AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

शिवसेनाप्रमुखांनी आत्मचरित्र का लिहिले नाही…उद्धव ठाकरे यांनी दिले उत्तर

Shivsena Pramukh Balasaheb Thackeray Smarak: चार भिंती म्हणजे स्मारक नाही. शिवसेनाप्रमुखांचा जीवनपट म्हणजे हे स्मारक आहे. त्यापासून सर्वांना प्रेरणा मिळावी, हीच आमची अपेक्षा आहे. शिवसेना प्रमुखांनी आयुष्यभर महाराष्ट्राला दिले तेच काम या स्मारकाने दिले पाहिजे.

शिवसेनाप्रमुखांनी आत्मचरित्र का लिहिले नाही...उद्धव ठाकरे यांनी दिले उत्तर
उद्धव ठाकरे
| Updated on: Jan 11, 2025 | 1:51 PM
Share

Shivsena Pramukh Balasaheb Thackeray Smarak: शिवसेना प्रमुखांबद्दल जाणून घेण्याची इच्छा अनेकांना असते. परंतु शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी त्यांचे आत्मचरित्र कधी लिहिले नाही. बाळासाहेबांनी स्वत: सांगितले होते की, मी कधीही निवडणूक लढवणार नाही आणि मी आत्मचरित्र लिहिणार नाही. मग शिवसेना प्रमुखांनी आत्मचरित्र का लिहिले नाही? आजच्या युवकांना हा प्रश्न नेहमी पडलेला असतो. त्याचे उत्तर शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे चिरंजीव उद्धव ठाकरे यांनी शुक्रवारी दिली.

आत्मचरित्र का लिहिले नाही?

शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मारकाच्या पहिल्या टप्प्याचे काम पूर्ण झाले आहे. त्यासंदर्भात आयोजित पत्रकार परिषदेत उद्धव ठाकरे यांनी सांगितले की, चार भिंती म्हणजे स्मारक नाही. शिवसेनाप्रमुखांचा जीवनपट म्हणजे हे स्मारक आहे. त्यापासून सर्वांना प्रेरणा मिळावी, हीच आमची अपेक्षा आहे. शिवसेना प्रमुखांनी आयुष्यभर महाराष्ट्राला दिले तेच काम या स्मारकाने दिले पाहिजे. शिवसेना प्रमुखांनी आत्मचरित्र कधी लिहिले नाही. त्यावर त्यांना विचारले जात होते. ते म्हणत होते, मी कपाटातील माणूस नाही. मी मैदानावरचा माणूस आहे. त्यांचे आयुष्य उघडे पुस्तक होते.

आता टप्पा दोनचे काम…

23 जानेवारी शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे शताब्दी वर्ष आहे. त्यामुळे पुढच्या वर्षी आम्ही हे स्मारक शिवसेनाप्रमुखांवर श्रद्धा असणाऱ्यांच्या चरणी अर्पण करणार आहोत, असे उद्धव ठाकरे यांनी सांगितले. ते पुढे म्हणाले, पहिल्या टप्पाचे काम पूर्ण झाले. पण ते काम सोपे नव्हते. अनेक अडचणी होत्या. आता टप्पा दोनचे काम सुरू होणार आहे. आराखडा तयार झाला आहे.

एकही झाड तोडले नाही…

शिवसेनाप्रमुखांची आठवण सांगताना उद्धव ठाकरे म्हणाले, बाळासाहेबांनी पर्यावरणावर प्रेम केले. झाडांवर प्रेम केले. त्यामुळे त्यांचे स्मारक उभारताना एकही झाड तोडू नये, असे मी सांगितले होते. तसेच महापौर बंगला पुरातत्व वास्तू आहे. त्यामुळे बंगल्याच्या परिसरात नवे बांधकामही कराता येणार नव्हते. त्यामुळेच आम्ही भूमिगत स्मारक तयार केले आहे, असे उद्धव ठाकरे यांनी सांगितले.

बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो.
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं.
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!.
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.