AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

रेल्वेच्या ढिसाळ कारभारामुळे 52 वर्षीय महिलेचा हात मोडला, जीआरपीबाहेर रात्रभर ठिय्या, 17 तासानंतर घेतली तक्रार

रेल्वे प्रशासन आणि संबंधित ठेकेदारावर गुन्हा दाखल करण्याच्या मागणीसाठी इंदू पगारे आणि त्यांचे पती महादेव पगारे शनिवारी संध्याकाळी पाच वाजता जीआरपी ठाण्यात गेले. परंतु त्यांची तक्रार घेण्यात आली नाही. त्यामुळे सायंकाळपासून कुर्ला रेल्वे जीआरपी पोलीस ठाण्याबाहेर रात्रभर ठिय्या सुरु केले.

रेल्वेच्या ढिसाळ कारभारामुळे 52 वर्षीय महिलेचा हात मोडला, जीआरपीबाहेर रात्रभर ठिय्या, 17 तासानंतर घेतली तक्रार
इंदू पगारे यांनी केले आंदोलन
Jitendra Zavar
Jitendra Zavar | Updated on: Jul 20, 2025 | 11:43 AM
Share

रेल्वे प्रशासनाचा ढिसाळ कारभार पुन्हा समोर आला आहे. या कारभारामुळे ५२ वर्षीय महिलेचा हात मोडला. त्यानंतर त्या तक्रार दाखल करण्यासाठी जीआरपीकडे गेल्या. परंतु त्यांची तक्रार घेण्यास नकार देण्यात आला. त्यानंतर रात्रभर त्यांनी पोलीस ठाण्याबाहेर ठिय्या आंदोलन केले. सकाळी माध्यमांपर्यंत ही बातमी गेली. त्यानंतर १७ तासांनी महिलेची तक्रार घेण्यात आली.

कल्याण आंबिवली येथील इंदू महादेव पगारे (५२) यांचा कुर्ला स्थानकात रेल्वे प्रशासनाच्या हलगर्जीपणामुळे हात मोडला. कुर्ला प्लॅटफॉर्म क्रमांक ६ वर लादी बसवण्याचे काम सुरू आहे. परंतु कोणतीही बॅरिकेडिंग किंवा सुरक्षा व्यवस्था त्या ठिकाणी नाही. त्यामुळे इंदू पगारे यांचा तोल जाऊन त्या पडल्या. या घटनेत त्यांच्या डाव्या हाताचे हाड दोन ठिकाणी फ्रॅक्चर झाले. कुर्ला जीआरपी पोलिसांनी त्यांना सुरुवातीला जवळच्या बाबा हॉस्पिटलमध्ये नेले. परंतु उपचारांची सोय नसल्याने त्यांना केईएम रुग्णालयात पाठवण्यात आले. जिथे त्यांच्या हातावर शस्त्रक्रिया करण्यात आली.

रेल्वे प्रशासन आणि संबंधित ठेकेदारावर गुन्हा दाखल करण्याच्या मागणीसाठी इंदू पगारे आणि त्यांचे पती महादेव पगारे शनिवारी संध्याकाळी पाच वाजता जीआरपी ठाण्यात गेले. परंतु त्यांची तक्रार घेण्यात आली नाही. त्यामुळे सायंकाळपासून कुर्ला रेल्वे जीआरपी पोलीस ठाण्याबाहेर रात्रभर ठिय्या सुरु केले. 17 तास झाले तरी देखील त्यांची तक्रार घेण्यात आली नाही.

इंदू पगारे यांच्या आंदोलनाची बातमी माध्यमांच्या प्रतिनिधींना कळाली. त्यानंतर माध्यमांचे प्रतिनिधी आल्यावर तक्रार घेतली जात आहे. इंदू पगार यांनी सांगितले की, शनिवारी रात्रीपासून मी या पोलीस स्टेशनच्या आवारात बसून होते. मला काही पोलिसांनी अरेरावी देखील केली आहे. या संदर्भात मी मुख्यमंत्री व तसेच सीपी साहेबांना तक्रार दाखल करणार आहे. माझ्या घरात मीच एकटी कमवती आहे. मला आता एक वर्ष हात हलवता येणार नाही. माझे घर कसे चालणार?

दरम्यान, कुर्ला लोहमार्ग वरिष्ठ पोलीस निरीक्षक संभाजी यादव यांनी सांगितले की, तक्रार दाखल करण्यासाठी प्रक्रिया असते. ती सुरु आहे. आमचा कोणताही पोलीस कर्मचारी उलट बोलला असेल तर त्या संदर्भात आम्ही चौकशी करून योग्य ती कारवाई करू.

Follow Us
Jalna Triple S City! मुख्यमंत्री फडणवीसांचा मोठा प्लॅन....
Jalna Triple S City! मुख्यमंत्री फडणवीसांचा मोठा प्लॅन; रेशीम उद्योगाला मिळणार नवी झेप
राष्ट्रवादी शरद पवारांचीच!; सुप्रिया सुळेंचं मोठं विधान
Supriya Sule | राष्ट्रवादी शरद पवारांचीच!; सुप्रिया सुळेंचं मोठं विधान, नेमकं काय म्हणाल्या...
2027 च्या जनगणनेत जात, ओळख आणि कोविड लस संबंधित माहितीचा समावेश
2027 च्या जनगणनेत जात, ओळख आणि कोविड लस संबंधित माहितीचा समावेश
अमराठी रिक्षा-टॅक्सी चालकांना मुदतवाढ नाही; १५ ऑगस्ट डेडलाईन
प्रताप सरनाईक: अमराठी रिक्षा-टॅक्सी चालकांना मुदतवाढ नाही, १५ ऑगस्ट अंतिम तारीख
धीरज परदेशी हत्या प्रकरणात पोलिसांकडून दिशाभूल केल्याचा जगतापांचा आरोप
धीरज परदेशी हत्या प्रकरण: तपासात पोलिसांकडून दिशाभूल केल्याचा संग्राम जगतापांचा आरोप
पुण्यातील भोंदू बाबाचा व्हिडिओ व्हायरल: शिष्य पाय धुऊन पाणी पितात
उमेश तागुंदेचा वादग्रस्त व्हिडिओ: शिष्यांकडून पाय धुऊन पाणी पिण्याचा धक्कादायक प्रकार.
बाळासाहेबांची शिवसेना ही ठाकरेंचीच; सुप्रिया सुळे यांचं मोठं वक्तव्य
Supriya Sule | बाळासाहेबांची शिवसेना ही ठाकरेंचीच; सुप्रिया सुळे यांचं मोठं वक्तव्य
राज ठाकरेंनी पदाधिकाऱ्यांना जन-झीशी संपर्क साधण्याचे दिले निर्देश
राज ठाकरे यांचे पदाधिकाऱ्यांना जन-झीशी संपर्क वाढवण्याचे निर्देश, पुण्यातील बैठकीत स्पष्टीकरण
पुण्यात भोंदूबाबाचा धक्कादायक प्रकार! दैवी शक्तीच्या नावाखाली...
Pune | पुण्यात भोंदूबाबाचा धक्कादायक प्रकार! दैवी शक्तीच्या नावाखाली अल्पवयीन मुलींचं शोषण; आरोपी फरार
चाकण एमआयडीसीतून २० उद्योगांच्या स्थलांतरावर शरद पवारांचा सरकारला सवाल
चाकण एमआयडीसीतून २० उद्योगांच्या स्थलांतरावर शरद पवारांचा सरकारला सवाल, रोजगार टिकवण्यासाठी उपाययोजनांची मागणी