AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

‘मनोज जरांगे पाटील यांनी आमचा सत्यानाश केला, आम्हाला उद्धवस्त केलं’, OBC बैठकीपूर्वीच वादंग, बड्या नेत्याच्या विधानाने खळबळ

Manoj Jarange Patil : मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाला गेल्या महिन्यात मोठे यश आले. त्यानंतर राज्य सरकारने शासन निर्णय काढला. त्यावरून मोठे वादंग उठले आहे. आता काँग्रेसच्या बड्या नेत्याने मनोज जरांगे पाटील यांनी आमचा सत्यानाश केल्याचे मोठे विधान केले आहे.

'मनोज जरांगे पाटील यांनी आमचा सत्यानाश केला, आम्हाला उद्धवस्त केलं', OBC बैठकीपूर्वीच वादंग, बड्या नेत्याच्या विधानाने खळबळ
मनोज जरांगे
| Updated on: Oct 04, 2025 | 9:32 AM
Share

मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी मुंबईत आझाद मैदानावर उपोषण केले. मराठा आंदोलक थेट मुंबईत दाखल झाल्याने राज्य सरकार अडचणीत आले. त्यात हायकोर्टाने पण धारेवर धरल्याने मोठा पेचप्रसंग निर्माण झाला. सरकारने मग त्यावर तोडगा काढण्यासाठी मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या नेतृत्वात शिष्टमंडळ पाठवले. त्यातून मराठा आरक्षणाविषयीचा शासन निर्णय,GR काढण्यात आला. हैदराबाद गॅझेट, सातारा गॅझेट, औंध गॅझेट, कोल्हापूर गॅझेटच्या अंमलबजावणीविषयी मार्ग काढण्यात आला. या शासन निर्णयाला अनेक ओबीसी नेत्यांनी हरकत घेतली. त्यात मंत्री छगन भुजबळ, प्रा. लक्ष्मण हाके आणि काँग्रेसचे बडे नेते विजय वडेट्टीवार (Vijay Vadettiwar criticised Manoj Jarange ) यांनी या जीआरला कडाडून विरोध केला. तर वडेट्टीवार यांनी आता जरांगे पाटलांवर मोठे खापर फोडले.

मनोज जरांगेंनी आमचा सत्यानाश केला

10 ऑक्टोबर रोजी सकल ओबीसींचा नागपूरमध्ये मोर्चा काढण्यात येणार आहे. तर 2 सप्टेंबर रोजी राज्य सरकारने जो जीआर काढला, तो ओबीसींच्या मुळावर घाव घालणारा असल्याचे काँग्रेसचे ज्येष्ठ नेते विजय वडेट्टीवार म्हणाले. जरांगे पाटील यांच्याविषयी मला काय विचारताय. त्यांनी आमचा सत्यानाश केला आहे. त्यांनी आम्हाला उद्धवस्तच केले आहे. धुळे येथील एक आकडेवारी माझ्याकडे आली. त्यात 38000 दाखले देण्यात आले होते. आता कुणबी दाखले दिल्याचा आकडा 1 लाख 28 हजारांवर पोहचला आहे. याचा अर्थ समजून घ्या. काय कुठं चाललंय. त्यांनी आम्हाला मातीत घालायचं ठरवलंच आहे. आम्ही छोटे छोटे बारके समाज आहोत. आम्हाला मातीत घालून संपावायचं आहे. एकछत्री राज्य करायचं असेल तर सरकार आणि जरांगे पाटील ठरवतील असा वर्मी घाव विजय वडेट्टीवार यांनी घातला.

2 सप्टेंबरचा जीआर रद्द करा

आज मुख्यमंत्र्यांनी ओबीसी नेत्यांची बैठक बोलावली आहे. राज्यातील 40 हून अधिक ओबीसी नेते त्यात सहभागी होतील. 2 सप्टेंबरचा जीआर रद्द करण्याची आमची मागणी आहे. बैठकीत सकारात्मक होण्याची शक्यता आहे. मुळ ओबीसीत मोठी घुसखोरी होत आहे. आरक्षणाची मर्यादा तितकीच आहे. जर लहान ओबीसीत मोठा समाज जर आला तर गरीब समाजाची वाईट अवस्था होईल. त्यांना ओबीसी आरक्षणाचा कोणताही फायदा मिळणार आहे. 2 सप्टेंबरचा जीआर रद्द करण्याची आमची प्रमुख मागणी आहे. जर हा जीआर रद्द केला तर आपण 10 ऑक्टोबर रोजीचा ओबीसी मोर्चा रद्द करू. मुख्यमंत्र्यांचे स्वागत करू असे वडेट्टीवार म्हणाले.

