AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Nitin Gadkari : मेळघाट, गडचिरोलीतही वीज पोहचवायचीय, वीजचोरी थांबल्यास दर कमी होतील, नितीन गडकरींना विश्वास

चार्ज कराल तेवढा वेळ उपयोग होईल. चार्जिंग संपलं की फोनप्रमाणे बंद होईल. त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये ही चोरी संपेल, असा विश्वास गडकरी यांनी व्यक्त केला.

Nitin Gadkari : मेळघाट, गडचिरोलीतही वीज पोहचवायचीय, वीजचोरी थांबल्यास दर कमी होतील, नितीन गडकरींना विश्वास
वीजचोरी थांबल्यास दर कमी होतील, नितीन गडकरींना विश्वास
| Edited By: | Updated on: Jul 29, 2022 | 10:28 PM
Share

नागपूर : केंद्रीय मंत्री नितीन गडकरी म्हणाले, विजेच्या क्षेत्रात (Electricity) आपल्याला आत्मनिर्भर व्हायचं आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली आपण प्रत्येक गावापर्यंत वीज पोचवत आहोत. या देशात असे एकही घर राहणार नाही की जिथे वीज नाहीये. मी आत्ता जेव्हा चौकशी केली तेव्हा मला अशी माहिती मिळाली की मेळघाटमधले (Melghat) काही थोडीशी गाव आहेत. मला आठवत मी महाराष्ट्र जेव्हा बांधकाम मंत्री होतो. तेव्हा मेळघाटमध्ये साडेचारशे गावांना रस्ते करण्याचा काम केलं. त्यावेळी फॉरेस्ट डिपार्टमेंट (Forest Department) रस्तेच करू देत नव्हतं आणि ते सगळं मी समजून गेलो. पूर्ण गावांना रस्ते केले. तेव्हापासून एमएसईबीची लाईन टाकून आहे. पण तो आकडा फक्त वरती करायचं. त्याला फॉरेस्टवाले अडचण देतात.

प्रत्येक गावात वीज पोहचवायचीय

गडकरी म्हणाले, गडचिरोलीमधले काही गाव अशी आहेत तिथली लोक विजेला विरोध करतात. पण आपल्याला हळूहळू 100 टक्के विजेच्या क्षेत्रात प्रत्येक गावात प्रत्येक माणसापर्यंत वीज पोहोचवायची आहे. यातून त्याच्या जीवनामध्ये खूप मोठा बदल होणार आहे. मी अनेक वर्ष महाराष्ट्राच्या विधानमंडळात मंत्री होतो. त्यामुळे जवळून महाराष्ट्रातल्या ऊर्जा क्षेत्रामध्ये बरीचशी माहिती मला आहे.

विजेच्या वितरण, चोरीत 24 टक्के नुकसान

विजेत घाटा येतो. त्यापेक्षा 100 रुपयाचा रॉ मटेरियल आणि 90 रुपये बिलिंग असे सुरू आहे. त्यामुळे हळूहळू आपल्या सगळ्या डिस्कोमला देशात दहा लाख कोटी रुपयांपेक्षा घाटा आहे. महाराष्ट्राच्या डिस्कोममध्ये एक लाख कोटी पेक्षा जास्त असावं. त्यावेळी येणाऱ्या काळामध्ये विजेचे दर वाढवावे लागतात. या 24 टक्के जवळपास ट्रान्समिशन डिस्ट्रीब्यूशन आणि चोरी असा 24 टक्के लॉस आहे. हा लॉस जर कमी झाला नाहीतर पुढलं भविष्य कठीण आहे. यासाठी भारत सरकारने इलेक्ट्रिक रिफॉर्मचा कायदा काढायचं ठरविलं आहे. त्यावर चर्चा झाली. महाराष्ट्र सरकारने प्रीपेड मीटर आणलं. प्रीपेड कार्ड मोबाईल फोनप्रमाणे आहे. चार्ज कराल तेवढा वेळ उपयोग होईल. चार्जिंग संपलं की फोनप्रमाणे बंद होईल. त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये ही चोरी संपेल, असा विश्वास गडकरी यांनी व्यक्त केला.

फडणवीसांच्या इशाऱ्याने इतर पक्ष चालतात, कुणाच्या वक्तव्याची होते चर्चा
फडणवीसांच्या इशाऱ्याने इतर पक्ष चालतात, कुणाच्या वक्तव्याची होते चर्चा.
CM सह शिंदे दादांची महत्त्वाची बैठक; पक्षांतर्गत प्रवेशबंदीवर तोडगा?
CM सह शिंदे दादांची महत्त्वाची बैठक; पक्षांतर्गत प्रवेशबंदीवर तोडगा?.
इंडिगोच्या विस्कळीत सेवेविरोधात प्रवाशांना मनस्ताप, थेट कोर्टात याचिका
इंडिगोच्या विस्कळीत सेवेविरोधात प्रवाशांना मनस्ताप, थेट कोर्टात याचिका.
रूपाली ठोंबरेंकडून बाळासाहेब अन् पवारांसोबत फोटो शेअर, चर्चांना उधाण
रूपाली ठोंबरेंकडून बाळासाहेब अन् पवारांसोबत फोटो शेअर, चर्चांना उधाण.
मुंबईत भाजपच्या महापौरामुळं कॉलर टाईट होणार! लोढांचं मोठं वक्तव्य काय?
मुंबईत भाजपच्या महापौरामुळं कॉलर टाईट होणार! लोढांचं मोठं वक्तव्य काय?.
चैत्यभूमीवर जनसागर... बाबासाहेबांच्या महापरिनिर्वाण दिनी मोठी गर्दी
चैत्यभूमीवर जनसागर... बाबासाहेबांच्या महापरिनिर्वाण दिनी मोठी गर्दी.
डॉ. आंबेडकरांना राज्यपाल, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांकडून आदरांजली
डॉ. आंबेडकरांना राज्यपाल, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांकडून आदरांजली.
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो.
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं.
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!.