AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Bageshwar Baba: ‘छत्रपती शिवाजी महाराज युद्ध करताना थकले अन् रामदास स्वामींना…’ बागेश्वर बाबाने अकलेचे तारे तोडले, त्या वक्तव्याने मोठा वाद

Bageshwar Baba on Chhatrapati Shivaji Maharaj: नागपूरमध्ये भारतदुर्गा शक्तिस्थळ शिलान्यास कार्यक्रमात बागेश्वर धामचे धीरेंद्र कृष्ण शास्त्री उपाख्य बागेश्वर बाबा यांनी एक वादग्रस्त वक्तव्य केले आहे. आमदार संजय गायकवाड यांच्यानंतर त्यांनी अजून एका वादाला फोडणी दिली.

Bageshwar Baba: 'छत्रपती शिवाजी महाराज युद्ध करताना थकले अन् रामदास स्वामींना...' बागेश्वर बाबाने अकलेचे तारे तोडले, त्या वक्तव्याने मोठा वाद
छत्रपती शिवराय, बागेश्वर बाबाImage Credit source: टीव्ही ९ मराठी
| Updated on: Apr 25, 2026 | 8:41 AM
Share

Bageshwar Baba on Chhatrapati Shivaji Maharaj: “छत्रपती शिवाजी महाराज युद्ध करताना थकले,स्वामी रामदास महाराज जवळ गेले,आता युद्ध लढणार नाही असे सांगितले,राजपाट सांभाळण्यास सांगितले . रामदास स्वामींनी सांगितले की ठीक आहे. शिष्य हा गुरुचे मानतो, त्यामुळे आजपासून राज्य तुम्हाला चलवावे लागेल.” असे वक्तव्य करून बागेश्वर धामचे धीरेंद्र कृष्ण शास्त्री उपाख्य बागेश्वर बाबा यांनी वादग्रस्त वक्तव्य केले आहे. आमदार संजय गायकवाड यांनी शिवाजी कोण होता या पुस्तकावरून प्रकाशक प्रशांत आंबी यांना जीवे मारण्याची धमकी दिली आणि अर्वाच्य भाषेत शिवीगाळ केली. ह वाद ताजा असतानाच त्यात बागेश्वर बाबाची भर पडली आहे. काल नागपूरमध्ये भारदुर्गा शक्तिस्थळ शिलान्यास कार्यक्रमात धीरेंद्र कृष्ण शास्त्री बोलत होते.

या कार्यक्रमाला सरसंघचालक मोहन भागवत, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्यासह अनेक मान्यवर आणि संत मंडळी उपस्थित होते. आज भारतीय सनातन धर्माला आणखी जास्त गौरव होत आहे, भारत दुर्गा मंदिराचे भूमिपूजन झाले आहे. संघ प्रमुखांनी भारताला विश्व पटलावर स्थापन करण्यासाठी जीवन दिले. भारत माता, दुर्गा मातेचा संकल्प आला. भारत मातेने निवडले आहे. यातील देवशक्तींनी हा विचार केला असेल, केवळ एकमात्र भारत आहे जिथे भारत मातेचा जयकार लावला जातो. भारताच्या गौरवला पुन्हा स्थापित करण्यासाठी संघ प्रमुखांनी विडा उचलला . जेंव्हा भारतात कुठे आपत्ती येते तेंव्हा आरएसएस स्वयंसेवक तिथे जाऊन मदत करतो , असे बागेश्वर बाबा म्हणाले.

त्या वक्तव्याने खळबळ

“छत्रपती शिवाजी महाराज युद्ध करताना खूप थकले, म्हणजे त्यांना वाटलं की, आपण थकलो. एक दिवस ते रामदास स्वामी यांच्याकडे गेले. त्यांनी मुकूट उतारला आणि खाली ठेवला. आता आपल्याला युद्ध लढायचे नाही. हा मुकूट आपण सांभाळा, हा राजपाट आपण सांभाळा. आपल्या आज्ञेने आम्ही चाललो. आमच्याकडून युद्ध लढलं जात नाही. आम्ही खूप थकलो आहोत. आता आम्हाला आराम हवा. आम्हाला विश्राम हवा. काही दिवस आम्ही काहीच करू इच्छित नाही.” असे वक्तव्य बागेश्वर बाबांनी केले.

“शिवरायांनी मन मोकळं केल्यावर रामदास स्वामी यांनी स्मितहास्य केले. ते म्हणाले की, ठीक आहे. तुम्ही आमचे कोण आहात? शिवाजी महाराज म्हणाले की आपले शिष्य आहोत. मग आम्ही कोण आहोत. तेव्हा शिवाजी महाराज म्हणाले की तुम्ही आमचे गुरू आहात. मग शिष्याचं कर्तव्य काय? असा सवाल रामदास स्वामी यांनी विचारला. त्यावर जो गुरू आज्ञा देणार त्याचं पालन करण हे शिष्याचं कर्तव्य असल्याचे रामदास स्वामी म्हणाले. रामदास स्वामी यांनी मुकूट उचलला आणि महाराजांच्या डोक्यावर ठेवला. आजपासून माझं राज्य आहे. मी राज्य चालवणार. तुम्हाला संचालन करायचं आहे.” असे वक्तव्य धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांनी या कार्यक्रमात केले. तर चार मुलं जन्माला घाला आणि त्यातील एक स्वयंसेवक संघाला द्या, असे आवाहन त्यांनी केले.

Follow Us
शरद पवारांचा गट NDAच्या वाटेवर? थेट अमित शाहांसोबतच... पडद्याआड मोठ्या
शरद पवारांचा गट NDAच्या वाटेवर? थेट अमित शाहांसोबतच... पडद्याआड मोठ्या राजकीय हालचाली!
पंतप्रधानांनी कॅमेरा अँगल नव्हे तर हृदयाचा... -प्रियांका गांधी
पंतप्रधानांनी कॅमेरा अँगल नव्हे तर हृदयाचा... नीट पेपरफुटीवर बोलताना प्रियंका गांधी हे काय बोलून गेल्या?
मंत्री-सचिव सगळेच घामाघुम! शिंदेंच्या आढावा बैठकीत मोठं घडलं? शिक्षण..
मंत्री-सचिव सगळ्यांनाच फुटला घाम! शिंदेंच्या आढावा बैठकीत मोठं घडलं? शिक्षण खातं...
विद्यार्थी दहशतवादी होते का? संसदेत प्रियंका गांधींचा सरकारला थेट सवाल
Priyanka Gandhi | विद्यार्थी दहशतवादी होते का? संसदेत प्रियंका गांधींचा सरकारला थेट सवाल; लाठीचार्जवरून मोदी-शहांकडे मागितलं उत्तर
परीक्षा सुधारणा विधेयकाबाबत लोकसभेत चर्चा, मंत्री जितेंद्र सिंह...
परीक्षा सुधारणा विधेयकाबाबत लोकसभेत चर्चा, मंत्री जितेंद्र सिंह यांनी दिली मोठी अपडेट
मोठी बातमी! पंतप्रधान नरेंद्र मोदी मंत्रालयांच्या सचिवांसोबत बैठक
मोठी बातमी! पंतप्रधान नरेंद्र मोदी मंत्रालयांच्या सचिवांसोबत उच्चस्तरीय बैठक, ईराण-अमेरिका तणावादरम्यान...
मोठा निर्णय! CJP आंदोलनातील विद्यार्थ्यांवरील सर्व गुन्हे मागे...
मोठा निर्णय! CJP आंदोलनातील विद्यार्थ्यांवरील सर्व गुन्हे मागे; मुख्यमंत्री फडणवीसांचे पोलिसांना तातडीचे आदेश
पुणे विद्यापीठात बनावट डिग्रीचा खेळ खल्लास; 70 हजारांच्या व्यवहारानंतर
मोठा खुलासा! पुणे विद्यापीठात बनावट डिग्रीचा खेळ खल्लास; 70 हजारांच्या व्यवहारानंतर एकच खळबळ
शेतकऱ्यांना थोडा त्रास झाला तर सहन करू, पण उद्योजकांना त्रास...
शेतकऱ्यांना थोडा त्रास झाला तर सहन करू, पण उद्योजकांना त्रास... गुलाबराव पाटलांचं विधान तुफान चर्चेत
उत्तम शिंदेंविरोधात गुन्हा दाखल; सहकारी संघाच्या इमारतीवर बेकायदेशीर..
मोठी कारवाई! शिंदेंविरोधात गुन्हा दाखल; सहकारी संघाच्या इमारतीवर बेकायदेशीर ताब्याचा आरोप