AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मनसे, ठाकरे एकत्र येताच आता वंचितनेही घेतला युतीबाबत मोठा निर्णय, नेमकं काय ठरलं?

राज्यात महापालिका निवडणुकीचं बिगूल वाजलं आहे, या पार्श्वभूमीवर युती आणि आघाड्या संदर्भात बोलणी सुरू आहेत, आता वंचित बहुजन आघाडीने देखील युतीबाबत मोठा निर्णय घेतला आहे.

मनसे, ठाकरे एकत्र येताच आता वंचितनेही घेतला युतीबाबत मोठा निर्णय, नेमकं काय ठरलं?
प्रकाश आंबेडकर Image Credit source: टीव्ही 9 मराठी
| Updated on: Dec 24, 2025 | 8:09 PM
Share

राज्यात महापालिका निवडणुकीचं बिगूल वाजलं आहे. या पार्श्वभूमीवर मनसे प्रमुख राज ठाकरे आणि शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी मोठी घोषणा केली आहे. शिवसेना ठाकरे गट आणि  मनसेकडून अधिकृतरित्या युतीची घोषणा करण्यात आली आहे. तब्बल 18 वर्षांनी दोन्ही ठाकरे बंधू एकत्र आल्याचं पाहायला मिळत आहे. दरम्यान त्यानंतर आता वंचित बहुजन आघाडीकडून देखील युतीसंदर्भात मोठा निर्णय घेण्यात आला आहे.  भाजप सोडून कोणत्याही पक्षासोबत युती करा, अशा सूचना वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी पक्षाच्या सर्व जिल्हाध्यक्षांना दिल्या आहेत. तसेच राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्या युतीवर प्रतिक्रिया देताना त्यांनी ही चांगली गोष्ट असून, त्यांचं स्वागत आहे, असं म्हटलं.

नेमकं काय म्हणाले प्रकाश आंबेडकर? 

आगामी महापालिका निवडणुकीला कसं सामोरं जाणार? याबाबत आता वंचित बहुजन आघाडीने आपली दिशा स्पष्ट केली आहे.  भाजप सोडून कोणासोबतही युती करा, दोन्ही राष्ट्रवादी, दोन्ही शिवसेना आणि काँग्रेस बरोबर युती केली तर चालेल अशा सूचना प्रकाश आंबेडकर यांनी आपल्या पक्षाच्या सर्व जिल्हाध्यक्षांना दिल्या आहेत. पुढे बोलताना ते म्हणाले की,  या सगळ्यात महत्वाचा भाग म्हणजे भाजपा काही ठिकाणी त्यांच्या मित्रांबरोबर चालली आहे, तर काही ठिकाणी युती करणार नाही. काँग्रेस सुद्धा  काही ठिकाणी राष्ट्रवादी सोबत चालली आहे, काही ठिकाणी नाही. तीच परिस्थिती शिवसेनेची आहे.  त्यामुळे एक पॉलिसी अशी नाही,  ज्या महापालिका आहेत तिथल्या अध्यक्षांना युतीसंदर्भात अधिकार देण्यात आले आहेत.  त्यांनी कोणासोबत युती करता येईल याची चाचपणी करावी, मात्र त्यासाठी अट एकच आहे, भाजपसोबत युती करायची नाही, असं यावेळी आंबेडकर यांनी म्हटलं आहे.

मनसे-ठाकरे गट युतीवर प्रतिक्रिया 

दरम्यान आज शिवसेना ठाकरे गट आणि मनसेची युती झाली आहे, यावर प्रतिक्रिया देताना त्यांनी या युतीचं स्वागत केलं आहे. ही चांगली गोष्ट आहे, दोघांचं स्वागत असं यावेळी प्रकाश आंबेडकर यांनी म्हटलं आहे.

Follow Us
त्यांची अडचण का करता?, मला खाजगीत विचारा, काय म्हणाले शंभूराज देसाई?
त्यांची अडचण का करता?, मला खाजगीत विचारा, काय म्हणाले शंभूराज देसाई?.
पीएनजी घ्या, कदाचित तीन महिन्यानंतर LPG बंद होईल, काय म्हणाले भुजबळ ?
पीएनजी घ्या, कदाचित तीन महिन्यानंतर LPG बंद होईल, काय म्हणाले भुजबळ ?.
सोन्याने पुन्हा घेतली भरारी, चांदीनेही भाव खाल्ला, पाहा किती दरवाढ
सोन्याने पुन्हा घेतली भरारी, चांदीनेही भाव खाल्ला, पाहा किती दरवाढ.
नाशिकच्या सातपुर येथील शिवाजीनगरात बिबट्याचे रेस्क्यू ऑपरेशन
नाशिकच्या सातपुर येथील शिवाजीनगरात बिबट्याचे रेस्क्यू ऑपरेशन.
गॅसचे दरवाढल्याने इगतपूरी ते नाशिक टॅक्सी प्रवास महागला
गॅसचे दरवाढल्याने इगतपूरी ते नाशिक टॅक्सी प्रवास महागला.
प. महाराष्ट्राला कोकण जोडणार, वैभववाडी-कोल्हापूर रेल्वेचा DPR तयार
प. महाराष्ट्राला कोकण जोडणार, वैभववाडी-कोल्हापूर रेल्वेचा DPR तयार.
आमची जमीन परत द्या, खरातला मंदिराला जागा देणाऱ्या माळी बंधूंची मागणी
आमची जमीन परत द्या, खरातला मंदिराला जागा देणाऱ्या माळी बंधूंची मागणी.
खरात-तटकरे-चाकणकर यांचे CDR तपासा, शरद पवार गटाच्या नेत्याची मागणी
खरात-तटकरे-चाकणकर यांचे CDR तपासा, शरद पवार गटाच्या नेत्याची मागणी.
शहरातही आता चुलींना मागणी वाढली, गॅस सिलिंडर टंचाईवर शोधला उपाय
शहरातही आता चुलींना मागणी वाढली, गॅस सिलिंडर टंचाईवर शोधला उपाय.
खरातवर आणखी दोन गुन्हे दाखल, एकूण गुन्ह्यांची संख्या १०, हवाला रॅकेट..
खरातवर आणखी दोन गुन्हे दाखल, एकूण गुन्ह्यांची संख्या १०, हवाला रॅकेट...