Nagpur bus | महिन्याभरानंतर धावल्या आठ एसटी बस; तपासणी अधिकारी-वाहतूक नियंत्रक झाले चालक-वाहक

नागपूर येथील गणेशपेठ बसस्थानकावरून आठ बसेस निघाल्या. तपासणी अधिकारी, वाहतूक नियंत्रक, आरक्षण खिडकी सांभाळणाऱ्या कर्मचाऱ्यांना चालक आणि वाहकांची जबाबदारी देण्यात आली.

Nagpur bus | महिन्याभरानंतर धावल्या आठ एसटी बस; तपासणी अधिकारी-वाहतूक नियंत्रक झाले चालक-वाहक
नागपूर बसस्थानक
Follow us
| Updated on: Dec 08, 2021 | 5:45 PM

नागपूर : मध्यवर्ती स्थानकातून आज आठ बसेस धावल्या. चालक-वाहक कामावर न आल्यानं ही जबाबदारी तपासणी अधिकारी-वाहतूक नियंत्रक यांच्याकडं सोपविण्यात आली. आज 510 प्रवाशांनी बसनं प्रवास केला. काटोल, रामटेक, सावनेर, कळमेश्वर, उमरेड आणि भंडारा या मार्गांवर या एसटी बसगाड्या धावल्या. यातून महिनाभरानंतर गणेशपेठ आगाराला 22 हजार रुपयांचा महसूल मिळाला.

तपासणी अधिकारी, वाहतूक नियंत्रक झाले चालक-वाहक

गेल्या महिनाभरापासून एसटी कर्मचाऱ्यांचा संप सुरू आहे. सरकारमध्ये विलीनीकरणाच्या मागणीवर ते ठाम आहेत. मात्र, काही कर्मचारी कामावर रुजू झाले. नागपूर येथील गणेशपेठ बसस्थानकावरून आठ बसेस निघाल्या. तपासणी अधिकारी, वाहतूक नियंत्रक, आरक्षण खिडकी सांभाळणाऱ्या कर्मचाऱ्यांना चालक आणि वाहकांची जबाबदारी देण्यात आली. एस कर्मचाऱ्यांचा संप सुरूच असल्यानं इतर कर्मचाऱ्यांना बसगाड्या काढण्याच्या सूचना देण्यात आल्यात.

400 च्या वर कर्मचाऱ्यांचे निलंबन

नागपूर विभागातील एसटी कर्मचाऱ्यांच्या संपाला एक महिना पूर्ण झाला. पण, हे कर्मचारी आपल्या मागण्यांवर ठाम आहेत. दोन दिवसांपूर्वी दोन बस सोडण्यात आल्या. पण, त्यामध्ये नियमित वाहक आणि चालक सहभागी झाले नव्हते. गेल्या महिनाभरानंतर या दोन बसेस सोडण्यात आल्या होत्या. पण, कर्मचारी कामावर आले नव्हते. 400 च्या वर कर्माचाऱ्यांचे नागपूर विभागात निलंबन करण्यात आलं. तरीही कर्मचारी त्यांच्या मागण्यांवर ठाम आहेत. काही कर्मचाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या.

बंद बसचा विद्यार्थ्यांना फटका

सहा नोव्हेंबर रोजी एसटीच्या कर्मचाऱ्यांनी नागपुरातून संप पुकारला होता. कर्मचारी आपल्या मागण्यांवर ठाम आहेत. बस बंद असल्यामुळं बसनं प्रवास करणारे विद्यार्थी शाळेत पोहचू शकत नाहीत. प्रवास करणाऱ्या कर्मचाऱ्यांचेही हाल आहेत. हे मान्य करतो. पण, आमची आर्थिक स्थिती सुधारायला पाहिजे, असं कर्मचारी संघटनेचं म्हणण आहे.

पगारवाढीवर कर्मचारी समाधानी नाहीत

परिवहन मंत्र्यांनी दिलेली पगारवाढ ही तुकड्यांमध्ये असल्यानं कर्मचारी नाराज आहेत. दिलेली वाढ ही अत्यंत कमी आहे. सेवा देणाऱ्या वरिष्ठांना योग्य प्रमाणात पगारवाढ झाली नसल्याच संघटनेच्या पदाधिकाऱ्यांच म्हणणंय. वाहतूक निरीक्षकांना मशीन देण्यात आली. त्यामुळं त्या दोन बसेस सुरू झाल्या. विलीनीकरण ही न्यायालयीन प्रक्रिया आहे. पण, योग्य प्रमाणात पगारवाढ मिळावं, अशीच कर्मचाऱ्यांची मागणी आहे.

Nagpur cat | मांजरीचा वावर जीवावर उठला, कीटकनाशकाचा डबा सांडवला, विष चाटल्यानं बाळाचा मृत्यू

Nagpur Corona | परदेशी प्रवासी आल्यास मनपाला कळवा, चाचणी करून घ्या-प्रशासनाचं आवाहन

Nagpur Municipal Corporation | ओबीसी इच्छुकांची चिंता वाढली, दावेदारांमध्ये प्रचंड अस्वस्थता

Non Stop LIVE Update
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका.
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर.
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार.
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका.
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर.
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका.