AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Chandrapur | भद्रावतीचा तहसीलदार अडकला जाळ्यात; 25 हजार रुपयांची घेत होता लाच

लाच देणे शक्य नसल्यानं संबंधित ग्राहकानं नागपूरच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडं तक्रार केली. लाचलुचपत प्रतिबंधक विभागानं सापळा रचून तहसीलदाराला अटक केली.

Chandrapur | भद्रावतीचा तहसीलदार अडकला जाळ्यात; 25 हजार रुपयांची घेत होता लाच
भद्रावतीचे तहसीलदार
| Edited By: | Updated on: Dec 11, 2021 | 6:20 PM
Share

चंद्रपूर : भद्रावतीचे तहसीलदार डॉ. नीलेश खटके याला 25 हजार रुपयांची लाच घेताना अटक करण्यात आली. नागपूर येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागानी ही कारवाई केली. तहसीलदार डॉ. नीलेश खटके याला त्यांच्या कार्यालयातच लाच घेताना रंगेहात अटक करण्यात आली.

काय आहे प्रकरण

वीटभट्टीसाठी मातीची गरज असते. या मातीच्या उत्खननाची परवानगी देण्याचे अधिकार तहसीलदारांकडं असतात. यासाठी तहसीलदाराने लाच मागितली होती. पण, लाच देणे शक्य नसल्यानं संबंधित ग्राहकानं नागपूरच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडं तक्रार केली. लाचलुचपत प्रतिबंधक विभागानं सापळा रचून तहसीलदाराला अटक केली.

दोन महिन्यांपूर्वीच आले होते बदलून

विटा भट्टीसाठी लागणाऱ्या लाल मातीच्या उत्खननाची परवानगी देण्यासाठी तहसीलदाराने 25 हजार रुपयांची लाच मागितली होती. दोन महिन्यांपूर्वीच पोंभुर्णा तालुक्यात तहसीलदार म्हणून कार्यरत खटके यांची भद्रावती येथे बदली झाली होती. खटके याला अटक झाल्यानं महसूल विभागात प्रचंड खळबळ उडाली आहे.

तहसील कार्यालयातील कर्मचारी धास्तावले

तहसील कार्यालयात या ना त्या कारणासाठी नागरिकांना यावे लागते. अशावेळी काही कर्मचारी लाचेची मागणी करतात. ज्यांचे काम अडते असे नागरिक लाच देऊन कामे काढून घेतात. पण, ज्यांना शक्य नसते. त्यांना तहसील कार्यालयाच्या चकरा माराव्या लागतात. या कारवाईमुळं लाच घेणाऱ्यांचे चांगलेच धाबे दणाणले. आपली कुणी तक्रार तर करणार नाही ना, अशी भीती त्यांच्यात निर्माण झाली आहे.

Nagpur | ऑटोरिक्षाच्या भाववाढीवरून चालक-ग्राहकांत मतभेद, मध्यम मार्ग निघणार कसा?

Nagpur Health | सिकलसेल झालाय काय काळजी घ्याल? समाजात 17 डिसेंबरपर्यंत जनजागृती

Best from the Waste | घरातील कचऱ्यापासून खत निर्मिती; किचन गार्डनसाठी मनपातर्फे प्रोत्साहन

Follow Us
मोदी सरकार आहे तोपर्यंत कोणी भारताची एक इंचही भूमी बळकावू शकत नाही
मोदी सरकार आहे तोपर्यंत कोणी भारताची एक इंचही भूमी बळकावू शकत नाही.
समन्स म्हणजे अंतिम निर्णय नाही, तपासानंतर पुढील कारवाई ठरते- बावनकुळे
समन्स म्हणजे अंतिम निर्णय नाही, तपासानंतर पुढील कारवाई ठरते- बावनकुळे.
डोंबिवलीत ठाकरे गटाला धक्का; प्रकाश तेलगोटे यांचा भाजपमध्ये पक्षप्रवेश
डोंबिवलीत ठाकरे गटाला धक्का; प्रकाश तेलगोटे यांचा भाजपमध्ये पक्षप्रवेश.
इंदापुरात राष्ट्रवादीच्या बॅनवरून सुनेत्रा पवार यांचाच फोटो गायब...
इंदापुरात राष्ट्रवादीच्या बॅनवरून सुनेत्रा पवार यांचाच फोटो गायब....
राज्यात गॅस तुटवडा; रिक्षाचालकांच्या शिरसाट यांच्या घराबाहेर रांगा
राज्यात गॅस तुटवडा; रिक्षाचालकांच्या शिरसाट यांच्या घराबाहेर रांगा.
अशोक खरात प्रकरणात रुपाली चाकणकर SIT कडून चौकशीसाठी समन्स
अशोक खरात प्रकरणात रुपाली चाकणकर SIT कडून चौकशीसाठी समन्स.
भोंदू खरात प्रकरणाची विशेष कोर्टात सुनावणी; SIT अधिकाऱ्यांकडून....
भोंदू खरात प्रकरणाची विशेष कोर्टात सुनावणी; SIT अधिकाऱ्यांकडून.....
भोंदूबाबा खरात प्रकरणात 11 गुन्हे दाखल, कोर्टात SIT कडून पुन्हा दोन...
भोंदूबाबा खरात प्रकरणात 11 गुन्हे दाखल, कोर्टात SIT कडून पुन्हा दोन....
अशोक खरातला केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यापर्यंत कोण घेऊन गेले?
अशोक खरातला केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यापर्यंत कोण घेऊन गेले?.
खरातच्या संपर्कात अनेक बडे नेते, राऊतांच्या आरोपांनंतर राजकारण तापले
खरातच्या संपर्कात अनेक बडे नेते, राऊतांच्या आरोपांनंतर राजकारण तापले.