विसर्जन २०२४; उत्साही सोहळा
खान्देशात कानबाई मातेचं विसर्जन: लोकसंस्कृतीचा उत्साही सोहळा