Follow Us
आम्हाला कोणतेही व्हिडिओ पाहायचे नाहीत; जंतर-मंतर लाठीचार्ज प्रकरणावर..
आम्हाला कोणतेही व्हिडिओ पाहायचे नाहीत; जंतर-मंतर लाठीचार्ज प्रकरणावर सुप्रीम कोर्टाचा सुनावणीला तात्काळ नकार
हे सरकार हटवा, आम्ही वर्दीत आहोत; राहुल गांधींना फरफटत नेताना पोलीस...
हे सरकार हटवा, आम्ही वर्दीत आहोत; राहुल गांधींना फरफटत नेताना पोलिसांने कानात काय सांगितलं?
152 पेपरफुटी, 5 कोटी विद्यार्थ्यांचं भविष्य उद्ध्वस्त!
Rahul Gandhi | 152 पेपरफुटी, 5 कोटी विद्यार्थ्यांचं भविष्य उद्ध्वस्त! राहुल गांधींचा मोदी सरकारवर घणाघात
तोंडातून रक्त येत होतं अन्,.. स्वतः राहुल गांधींंनीच सांगितलं, अटके
तोंडातून रक्त येत होतं अन्... स्वतः राहुल गांधींंनीच सांगितलं, अटकेवेळी नेमकं काय घडलं?
धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्याच्या मागणीवर आशिष जैस्वालांचा पलटवार
Aashish Jaiswal | धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्याच्या मागणीवर आशिष जैस्वालांचा पलटवार; म्हणाले थेट संबंध नाही...
ओमराजेंसह सर्व फुटीर खासदारांना... ठाकरे गटाने कोर्टात धाव घेताच मोठी
Arvind Sawant | ओमराजेंसह सर्व फुटीर खासदारांना... ठाकरे गटाने कोर्टात धाव घेताच मोठी अपडेट समोर
राहुल गांधींना अमित साटमचं थेट चॅलेंज! पासपोर्ट दाखवा, परदेश...
Ameet Satam | राहुल गांधींना अमित साटमचं थेट चॅलेंज! पासपोर्ट दाखवा, परदेश दौऱ्यांचा हिशेब द्या
ममता बॅनर्जींना मोठा झटका! विश्वासू खासदाराला... लोकसभेत नेमकं काय घडल
ममता बॅनर्जींना मोठा झटका! विश्वासू खासदाराला... लोकसभेत नेमकं काय घडलं?
पंढरीकडे पालख्यांचे अंतिम पाऊल! वाखरीत पालखी सोहळ्याची जय्यत तयारी
Pandharpur Wari 2026 | पंढरीकडे संतांच्या पालख्यांचे अंतिम पाऊल! वाखरीत पालखी सोहळ्याची जय्यत तयारी
मोठी बातमी! ठाकरेंनी दिल्लीतून केली थेट घोषणा, येत्या दोन दिवसांनंतर..
मोठी बातमी! उद्धव ठाकरेंनी दिल्लीतून केली थेट घोषणा, येत्या दोन दिवसांनंतर...
जंतरमंतरवर सीजेपीचं आंदोलन? जागतिक मीडियाने काय म्हटलं?.

जंतरमंतरवर सीजेपीचं आंदोलन? जागतिक मीडियाने काय म्हटलं?

CJP protest : मोठी बातमी! विद्यार्थ्यांसाठी आता अण्णा हजारे मैदानात, थेट मोठी घोषणा, उद्या….

CJP protest : मोठी बातमी! विद्यार्थ्यांसाठी आता अण्णा हजारे मैदानात, थेट मोठी घोषणा, उद्या…

भाजप आमदाराच्या गाडीवर हल्ला, मारण्याचा प्रयत्न.

भाजप आमदाराच्या गाडीवर हल्ला, मारण्याचा प्रयत्न

खरंच की काय? टीम इंडियाच्या हट्टामुळे हा खेळाडू दुखापतग्रस्त! नेमकं काय घडलं ते जाणून घ्या.

खरंच की काय? टीम इंडियाच्या हट्टामुळे हा खेळाडू दुखापतग्रस्त! नेमकं काय घडलं ते जाणून घ्या

Farmer Loan Waiver List : कर्जमाफीचा लाभ मिळण्यास सुरुवात, पण या शेतकऱ्यांना लाभ मिळणारच नाही, ती अट काय?.

Farmer Loan Waiver List : कर्जमाफीचा लाभ मिळण्यास सुरुवात, पण या शेतकऱ्यांना लाभ मिळणारच नाही, ती अट काय?

विद्यार्थ्यांच्या खांद्यावर बंदुक ठेवून काही लोक… दिल्लीतील आंदोलनावरून CM फडणवीसांचा विरोधकांवर हल्लाबोल.

विद्यार्थ्यांच्या खांद्यावर बंदुक ठेवून काही लोक… दिल्लीतील आंदोलनावरून CM फडणवीसांचा विरोधकांवर हल्लाबोल